एक्स्प्लोर

पैसे पाठवणाऱ्या अनिवासी भारतीयांची संख्या वाढली, एका वर्षात 12 टक्के पैसे वाढले : सीतारामन

Nirmala Sitharaman: अनिवासी भारतीयांचे भारतात पैसे पाठवण्याचं योगदान मोठं आहे. त्यांचं हेच योगदान अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अधोरेखित केलं आहे.

Nirmala Sitharaman: अनिवासी भारतीयांचे (NRI) भारतात पैसे पाठवण्याचं योगदान मोठं आहे. त्यांचं हेच योगदान अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अधोरेखित केलं आहे. यासोबतच 2022 या वर्षाभरात परदेशात राहणारे म्हणजेच अनिवासी भारतीयांनी देशात पाठवलेले पैसे सुमारे 100 अब्ज डॉलर्स असून ते एका वर्षात 12 टक्क्यांनी वाढले आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितली. सीतारामन मध्य प्रदेशात बोलत होत्या. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे

मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील प्रवासी भारतीय दिवस (PBD) अधिवेशनादरम्यान झालेल्या एका सत्रात बोलताना त्यांनी या विषयाला हात घातला. यावेळी अनिवासी भारतीयांना "भारताचे खरे राजदूत" म्हणायला हवं असं प्रतिपादन सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केलं. याशिवाय अनिवासी भारतीयांनी भारतातील उत्पादने आणि सेवा शक्यतो वापरण्याचं आवाहन त्यांनी केले जेणेकरुन देशाच्या वैयक्तिक ब्रँडचा जगभरात प्रचार केला जाऊ शकतो. 

याच कार्यक्रमात बोलताना “चीन प्लस वन” धोरणानंतर जग आता “युरोपियन युनियन (EU) प्लस वन” धोरणाबद्दल बोलत असल्याची बाब अधोरेखित केली. चीन आणि EU व्यतिरिक्त ते त्यांचे कारखाने सुरू करू शकतील असा देश म्हणून सरकार भारताला बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर जोरदारपणे सादर करत आहे. भारतीय डायस्पोरांनी देशातील लहान आणि मोठ्या व्यावसायिकांसोबत भागीदारी केली पाहिजे जेणेकरुन येत्या 25 वर्षांत स्वातंत्र्याच्या 'अमृत काल' दरम्यान अनिवासी भारतीयांच्या उद्योजकीय कौशल्यांचा उपयोग करता येईल."परदेशातून स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी पाठवलेला रेमिटन्स 2022 या वर्षासाठी सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा आहे. हा येणार्‍या सर्वाधिक रेमिटन्सपैकी एक आहे," असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 2021 च्या तुलनेत टक्के हे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढले आहे.  

साथीच्या रोगानंतरच्या एका वर्षाच्या आत, लोकांना वाटले की भारतीय कामगार पुन्हा परदेशात परत जाणार नाहीत, ते केवळ परत गेले नाहीत तर खूप उपयुक्त रोजगारासाठी गेले आणि पैसे पाठविणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. एका वर्षात 12 टक्के वाढ झाली आहे. 

माहिती तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल्स, सेमीकंडक्टर डिझायनिंग, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर क्षेत्रातील भारतीय व्यावसायिकांच्या वर्चस्वाचा दाखला सीतारामन यांनी दिला. देश ज्ञान आणि प्रगतीचे जागतिक केंद्र बनत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत कालमध्ये, एक महत्त्वाकांक्षी भारत चार गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल ज्यात पायाभूत सुविधा, गुंतवणूक, नाविन्य आणि समावेश यांचा समावेश आहे राहिल असं सीतारामन यांनी सांगितलं.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget