एक्स्प्लोर

RBI : जनधन बँक खात्यांची पुन्हा केवायसी ते सरकारी बाँडमध्ये SIP ची संधी, आरबीआयचे तीन मोठे निर्णय

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग व्यवस्थेसंदर्भात तीन मोठे निर्णय घेतले आहेत. याचा फायदा लोकांना होणार आहे. यामध्ये जनधन खात्यांची रिकेवायसी केली जाणार आहे.

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी ऑगस्टचं पतधोरण विषयक धोरण जाहीर केलं. या बैठकीनंतर सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे बँकिंग संदर्भातील तीन प्रमुख निर्णय घेतले. जनधन खात्यांची पुन्हा केवायसी केली जाणार आहे. याशिवाय छोट्या गुंतवणूकदारांना सरकारी बाँडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीची संधी आणि खातेधारकाच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैसे आणि लॉकर मधील वस्तू वारसांना देण्यासंदर्भातील प्रक्रिया याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयामुळं बँकिंग आणि गुंतवणुकीची संधी प्रत्येक नागरिकाला मिळेल. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची मदत करणं आरबीआयची जबाबदारी असल्याचं म्हलोत्रा म्हणाले. 

जनधन बँक खाती रीकेवायसीसाठी मोहीम

पंतप्रधान जनधन योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या योजनेद्वारे लाखो बँक खाती उघडण्यात आली होती. आता या खात्यांची पुन्हा एखदा केवायसी करणं गरजेचं आहे. आता लोकांना बँकेत जाऊन रांगा लावत  केवायसी करावी लागणार नाही. 1 जुलै 30 सप्टेंबर या काळात ग्रामपंचायत पातळीवर कॅम्प लावले जातील, तिथं केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. केवायसी करण्यासोबत नवी बँक खाती देखील उघडलीजातील. याशिवाय मायक्रो फायनान्स आणि पेन्शन योजनांची माहिती दिली जाणार आहे. ग्राहकांच्या तक्रारी देखील समजून घेत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 

सरकारी बाँडमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीची संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2021 पासून रिटेल डायरेक्ट सुविधा सुरु केली होती. त्याद्वारे आता सर्वसामान्य लोक आता आरबीआयकडून सरकारच्या बाँडची खरेदी करु शकतात. आरबीआय यातील सुविधा वाढवणार असून छोटे गुंतवणूकदार एसआपीद्वारे ट्रेजरी बिल्स म्हणजेच सरकारच्या अल्पकालीन बाँडमध्ये गुंतवणूक करु शकतात. यामुळं सर्वसामान्य लोकांना सरकारी गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मिळेल. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं हा सोपा पर्याय आहे. 

खातेदारांच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैसे आणि लॉकरमधील वस्तू देण्याची प्रक्रिया

एखाद्या बँक खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँकेतून पैसे आणि लॉकरमधील वस्तू मिळवण्यासाठी खूप कागदपत्रं द्यावी लागत होती. प्रत्येक बँकेचे स्वत:चे नियम असतात. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं आरबीआय सर्वांसाठी एक समान आणि सोपी प्रक्रिया आणणार आहे. त्यामुळं सर्व बँका एकसारखी कागदपत्रं स्वीकारतील त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली जाईल. यामुळं मृत खातेधारकाच्या वारसदारांना लवकर आणि सहजपणे बँकेतील पैसे आणि लॉकरमधील वस्तू मिळतील. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget