एक्स्प्लोर

अयोध्येत फक्त श्रीरामच येणार नाहीत, तर 85 हजार कोटी रुपयेही येणार; काय आहे योजना?

अयोध्येत 'श्री राममंदिर' (Ram Mandir) उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे.

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत 'श्री राममंदिर' (Ram Mandir) उभारणीला सुरुवात झाली तेव्हापासून या शहराच्या विकासात (Development) मोठी भर पडली आहे. अयोध्येच मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरु आहेत. दरम्यान, सध्या लोक 22 जानेवारीची वाट पाहत आहेत, त्या दिवशी 'श्री रामजन्मभूमी मंदिर'चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. लोक याकडे प्रभू रामाचे अयोध्येतील पुनरागमन म्हणूनही पाहत आहेत. पण खर्‍या अर्थाने केवळ श्रीरामच 'राममंदिरात परतणार नाहीत, तर याचबरोबर अयोध्येत 85,000 कोटी रुपये येणार आहेत. नेमकी संपूर्ण योजना काय? ते सविस्तर पाहुयात. 

धार्मिक पर्यटनाला चालना 

अयोध्येत सुरू होणारे राम मंदिर हे देशातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र तर आहेच, शिवाय या प्रदेशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठीही ते विशेष आहे. राम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळेच पायाभूत सुविधांपासून ते हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी क्षेत्रापर्यंतच्या कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.

अयोध्येत विकासाची नवी गाथा

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या नवीन रेल्वे स्टेशन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी अयोध्या क्षेत्रासाठी 15,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अयोध्येला आधुनिक स्वरूप प्राप्त होईल.

अयोध्येला 'ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी' बनवण्याचा निर्णय

अयोध्येतील ‘श्री रामजन्मभूमी मंदिरा’च्या उद्घाटनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. काही लोक याकडे प्रभू श्री रामाचे अयोध्येला परतणे म्हणूनही पाहत आहेत. पण राम मंदिरात केवळ श्रीरामच परतणार नाहीत, तर अयोध्येच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 85,000 कोटी रुपये येणार आहेत. राम मंदिर परिसराव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारने अयोध्येची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांना निधी दिला आहे. यामुळे अयोध्या आजूबाजूच्या क्षेत्रासाठी एक मोठे आर्थिक केंद्र बनेल आणि तेथील अर्थशास्त्र बदलेल. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येला 'ग्लोबल मेगा टुरिस्ट सिटी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

85,000 कोटी रुपयांची ही योजना काय?

अयोध्येच्या मास्टर प्लॅन-2031 नुसार त्याचा पुनर्विकास 10 वर्षात पूर्ण होईल. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर दररोज सुमारे 3 लाख पर्यटक अयोध्येत पोहोचण्याची अपेक्षा आहे. इतक्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथील पुनर्विकासावर सुमारे 85 हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. अयोध्येला जागतिक शहर बनवण्यासाठी दिक्षू कुकरेजा यांनी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. राम मंदिर उघडल्यानंतर एका नागरिकामागे 10 पर्यटकांचे प्रमाण असेल. त्यामुळे याठिकाणी शासकीय गेस्ट हाऊस, हॉटेल, व्यापारी संकुले विकसित करण्यात येणार आहेत. हे प्रत्येक प्रकारच्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करतील.

केंद्र आणि राज्य सरकारच्या 37 एजन्सी अयोध्येत काम करतायेत

केंद्र आणि राज्य सरकारच्या 37 एजन्सी अयोध्येला नवे रूप देण्यासाठी आधीच कार्यरत आहेत. यासाठी सुमारे 31,660 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. NHAI 10,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हाताळत आहे. उत्तर प्रदेश सरकार आधीच 75,00 कोटी रुपयांच्या सुमारे 34 प्रकल्पांवर काम करत आहे. तर विमानतळ, रेल्वे आणि महामार्गाचा विकास स्वतंत्रपणे होत आहे.

व्यवसायातही भरभराट 

श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा सांगतात की, राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आजूबाजूच्या भागात आर्थिक घडामोडी वाढतील. आता पैसा आला तर व्यवसाय करण्यापासून रोजगारापर्यंतच्या संधी वाढतील. ताज, रॅडिसन आणि आयटीसी सारखे लक्झरी ब्रँड अयोध्येत हॉटेल्स उघडण्यासाठी येत आहेत. तर ओयो सारखे बजेट हॉटेल ब्रँड्सही येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर बिसलेरी, पार्लेजी आणि कोका-कोला या कंपन्याही या भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात प्लांट उभारण्यावर भर देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

राजा विक्रमादित्यला गोमाताने दाखवला राम जन्मभूमीचा मार्ग, जाणून घ्या राम जन्मभूमीची आख्यायिका

 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget