एक्स्प्लोर

जन धन योजनेंतर्गत उघडलेली 10 कोटी खाती निष्क्रिय, बँकेतील 12000 कोटींहून अधिक रक्कम कोणाची?

PM Jan Dhan Yojana: PM जन धन खात्याबद्दल माहिती देताना सरकारने सांगितले की, या योजनेअंतर्गत देशभरात 51 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. परंतू, त्यापैकी 10 कोटींहून अधिक खाती निष्क्रिय आहेत.

PM Jan Dhan Yojana: केंद्र सरकार (Central Govt)वेळोवेळी देशातील गरीब वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना आणते. प्रधानमंत्री जन धन योजना (PM Jan Dhan Yojana) ही अशीच एक योजना आहे. जी विशेषतः दुर्बल आर्थिक विभागातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. अलीकडेच, संसदेत पीएम जन धन खात्याबद्दल महत्त्वाची माहिती देताना सरकारने सांगितले की, या योजनेअंतर्गत देशभरात 51 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. परंतू, त्यापैकी 10 कोटींहून अधिक खाती निष्क्रिय आहेत. अशा परिस्थितीत निष्क्रिय खात्यांची संख्या एकूण खात्यांच्या 20 टक्के इतकी झाली आहे. एकूण निष्क्रिय बँक खात्यांपैकी जवळपास निम्मी खाती महिलांची असल्याची माहिती समोर आली आहे.

पीएम जनधन खात्यात 12000 कोटींहून अधिक रक्कम जमा

पीएम जन धन योजना सुरू करण्यामागील सरकारचा उद्देश देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवेशी जोडणे हा होता. या योजनेअंतर्गत तुम्ही शून्य शिल्लक खाते उघडू शकता. या योजनेने सरकारला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वितरित करण्यात मदत केली आहे. राज्यसभेत पंतप्रधान जन धन योजनेची आकडेवारी सादर करताना वित्त राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की, या योजनेअंतर्गत देशभरात एकूण 51.11 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी 10 कोटी अशी खाती आहेत, ज्यात गेल्या काही वर्षांत कोणताही व्यवहार झालेला नाही. अशा स्थितीत ही खाती निष्क्रिय झाली आहेत. निष्क्रिय खात्यांमध्ये महिला खातेदारांची संख्या 4.93 कोटी आहे. या निष्क्रिय खात्यांमध्ये एकूण 12,779 कोटी रुपये जमा आहेत, ज्यासाठी कोणताही दावाकर्ता नाही.

खाती निष्क्रिय का झाली?

वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी पीएम जनधन खाते निष्क्रिय करण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. यामध्ये खातेदारांचा थेट संबंध नाही. अनेक वेळा खात्यात बराच काळ व्यवहार न झाल्यास ते निष्क्रिय होते. आरबीआयच्या नियमांनुसार, एखाद्या खात्यात दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार होत नसल्यास, असे खाते आपोआप निष्क्रिय होते. निष्क्रिय पीएम जनधन खात्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही वित्त राज्यमंत्री म्हणाले.

एवढी रक्कम पीएम जन धन योजनेंतर्गत जमा करण्यात आली 

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या 51 कोटींहून अधिक खात्यांमध्ये एकूण 2,08,637.46 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे. जर तुमचे जन धन खाते देखील निष्क्रिय झाले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही केवायसी करून असे खाते पुन्हा सक्रिय करू शकता. जन धन खात्याअंतर्गत, खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड देखील मिळते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड, फोटो आणि केवायसी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या:

PMJDY: काय आहे प्रधानमंत्री जन धन योजना? जाणून घ्या योजनेचे फायदे

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget