एक्स्प्लोर

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी या व्यवसायाद्वारे केला व्यावसायिक-उद्योग जगतात प्रवेश

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात ट्रेडिंग कंपनीद्वारे सुरू केली. त्यानंतर त्यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला.

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी देशात टाटा समूहातील विविध उद्योग, व्यवसायाची पायाभरणी केली. आज हे  उद्योग देशातील प्रमुख उद्योग म्हणून नावारुपास आले आहे. टाटा समूहाच्या उद्योगांनी जगभरात भारताची एक नवी ओळख करून दिली. जमशेदजी टाटा यांचा उद्योजक होण्याचा प्रवासही रंजक आहे. 

जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांचे पारशी कुटुंबीय पुजारी म्हणून काम करत होते. मात्र, जमशेदजी यांचे वडील नुसरवानजी टाटा हे व्यवसायात उडी घेणारे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. वयाच्या 14 व्या वर्षी जमशेदजी टाटा यांनी मुंबईत आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. जमशेदजी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे 10 वर्षांनी 1868 मध्ये त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला.

21,000 रुपयांच्या गुंतवणुकीने ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय

जमशेटजी टाटा यांनी अवघ्या 21,000 रुपयांच्या गुंतवणुकीने ट्रेडिंग कंपनी सुरू केली. पण लवकरच जमशेटजी टाटा इंग्लंडला गेले आणि तेथून कापड व्यवसायाबाबतची माहिती घेऊन भारतात परतले. 

नागपूरमध्ये कापड गिरणी

इंग्लंडहून परतल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी १८६९ मध्येच कापड व्यवसायात हात आजमावला. त्यांनी मुंबईतील औद्योगिक केंद्र असलेल्या गिरणगावातील चिंचपोकळीतील दिवाळखोर झालेली तेल गिरणी विकत घेतली. त्यांनी त्याचे नाव अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. जमशेदजी टाटा यांनी तेल गिरणीचे सूतगिरणीत रूपांतर केले.  त्यानंतर दोन वर्षांनी ती एका स्थानिक व्यापाऱ्याला चांगल्या किंमतीत विकली. यामध्ये त्यांना नफा झाला. जमशेदजी टाटा यांनी त्यानंतर इंग्लंडला जाऊन लँकेशायर येथील कपड्याच्या व्यापाराचे सखोल ज्ञान घेतले. त्यावेळी कापड गिरण्यांसाठी मुंबई हे सर्वात पसंतीचे ठिकाण होते. मात्र, जमशेदजी टाटा यांनी आपला नफा वाढवण्यासाठी दूरदर्शी दृष्टिकोन स्वीकारला. त्यांनी 1874 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. सुमारे 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. नागपूरची निवड करण्यामागील 3 मुख्य कारणे होती. यामध्ये कापूस निर्मिती करणारे क्षेत्र जवळ असणे,  रेल्वे जंक्शन जवळ असणे आणि उद्योगासाठी पाणी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था असणे.  

Tata Line ची स्थापना 

जमशेदजी टाटा यांनी 1873 मध्ये त्यांच्या कापड व्यवसायाच्या स्वस्त निर्यातीसाठी एक शिपिंग कंपनी सुरू केली. त्यासाठी त्याने लंडनहून अॅनी बॅरो नावाचे जहाज 1050 पौंड या दराने दरमहा भाड्याने घेतले. जपानच्या Nippon Yusen Kaisha Line सोबत त्यांनी यासाठी Tata Line सुरू केली. मात्र, हा व्यवसाय फारकाळ टिकला नाही. 
जमशेटजींचा म्हैसूर सिल्कशीही संबंध

म्हैसूर सिल्कसोबत जमशेदजी टाटा यांचा संबंध

एवढेच नाही तर जमशेदजी टाटा यांनी देशातील रेशीम उद्योगाला चालना देण्याचे कामही केले. 1893 मध्ये जमशेदजी टाटा जपानच्या दौऱ्यावर गेले होते, तिथे त्यांना रेशीम कीटकांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याच्या पद्धतीची माहिती मिळाली. भारतात परतल्यावर त्यांनी हा व्यवसाय तत्कालीन म्हैसूर राज्यात पसरवला. त्यासाठी त्यांनी तेथे आवश्यक असलेली जमीन खरेदी करून सवलतीच्या दरात रेशीम पालन सुरू केले. 

उद्योग, व्यवसायाची सुरुवात

'टाटा'च्या संकेतस्थळानुसार, टाटा समूहाने देशातील पहिली मोठी स्टील कंपनी सुरू केली. त्याशिवाय पहिले पंचतारांकीत हॉटेल, घरगुती ग्राहकोपयोगी वस्तू देणारी कंपनी स्थापन केली. तसेच देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. टाटा एअरलाइन्सचे नाव 'एअर इंडिया' असे करण्यात आले. समूहातील टाटा मोटर्सने रेल्वे इंजिनचे उत्पादन केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget