एक्स्प्लोर

भारत पाकिस्तानला कोणत्या पिकांची निर्यात करतो? 25 कोटींहून अधिक लोकसंख्या भारतावर अवलंबून

भारतातून पाकिस्तानात विविध पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात (India Exports crops to pakistan) केली जाते. विविध पिकांसह भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहेत.

India Exports crops to pakistan : भारतातून पाकिस्तानात विविध पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात (India Exports crops to pakistan) केली जाते. सरकारनं पाकिस्तानसोबतचे काही प्रमाणात व्यापारी मार्ग बंद केले होते. मात्र त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरू झाले आहेत. विविध पिकांसह भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहेत. पाकिस्तानची 25 कोटींहून अधिक लोकसंख्या अजूनही काही गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. भारतातून पाकिस्तानात नेमक्या कोणत्या पिकांची निर्यात होते, यासंदर्भातील माहिती पाहुयात. 

भारताकडून या पिकांची पाकिस्तानला निर्यात

अत्यंत खराब द्विपक्षीय संबंध असूनही, भारत आणि पाकिस्तान दरम्यान आवश्यक पिकांचा व्यापार होत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली 26 सप्टेंबर 2023 रोजी अमृतसर येथे झालेल्या बैठकीनंतर हा व्यापार मार्ग खुला करण्यात आला आहे. अन्नधान्याची गरज असलेला पाकिस्तान आजही भारताकडून कापूस, टोमॅटो, कांदा, तेलबिया या पिकांची आयात करतो. यासोबतच पाकिस्तान भारताकडून कच्ची साखरही घेत आहे. याशिवाय चहाची पाने, कॉफी आणि मसालेही भारतातून पाकिस्तानला पाठवले जातात. तसेच पाकिस्तान भारताकडून आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी ताजी फळे खरेदी करतो. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध सुधारण्यासाठी या पिकांच्या निर्यातीला चालना मिळू शकते. याचा फायदा दोन्ही देशातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे.

दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार थांबला होता. जो नंतर पुन्हा सुरु झाला. एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे 1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. भारतासोबतचे व्यापारी मार्ग खुले करण्याची मागणी पाकिस्तानमध्ये जोर धरू लागली होती. नैसर्गिक आणि राजकीय परिस्थितीमुळे भाजीपाला आणि फळांच्या किंमतीत पाकिस्तानात मोठी वाढ झाली असून देशभरातील हजारो एकरातील पिके नष्ट झाली आहेत.

पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी

जागतिक बँकेने (World bank) पाकिस्तानची  स्थिती दाखवून जगासमोर लाजवले आहे. जागतिक बँकेने स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचे आर्थिक मॉडेल अपयशी ठरले आहे. इथे गरिबांसाठी काहीच नाही. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी सर्व धोरणे आखली जात आहेत. पाकिस्तानमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. डॉन वृत्तपत्राने जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर नाजी बेनहासीनच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.  पाकिस्तानला अशी धोरणे बदलण्याची गरज आहे, की ज्याचा देशाच्या विकासावर परिणाम झाला आहे.  पाकिस्तानच्या धोरणाचा फायदा काही लोकांनाच झाला असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. हवामान बदलाचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. सध्या पाकिस्तानने त्यांची कृषी क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील धोरणे सुधारली पाहिजेत असं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे. शेती, अनुदान आणि इतर अनेक उणिवा दूर करण्याची गरज आहे. जेणेकरून देशातील छोट्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकेल असं बेनहासीन म्हणाले . तसेच, अधिकाधिक लोकांना शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. पाकिस्तानच्या खराब आर्थिक मॉडेलमुळं तो आपल्या सहकारी देशांच्या तुलनेत खूपच मागे पडला असल्याचं मत बेनहासीन यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तान खूपच मागे, गरिबी दूर करण्यासाठी पाकिस्ताननं काय करावं? जागतिक बँकेनं दिल्ला 'हा; सल्ला 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोठी भर, सोने आणि विदेशी गुंतवणुकीमुळं वर्षभरातच 20.6 टक्क्यांची वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत मोठी भर, सोने आणि विदेशी गुंतवणुकीमुळं वर्षभरातच 20.6 टक्क्यांची वाढ
तुम्हाला माहीत आहे का की कमजोर रुपया तुमचा पोर्टफोलिओ परतावा कसा वाढवू शकतो?
तुम्हाला माहीत आहे का की कमजोर रुपया तुमचा पोर्टफोलिओ परतावा कसा वाढवू शकतो?
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget