एक्स्प्लोर

Loan on India : भारतावर गेल्या 10 वर्षात विदेशी कर्ज किती वाढलं? सरकारनं आकडेवारी मांडली, सत्य समोर

Loan on India : गेल्या 10 वर्षात भारतावरील विदेशी कर्ज किती वाढलं या संदर्भातील आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडली आहे.

नवी दिल्ली : भारतात गेल्या 10 वर्षात विदेशी कर्ज 250 अब्ज डॉलर्सनं वाढलं आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय वित्त मंत्रालयामार्फत हे उत्तर देण्यात आलं आहे. वित्त मंत्रालयाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की 31 मार्च 2014  रोजी भारतावर विदेशी कर्ज किती होतं? आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत कर्ज किती वाढलं आहे. 

अर्थमंत्रालयानं मात्र सप्टेंबर 2024 पर्यंतची आकडेवारी मांडली आहे. त्यानुसार देशावर 711.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं विदेशी कर्ज आहे. तर, मार्च 2014 मध्ये 446.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं विदेशी कर्ज होतं. म्हणजेच गेल्या 10 वर्षात भारतावरील विदेशी कर्ज 265 अब्ज डॉलर्सनं वाढलं आहे. 

कर्ज वाढून किती झालं? वित्त मंत्रालयानं उत्तर दिलं

वित्त मंत्रालयानं या उत्तरासोबत आणखी माहिती दिली. भारतानं 2013-14 मध्ये विदेशी कर्जावर व्याज 11.20 अब्ज अमेरिकनं डॉलर्स इतकं दिलं होतं. तर, 2023-24 मध्ये अंदाजे 27.10 अब्ज डॉलर्स इतकं व्याज दिलं आहे. 

विरोधी पक्षांचा सरकारवर हल्लाबोल 

काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांनी सातत्यानं विदेशी कर्जाच्या मुद्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांच्या मते यूपीए सरकारच्या काळात जितकं विदेशी कर्ज भारतावर होतं त्यात एनडीए सरकार आल्यानंतर 50 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांच्या काळात ही वाढ झाली आहे. 

मोदी सरकारकडून सातत्यानं विदेशातून कर्ज घेतलं जात आहे. त्यामुळं देशातील प्रत्येक नागरिकांवर हजारो रुपयांचं कर्ज वाढत आहे. विरोधी पक्षांनी या मुद्यांवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रावर किती कर्ज ?

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये महाराष्ट्रावर किती कर्ज आहे याची माहिती दिली. महाराष्ट्रावरील कर्जाची रक्कम 9 लाख 32हजार कोटींवर जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला तेव्हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक कर्ज महाराष्ट्रावर झालं आहे. महाराष्ट्रावरील कर्ज 8 लाख 39 हजार कोटींवर गेलं आहे.  केंद्र आणि आरबीआयनं राज्य सरकारांनी किती कर्ज काढावं याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार राज्याच्या उत्पन्नाच्या एकूण 25 टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते. राज्याचे प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत आहे.

इतर बातम्या :

Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 

7 रुपयांचा शेअर 1800 रुपयांवर, 1 लाख रुपये असणाऱ्यांचे झाले 2 कोटी 33 लाख, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर कोणता? 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
पॅन कार्ड न घेताच 1 लाख 54 हजार लोकांची उघडली बँक खाती, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget