एक्स्प्लोर

Railway Budget : रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे तब्बल 92 वर्ष सादर व्हायचा, परंपरा कधीपासून बंद झाली? कारण काय? 

Railway Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण रेल्वेसाठी कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय  

Railway Budget नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवारी म्हणजे उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे देशातील प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक क्षेत्राचं आणि प्रत्येक वर्गाचं लक्ष लागलं. या अर्थसंकल्पाकडून अनेकांना खूप अपेक्षा आहेत. रेल्वेला देखील अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे देशातील नागरिकांचं लक्ष असतं. मोठ्या प्रमाणावर नागरिक रेल्वेनं प्रवास करत असतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर व्हायचा. मात्र, 2017-18 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्र सादर करणं बंद झालं.

Railway Budget : 92 वर्ष स्वतंत्रपणे अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात संरक्षण, आरोग्य, शिक्षण यासारखे स्वतंत्र विभाग असतात. रेल्वे देखील आता मुख्य अर्थसंकल्पाचा भाग झाला आहे. भारतात रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात 92 वर्षापूर्वी झाली होती. 1924 पासून इंग्रज सरकारच्या काळात स्वतंत्रपणे अर्थ संकल्प सादर करण्यात येत होता. विशेष समितीनं रेल्वेचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्यानं मुख्य अर्थसंकल्पाऐवजी स्वतंत्रपणे रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करावा, अशी भूमिका त्यावेळी घेतली गेली होती. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील ही परंपरा कायम होती. तब्बल 92 वर्ष ही परंपरा सुरु होती. रेल्वे मंत्री रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करायचे. त्यात रेल्वेचा खर्च, रेल्वेचं उत्पन्न यासह इतर गोष्टींचा समावेश असायचा.  

रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प कधीपासून बंद

2016-17 पर्यंत रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्यात येत होता. रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणं बंद करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल नीती आयोगाच्या विवेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणं बंद करावा या 2016 मध्ये केलेल्या शिफारशीपासून मिळाली. देबरॉय आणि अर्थतज्ज्ञ किशोर देसाई यांनी म्हटलं की भारत हा एकमेव देश आहे जिथं रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जातो. वित्तीय व्यवस्थापन अधिक आधुनिक करणे आणि सरकारी खर्चाचं स्पष्ट चित्रमांडण्यासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पाला मुख्य अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी सूचना देण्यात आली होती. 

केंद्र सरकारनं यानंतर समितीच्या शिफारशीबाबत चर्चा केली. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी समितीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा विषय संसदेत मांडला. 2017-18 पासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणं बंद केलं गेलं.  

रेल्वे अर्थसंकल्पाला मुख्य अर्थसंकल्पात समाविष्ट केल्याचे खाही फायदे झाले. रेल्वे अर्थसंकल्पाची तयारी आणि संसदेत यावरील चर्चा यासाठी स्वतंत्र वेळ द्यावा लागायचा. रेल्वेकडून सरकारला मिळणारा लाभांश संपला, यामुळं रेल्वेवरील आर्थिक ताण कमी झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget