एक्स्प्लोर

VRS Scheme : एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना पुन्हा स्वेच्छा निवृत्तीची ऑफर

VOLUNTARY RETIREMENT : टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियानं पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजनेची ऑफर दिली आहे.

Air India VRS Scheme : नॉन फ्लाइंग कर्मचार्‍यांना टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियानं पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजनेची (VOLUNTARY RETIREMENT - VRS) ऑफर दिली आहे. टाटा समुहाने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर वर्षभरात कर्मचाऱ्यांना अशी दुसऱ्यांदा ऑफर दिली आहे. स्वेच्छा निवृत्ती (VRS) ऑफरद्वारे एअर इंडियाला कर्मचार्‍यांचा खर्च कमी करायचा. त्याशिवाय कर्मचारी कपात टाळण्यासाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचं समजतेय. एअर इंडियाने 30 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे.   

टाटा समुहाने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडिया ताब्यात घेतलं. त्यानंतर आता दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे. स्वेच्छा निवृत्तीची ऑफर 40 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या आणि एअरलाईनमध्ये कमीत कमी पाच कायमस्वरुपी वर्ष सेवत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आहे. त्याशिवाय लिपिक किंवा नॉन स्कील श्रेणीतील कर्मचारी ज्यांनी किमान पाच वर्षे सेवा केली असेल ते सु्द्धा स्वेच्छा निवृत्तीची ऑफर स्विकारु शकतात. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियातील जवळपास 2100 कर्मचारी  स्वेच्छा निवृत्ती योजनेचा (VOLUNTARY RETIREMENT - VRS) लाभ घेऊ शकतात. 17 मार्च ते 30 एप्रिल 2023 पर्यंत कर्मचारी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. 31 मार्च 2023 पर्यंत स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना एक्स ग्रॅशिया शिवाय एक लाख रुपये देण्यात येणार आहे. 

जानेवारी 2022 मध्ये टाटा समुहाने एअर इंडियाची सुत्रे हातात घेतली. त्यानंतर जून 2022 मध्ये एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजनेची (VOLUNTARY RETIREMENT - VRS) ऑफर दिली होती. 4200 पात्र कर्मचाऱ्यांपैकी 1500 जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. त्यावेळी त्यांना एक्स ग्रॅशियाशिवाय एक लाख रुपये मिळाले होते. आता दुसऱ्यांना एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीची ऑफर दिली आहे. जवळपास 2100 कर्मचारी या योजनेसाठी पात्र असल्याचे समजतेय. 

एअर इंडियाची Vihaan.AI योजना

एअर इंडियाने  सप्टेंबर 2022 मध्ये Vihaan.AI परिवर्तन योजना जाहीर केली होती. या योजनेद्वारे 5 वर्षांच्या कालावधीत विविध उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. या योजनेद्वारे एअर इंडियाला विकसित, फायदेशीर आणि बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवणारी एअरलाइन बनवणं हा उद्देश आहे. सध्या यावर काम सुरु आहे. 

एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार
एअर इंडिय एकूण 840 एअरबस (Airbus) आणि बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार आहे. अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यातील हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget