एक्स्प्लोर

राजकारणातील 'गंगा' लुप्त!

संघर्ष, जिद्द, मेहनत, अभ्यासूपणा, प्रामाणिकपणाच व्यक्तीला समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही मानसन्मान मिळून देते. सुषमाजींमधल्या याच गुणांमुळे विरोधकही त्यांचं नाव आदराने घेतात.

भारतीय महिला कशी असावी? तिचं बोलणं, वागणं, तिचा पेहराव, तिची निर्णय घेण्याची क्षमता कशी असावी? याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. नेहमी साडीतच वावरणाऱ्या, भांगेत, कपाळावर मोठं कुंकू..त्यांच्याकडे पाहिल्यावरच प्रसन्न वाटायचं. 21व्या शतकातल्या महिलांचा पेहराव पाहिला की एक महिला राजकीय व्यक्ती म्हणून सुषमा स्वराज नेहमीच वेगळ्या आणि प्रभावशील वाटायच्या. त्यांचा प्रभाव हा फक्त त्यांच्या कपड्यातूनच नाही तर त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वातूनही पडायचा. सुषमा स्वराज संसदेत बोलायला उभ्या राहिल्या की त्यांचं मुद्देसूद बोलणं, बोलण्यातला करारीपणा भल्याभल्यांना गार करायचा. भाजपमधल्या अटलबिहारी वाजपेयींनंतरच्या प्रभावी वक्त्या म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिलं जायचं. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला दिलेलं रोखठोक प्रत्युत्तर असो की देशाची कन्या 'गीताला'  पाकिस्तानातून परत आणणं असो.. एका स्त्रीचा कडकपणा आणि तिच्यातलं ममत्व याचं दर्शन घडलं ते सुषमा स्वराज यांच्यात.. संघर्षातून केलेली वाटचाल, घरदार, सामाजिक भूमिका, देशाच्या मंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळणं हे किती आव्हानात्मक असू शकतं हे एक महिला म्हणून मी कल्पना करु शकते. राजकारणातली महिला म्हटलं की तिच्याकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. मात्र स्वच्छ प्रतिमेच्या सुषमा स्वराज यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत आपलं वेगळेपण ठसवलं, दाखवून दिलं. परदेश दौरे करताना आपल्या वेशभूषेत बदल न करता समोरच्याचाही आदर ठेवत कसं वागावं बोलावं हे खरंच सुषमाजींनी शिकवलंय. भाजपच्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असो वा केंद्रातल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अगदी सक्षमपणे सांभाळल्या. प्रेमाने बोलणं, प्रेमाने समजून घेणं हा त्यांचा स्वभावच प्रत्येकाला आपलंसं करायचा. कदाचित त्यामुळेच ट्विटरवर, सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नव्हे त्यांच्या समर्थनार्थच प्रतिक्रिया जास्त दिसायच्या. त्या सक्रीय राजकारणात नसल्या तरी त्यांची सामाजिक मुद्द्यांवरची सक्रीयता सतत दिसून आलीय. संघर्ष, जिद्द, मेहनत, अभ्यासूपणा, प्रामाणिकपणाच व्यक्तीला समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही मानसन्मान मिळून देते. सुषमाजींमधल्या याच गुणांमुळे विरोधकही त्यांचं नाव आदराने घेतात. गंगेला आपण पावन, निर्मळ मानतो. सुषमा स्वराज या राजकारणातल्या 'गंगा' मला वाटतात. एक कर्तृत्ववान भारतीय महिला राजकारणी ही कशी असते.. हे सुषमा स्वराज यांनी जगाला दाखवून दिलं. भारतीय महिला शक्तीचं प्रेरणादायी उदाहरण असलेल्या सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget