एक्स्प्लोर

आमची नाईटिंगेल' : लता 'दीदी' आणि तिची चिरस्थायी लोकप्रियता!

मुंबईत (mumbai) असताना रविवारची सकाळ एक दु:खद बातमी घेऊन आली ती सर्वात लोकप्रिय ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी यांच्या निधनाची.. भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल विविध गोष्टी सांगण्यात येतात, परंतु त्या इतक्या लोकप्रिय का झाल्या असाव्यात? ज्याबाबत कदाचित फार कमी वेळा संशोधन करण्यात आले असावे. महिला पार्श्वगायिकांमध्ये लतादीदींची कधीच बरोबरी नव्हती, पुरुष पार्श्वगायकांमध्ये एकट्या मोहम्मद रफी (mohammad rafi) यांनी त्यांना लोकप्रियतेत टक्कर दिली होती. लतादीदी जर ‘मेलोडी क्वीन’होत्या, तर रफी हे ‘मेलडी किंग’ होते.  पण लतादीदींना रफी साहेबांच्या पेक्षाही दीर्घायुष्य लाभले, रफी यांचे निधन वयाच्या 55 वर्षी झाले.
याबाबत असाही तर्क केला जातो की, त्यांच्या बहीण आशा भोसले यांनी पार्श्वगायनामध्ये काही काळ गाजवला होता.


आशा भोसलेंच्या पार्श्वगायनाचेही मोठ्या संख्येने चाहते आहेत, अनेकांचा असा दावा आहे की, आशाताई मोठ्या बहिणीपेक्षा अधिक अष्टपैलू होत्या. पण आशाताईंपेक्षा लतादीदी अधिक लोकप्रिय होत्या की नाही? या प्रश्नाबाबत हा 'वाद' कधीच सुटू शकत नाही किंवा कदाचित सुटणारही नाही. कारण दोघींच्या गायकीचे चाहते अनेक आहेत. लतादीदींच्या लोकप्रियतेचा दाखला द्यायचा झाला तर, त्यांचे निधन झाल्यापासून अनेक माध्यमांनी त्यांच्या गाण्यांवर तसेच त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. काहींचे म्हणणे आहे की, लतादीदींनी तब्बल 36 भाषांमध्ये गाणे गायले आहे, तर काहींनी सुमारे 15 ते 20 भाषांसाठी गाणे गायल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विविध भाषेचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय बहुसंख्य लोक एकाच भाषेत उत्कृष्ट गाऊ शकत नाहीत, हे लक्षात घेता, लतादीदींनी मात्र विविध भाषेतील गायलेलं उत्कृष्ट गाणं त्यांच्या विलक्षण गुणांची अनुभुती दर्शविण्यास पुरेसे आहे.  या सर्व गोष्टी लतादीदींनी गायलेल्या गाण्यांच्या भोवती एकवटल्या आहेत. काहींनी लतादीदींनी आतापर्यंत 25,000 किंवा 30,000 गाणी गायल्याचा उल्लेख केला आहे. तर बीबीसीने, लतादीदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त यश चोप्रा यांचा लेख सादर करत, त्यांच्या '50,000 गाण्यांचा' उल्लेख केला आहे. न्यूयॉर्क टाइम्समधील लेख लतादीदींनी गायलेल्या 'हजारो गाण्यांबद्दल' उत्स्फुर्तपणे बोलतो. अनेक भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब होती की, त्यांना 1974 मध्ये  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांना 'संगीत इतिहासातील सर्वात जास्त रेकॉर्ड केलेली कलाकार' म्हणून मान्यता मिळाली होती, त्यावेळी हा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी मोहम्मद रफी यांनी यांनी देखील या वादात उडी घेतली होती, 2011 मध्ये गिनीज बुकने आशा भोसले यांना सर्वात मोठ्या संख्येने ‘सिंगल स्टुडिओ रेकॉर्डिंग’चा विश्वविक्रम केल्याचे मान्य केले. तर 2016 मध्ये तेलुगू चित्रपटांतील ज्येष्ठ पार्श्वगायिका असलेल्या पुलपाका सुशीला मोहन यांना हा सन्मान मिळाला होता,


भारत हा गाण्यांचे वेड असलेला देश आहे आणि चित्रपट संगीताच्या रसिकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे, हे लक्षात घेता, लतादीदींनी किती गाणी सादर केली हे कोणालाही ठाऊक नाही. जे आश्चर्यकारक आहे. इतर बाबतीतही लतादीदींना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ म्हणून संबोधण्यात आले.  1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात  'जीके' सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात असे छापण्यात आले की, 'पंजाबचे सिंह' लजपत राय, 'फ्रंटियर गांधी हे खान अब्दुल गफार खान आणि 'देशबंधू' म्हणजेच ('फ्रेंड ऑफ द नेशन') चित्तरंजन दास होते. तसेच 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' सरोजिनी नायडू होत्या, लता मंगेशकर नाही. सरोजिनी नायडू, अर्थातच, एक जाज्वल्य स्वातंत्र्यसैनिक, गांधींच्या जवळच्या सहकारी आणि स्वातंत्र्यानंतर संयुक्त प्रांताच्या राज्यपाल होत्या. त्या एक निपुण कवयित्री देखील होत्या. ज्यांना विविध इंग्रजी लेखकांनी भारतातील इंग्रजीतील सर्वोत्तम कवयित्री म्हणून संबोधले आहे. पण सरोजिनी नायडू या गायिका नव्हत्या, त्यांच्या कवितेतील भावनिक गुणांमुळे त्यांना मोहनदास गांधी यांनी त्यांना ‘भारत कोकिळा’म्हणून संबोधले. गांधी तेव्हा इंग्रजी परंपरेचे पालन करत होते. ज्यांनी नाइटिंगेलशी 'साहित्य आणि कविता' दीर्घकाळ जोडली. त्यावेळी विशेषतः, इंग्रजी रोमँटिक कवींना नाइटिंगेलने मंत्रमुग्ध केले होते, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध जॉन कीट्स यांचे ‘ओड टू अ नाईटिंगेल’या पुस्तकातील एक इंग्रजी कविता मुख्यस्थानी आहे. ज्यामध्ये लतादीदींच्या आवाजाबद्दल भारतीय जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Thou was not born for death, immortal Bird!
No hungry generations tread thee down;
The voice I hear this passing night was heard
In ancient days by emperor and clown . .

जॉन कीट्स यांचा मित्र पर्सी बायसे शेली, यांनी त्यांच्या प्रसिद्ध 'डिफेन्स ऑफ पोएट्री'मध्ये असे लिहिले आहे की, नाइटिंगेलने जगाला एक आशा दिली याबाबत शंका नाही. कवीनं लिहलंय की, 'कवी एक कोकिळा आहे, जो अंधारात एकांत बसतो आणि स्वतःला आनंद देण्यासाठी गोड आवाजांसह गातो.. गांधींना माहित होते की नाइटिंगेल हा भारतीय पक्षी नाही; त्यानंतर त्यांनी सरोजिनी नायडू यांना ‘कोकिला’ या नावाने संबोधले. माहितीनुसार फक्त नर नाइटिंगेल गातात. मादी अजिबात गात नाही; नर नाइटिंगेल, ज्यामध्ये 1000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या आवाजांचा विशाल आणि आश्चर्यकारक संग्रह आहे, ज्याची तुलना ब्लॅकबर्ड पक्ष्याच्या आसपास आहे

लतादीदींच्या लोकप्रियतेचे मोजमाप केले तरी, एक प्रश्न समजून घेणे बाकी आहे की कशामुळे त्यांची लोकप्रियता इतकी वाढली? की त्या देशाच्या आवाज बनल्या. तसेच त्या अनेक दशके शीर्षस्थानी कशा राहिल्या? अनेकांसाठी, उत्तर स्पष्ट आहे. लतादीदींचा आवाज दुर्मिळ होता, त्यांची गायकी निर्दोष होती आणि त्यांचा सूर परिपूर्ण होता. असा दावा केला जातो की, त्यांच्या गायनातून त्या अभिव्यक्त होत होत्या. लतादीदी ज्या अभिनेत्रीसाठी गायच्या त्या अभिनेत्रीसाठी गाण्यातील अभिनय करणं सोपं जात होतं. बायोग्राफर नसरीन मुन्ना कबीर सांगतात की, गाण्याचा मूड आणि शब्दांचा अर्थ टिपण्याची देणगी लतादीदींनाही होती. लतादीदींमध्ये जिद्द आणि शिस्तही होती. 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1960 च्या दशकात चित्रपटांमध्ये गाण्यासाठी उर्दू जाणून घेणे आवश्यक होते आणि लतादीदींना ते शिकावे लागले;  तसेच लतादीदींचा हा किस्सा त्यावेळचा प्रसिद्ध आहे, जेव्हा दिलीप कुमारने लतादीदींच्या उर्दू बोलण्यावर विनोद केला होता. लतादीदींनी त्यांच्या उर्दू भाषेवर इतके काम केले की, जावेद अख्तरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांनी एकदाही लतादीदींचा उर्दू भाषेचा उच्चार चुकीचा ऐकला नाही. ते म्हणतात, लतादीदींना पहिल्यांदा गाणं मिळाल्यानंतर पंधरा मिनिटांत त्या गाणं गाण्यासाठी तयार असायच्या, त्यांनी अक्षरशः गाण्यावर प्रभुत्व मिळवले होते. लतादीदींकडे आणखी काही गुण होते. जे त्यांचे स्वतःचे होते आणि जावेद अख्तर यांनी याचे श्रेय शब्दांच्या पलीकडे असल्याचे सांगितले.


याही पलीकडे, मी असे सांगेन की, लतादीदींना देशाची हार्टथ्रोब बनणे शक्य झाले. 1949 मध्ये अनेक चित्रपटांमध्ये गायलेली गायिका म्हणून त्यांची ख्याती राष्ट्रीय स्तरावर उदयास आली, त्यापैकी बरेच हिटही ठरले. महल, बरसात, अंदाज, बाजार, दुलारी, आणि पतंगा. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि देशासमोरील अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न महिलांच्या स्थितीशी संबंधित होता. 1920-22 मध्ये महिला पहिल्यांदा गांधींच्या असहकार आंदोलनात उतरल्या. सॉल्ट मार्च आणि त्यानंतरच्या सत्याग्रहांमुळे या प्रवृत्तीला वेग आला. परंतु, इतर बहुतेक बाबतीत, महिला सार्वजनिक क्षेत्राचा भाग नव्हत्या, संविधानात भारतीय समाजात महिलांना समान स्थान देण्याची कल्पना जरी असली तरी, प्रचलित भावना अशी होती की,  स्त्रियांनी प्रामुख्याने घरगुती कामचं पाहावीत. एक उदाहरण घ्यायचं झालं तर, कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा बंडात (1946-51) महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी अभ्यासातून असे दिसून आलंय की, या बंडात महिलांनी पुरुषांपेक्षाही अधिक रायफल चालवल्या आणि बंड संपल्यानंतर त्याच महिलांनी स्वयंपाकघरात परतावे अशी अपेक्षा करण्यात आली होती,

त्याचवेळी, भारत मातेची सेवा आणि त्यागाच्या कल्पनेवर स्वातंत्र्याचा लढा उभारला गेला. भारतमाता म्हटलं तर जगातील बहुतेक भागांमध्ये राष्ट्राला स्त्रीलिंगी अस्तित्व म्हणून समजले जाते, हिंदू धर्माने अजूनही विविध प्रकारे स्त्रीत्वासाठी जागा राखून ठेवली आहे. विविध देवीपूजा अजूनही देशाच्या जवळजवळ सर्व भागांमध्ये आढळते, स्वातंत्र्यानंतर, भारतमातेच्या कल्पनेला नवा अवतार द्यावा लागला आणि नंतर, सुदैवाने, लतादीदींचा समावेश झाला. ज्यांनी स्त्रीलिंगी तत्त्वाची कल्पना मांडली. जिथे आधीच्या पिढीतील प्रमुख महिला गायकांचा आवाज जड, विरुद्धार्थी आवाज होता, बहुतेकदा त्यांचा आवाज पुरुषासारखाच असायचा, जसे की मलिका पुखराज आणि जोहराबाई अंबावली... लतादीदींनी आवाजाची सुरुवात काहीशा मुलीसारखा आणि काहीशी तिरस्करणीय आवाजाने केली. पहिल्याच चित्रपटात, महल (1949) मध्ये हा विरोधाभास दिसून येतो, जिथे लतादीदी आणि जोहराबाई या दोघीही पहिल्यांदा एकत्र दिसल्या, लतादीदींनी गायले 'आयेगा आएगा आनेवाला', ज्याने सर्वांची तारांबळ उडाली, पण मादक मुजरा, 'ये रात' फिर ना आएगी, जोहराबाईंनी सादर केले आहे. लतादीदींचा आवाज असा होता की, ज्याने स्त्रियांना राष्ट्राच्या नैतिकतेचे संरक्षक म्हणून उभे केले. यामुळे लतादीदींना त्यांच्या आधीच्या पिढीपासून खूपच दूर केले गेले, ज्यापैकी काहींना स्त्री गायकांना लागलेल्या कलंकांविरुद्ध संघर्ष करावा लागला होता.


हिंदी चित्रपटातील गाण्याच्या इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे,  लता आणि आशा भोसले यांना ऐकलेल्या प्रत्येक श्रोत्याला माहीत आहे की, दोन बहिणींच्या कलात्मक मार्गात लक्षणीय फरक आहे, याबाबत असेही सांगण्यात येते की, लता एका विशिष्ट प्रकारच्या स्त्रीत्वासाठी बोलतात, ज्यामुळे त्यांना राष्ट्राच्या कल्पनेशी वेगळे नाते जोडले जाते. जर लताचे गायन अधिक भावपूर्ण असेल, तर आशा भोसलेंच्या गायनात वेगळे वैशिष्ट्य आहे. लतादीदींनी व्हॅम्पची गाणी गायली नाहीत, परंतु आशाताईंनी स्त्रीत्वाला लैंगिक अनुभूती दिली. ज्यांनी फक्त व्हॅम्प किंवा मुजरा गाणी गायली. आशाताईंच्या आवाजात साकारलेली स्त्रीत्वची गाणी कामुकतेला सूचित करते, तसेच अधूनमधून त्यांच्या गाण्यात प्रेमळपणाच्या सीमारेषा असते. हे जर आपल्याला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, लतादीदींच्या लोकप्रियतेचा स्त्रोत केवळ त्यांच्याबद्दल सांगितल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीत सापडू शकतो. परिपूर्ण सूर, निर्दोष उच्चार, भावपूर्ण गायन आणि प्रत्येक गाण्याचा मूड समजून घेण्याची प्रतिभा. शब्दांच्या पलीकडे घेऊन जाते. 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले

व्हिडीओ

Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report
Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
Embed widget