एक्स्प्लोर

पुन्हा इंग्लंडचा अडथळा...

2017 चा वन डे विश्वचषक आणि त्यानंतर 2018च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघाचा विजेतेपदाचा तो घास भारताकडून दोन्ही वेळा एकाच संघानं हिरावून घेतला आणि आता तोच संघ पुन्हा एकदा अडथळा बनून भारतासमोर उभा ठाकलाय आणि हरमनप्रीतच्या संघासाठी हीच मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.

हरमनप्रीत कौरची वुमेन ब्रिगेड यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली ती विजेतेपदाच्या निर्धारानं. भारतीय महिलांचा हा निर्धार किती पक्का आहे हे साखळी फेरीतल्या निर्विवाद वर्चस्वानं आपण पाहिलं. पण आता... 2017 चा वन डे विश्वचषक आणि त्यानंतर 2018च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघ विश्वविजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण विजेतेपदाचा तो घास भारताकडून दोन्ही वेळा एकाच संघानं हिरावून घेतली. आणि आता तोच संघ पुन्हा एकदा अडथळा बनून भारतासमोर उभा ठाकलाय.... ती आहे हेदर नाईटची इंग्लिश फौज... भारत आणि इंग्लंड सिडनीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येत आहेत. या लढतीत भारतीय संघाला त्या दोन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी खरं तर चालून आली आहे. पराभवाची ती सल आणि पहिल्या विजेतेपदाची संधी ज्या संघानं दोन वेळा हिरावून घेतली त्या संघाला उपांत्य फेरीत टक्कर देणं ही खरं तर भारतासाठी उजवी बाजू मानायला हवी. कारण एक तर करो या मरोची स्थिती आणि जुन्या जखमांची सल ह्या दोन गोष्टी आत्मविश्वास उंचावणाऱ्या ठरतात. 2011 चा विश्वचषक आपल्याला आठवतंच असेल. 2003 साली ज्या ऑस्ट्रेलियानं आपल्या ताकदवर फौजेसह सौरव गांगुलीच्या टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये सहज हरवलं, तीच बलाढ्य ऑस्ट्रेलियन फौज 2011 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून पराभूत झाली. समोरचा संघ तेव्हाही त्याच ताकदीचा होता. पण धोनीच्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वरचढ ठरला. क्रिकेट हा खेळ जेवढा शारीरिक क्षमतेनं खेळला जातो त्यापेक्षा कैक पटीनं जास्त तो डोक्य़ानं खेळला जातो. आणि हरमनप्रीतच्या संघासाठी तीच मोठी अग्निपरीक्षा ठरावी. पण साखळी फेरीत वर्चस्व गाजवलेला भारतीय संघ खरंच तितका ताकदवर आहे का? तर नाही. या विश्वचषकात गोलंदाजी ही भारतीय संघाची उजवी बाजू ठरतेय. प्रभावी माऱ्याच्या जोरावर आपण बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही नमवलं. पण फलंदाजीत भारतीय महिलांनी निराशा केली. एकट्या शेफाली वर्मानं धावांचा रतीब घातला. पण दुसरीकडे स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचं भारताच्या साखळी फेरीतल्या विजयातलं योगदान अगदीच नगण्य आहे. स्मृतीनं या स्पर्धेत तीन सामन्यांत 38 तर हरमनला चार सामन्यांत केवळ 26 धावाच करता आल्या आहेत. भारताच्या या अनुभवी आणि जबाबदार खेळाडूंची विश्वचषकासारख्या व्यासपीठावरची ही कामगिरी निश्चितच समाधानकारक नाही. त्यामुळे बाद फेरीच्या निर्णायक लढतीत त्या दोघींना आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. इंग्लंडच्या ताफ्यातही कर्णधार हेदर नाईटसह अमी जोन्स, ट्रॅमी ब्यूमाँट, अना श्रबसोल, डॅनीएला वेटसारख्या मातब्बर खेळाडू आहेत. त्यामुळे माजी विजेत्यांसमोर भारतीय संघाचा कस लागेल. महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारताचं आव्हान याआधी तीन वेळा उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. 2009आणि 2010 सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर गेल्या विश्वचषकात इंग्लंडनच भारताला अंतिम फेरी गाठण्यापासून रोखलं होतं. आता त्याच इंग्लंडचा अडथळा दूर करुन भारतीय महिला पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar:  22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget