एक्स्प्लोर

पुन्हा इंग्लंडचा अडथळा...

2017 चा वन डे विश्वचषक आणि त्यानंतर 2018च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघाचा विजेतेपदाचा तो घास भारताकडून दोन्ही वेळा एकाच संघानं हिरावून घेतला आणि आता तोच संघ पुन्हा एकदा अडथळा बनून भारतासमोर उभा ठाकलाय आणि हरमनप्रीतच्या संघासाठी हीच मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.

हरमनप्रीत कौरची वुमेन ब्रिगेड यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली ती विजेतेपदाच्या निर्धारानं. भारतीय महिलांचा हा निर्धार किती पक्का आहे हे साखळी फेरीतल्या निर्विवाद वर्चस्वानं आपण पाहिलं. पण आता... 2017 चा वन डे विश्वचषक आणि त्यानंतर 2018च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघ विश्वविजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण विजेतेपदाचा तो घास भारताकडून दोन्ही वेळा एकाच संघानं हिरावून घेतली. आणि आता तोच संघ पुन्हा एकदा अडथळा बनून भारतासमोर उभा ठाकलाय.... ती आहे हेदर नाईटची इंग्लिश फौज... भारत आणि इंग्लंड सिडनीत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येत आहेत. या लढतीत भारतीय संघाला त्या दोन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी खरं तर चालून आली आहे. पराभवाची ती सल आणि पहिल्या विजेतेपदाची संधी ज्या संघानं दोन वेळा हिरावून घेतली त्या संघाला उपांत्य फेरीत टक्कर देणं ही खरं तर भारतासाठी उजवी बाजू मानायला हवी. कारण एक तर करो या मरोची स्थिती आणि जुन्या जखमांची सल ह्या दोन गोष्टी आत्मविश्वास उंचावणाऱ्या ठरतात. 2011 चा विश्वचषक आपल्याला आठवतंच असेल. 2003 साली ज्या ऑस्ट्रेलियानं आपल्या ताकदवर फौजेसह सौरव गांगुलीच्या टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये सहज हरवलं, तीच बलाढ्य ऑस्ट्रेलियन फौज 2011 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून पराभूत झाली. समोरचा संघ तेव्हाही त्याच ताकदीचा होता. पण धोनीच्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वरचढ ठरला. क्रिकेट हा खेळ जेवढा शारीरिक क्षमतेनं खेळला जातो त्यापेक्षा कैक पटीनं जास्त तो डोक्य़ानं खेळला जातो. आणि हरमनप्रीतच्या संघासाठी तीच मोठी अग्निपरीक्षा ठरावी. पण साखळी फेरीत वर्चस्व गाजवलेला भारतीय संघ खरंच तितका ताकदवर आहे का? तर नाही. या विश्वचषकात गोलंदाजी ही भारतीय संघाची उजवी बाजू ठरतेय. प्रभावी माऱ्याच्या जोरावर आपण बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही नमवलं. पण फलंदाजीत भारतीय महिलांनी निराशा केली. एकट्या शेफाली वर्मानं धावांचा रतीब घातला. पण दुसरीकडे स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरचं भारताच्या साखळी फेरीतल्या विजयातलं योगदान अगदीच नगण्य आहे. स्मृतीनं या स्पर्धेत तीन सामन्यांत 38 तर हरमनला चार सामन्यांत केवळ 26 धावाच करता आल्या आहेत. भारताच्या या अनुभवी आणि जबाबदार खेळाडूंची विश्वचषकासारख्या व्यासपीठावरची ही कामगिरी निश्चितच समाधानकारक नाही. त्यामुळे बाद फेरीच्या निर्णायक लढतीत त्या दोघींना आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. इंग्लंडच्या ताफ्यातही कर्णधार हेदर नाईटसह अमी जोन्स, ट्रॅमी ब्यूमाँट, अना श्रबसोल, डॅनीएला वेटसारख्या मातब्बर खेळाडू आहेत. त्यामुळे माजी विजेत्यांसमोर भारतीय संघाचा कस लागेल. महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात भारताचं आव्हान याआधी तीन वेळा उपांत्य फेरीत संपुष्टात आलं आहे. 2009आणि 2010 सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर गेल्या विश्वचषकात इंग्लंडनच भारताला अंतिम फेरी गाठण्यापासून रोखलं होतं. आता त्याच इंग्लंडचा अडथळा दूर करुन भारतीय महिला पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
Siddharth Jadhav on Ranveer Deepika Reception: 'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
Embed widget