एक्स्प्लोर

दशक्रिया सिनेमाला विरोध का?

मात्र, जन्माला येताना जितके विधी होत नाहीत, त्यापेक्षा जास्त विधी मृत्यूनंतरच्या 13 दिवसात करुन घेतले जातात. त्यावर ब्राह्मण महासंघाकडून 'ब्र' ही काढलं जात नाही. विधीच्या नावावर हे इतकी लूट करतात की, त्या गरीब ब्राह्मणाचं कुटुंबच कर्जबाजारी होतं. त्याला सोडवण्यासाठी कोणी येत नाही. केवळ सर्व येऊन सांत्वन करुन, चांगलं दहा दिवस खाऊन जातात. अन् या दुकानदारीवर सिनेमातून भाष्य केलं तर त्याला विरोध का व्हावा? हे विचित्रच म्हणावं लागेल.

कालच दशक्रिया सिनेमाचा ट्रेलर पाहिला. ट्रेलरमुळे सिनेमाचा विषय चांगला वाटला. यातील एक सीन पाहून तर शालेय जीवनात शिकलेला 'स्मशानातील सोनं' धडा आठवला. कारण, यातील एक व्यक्तीरेखा त्या धड्यातील 'भीमा' या व्यक्तीरेखेसारखीच वाटली. सध्या दशक्रिया या सिनेमाला ब्राह्मण समाजाकडून विरोध होत आहे. पण हा विरोध कशासाठी हे मात्र कळत नाही. ब्राह्मण समाजाच्या मते, या सिनेमातून संपूर्ण समाजाची बदनामी होत आहे. पण ट्रेलर पाहून तर तसं मूळीच वाटत नाही. उलट यातून काही कर्मठ ब्राह्मण कशाप्रकारे सर्वसामान्यांना (तो स्वतः ब्राह्मण असला तरी) लूटतात हे दाखवण्यात आलंय. आणि हे खरंच आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एके ठिकाणी दाखवण्यात आलंय की, दशक्रिया विधीसाठी 'गोदान' केलं तरच मृतात्म्यास सद्गती मिळते. पूर्वी या दशक्रियेसाठी खरी गाय ब्राह्मणाला दान मिळायची. पण आता चांदीची गाय दान म्हणून द्यावी लागते. जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसेल, तरीही त्याला पर्याय नाही. शास्त्राचा दाखला देऊन त्याच्याकडून बळजबरीने करुन घेतलंच जातं. काही दिवसांपूर्वीच माझ्या एका जवळच्या मित्राच्या वडिलांचं अपघाती निधन झालं. अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला डॉक्टरांनी आम्ही त्यांना वाचवू म्हणत आयसीयूमध्ये दाखल केलं. पण तीन दिवसानंतर डॉक्टरांनी आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही, म्हणून हात वर केले. यानंतर डॉक्टरांनी रुग्णालयाचं बिल केलं, पाऊण लाखाच्या आसपास. अन् बिल भरल्याशिवाय पार्थिव देणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. यानंतर त्या मित्राची पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड सुरु होती. कसेबसे पैसे गोळा करुन भरले आणि अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घरी आणलं. पण यावेळी वेगळीच अडचण. गावात मोजकीच ब्राह्मण कुटुंबं आणि त्यातही शेवटचं कार्य करणारं कुणीच नाही. त्यामुळे दूरच्या गावावरुन एक भटजी आणावा लागला. त्यानं अंत्यसंस्काराचे बक्कळ पैसे घेतले. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी त्यांनी दुसरा ब्राह्मण शोधला. तोही तसाच. एका दिवसाच्या दशक्रिया विधीसाठी त्यानं 10 हजार दक्षिणा सांगितली. पण नंतर कमीजास्त करुन शेवटी सात हजारावर तो तयार झाला. मात्र, दशक्रिया विधीसाठी साहित्याची भली मोठी यादी दिली. या यादीत शिदा, नवीन वस्त्र, चांदीची गाय, एक ना अनेक गोष्टी होत्या. त्यासर्व आणून दिल्यानंतर यांनी हा विधी संपन्न केला. अन् दान म्हणून मिळणाऱ्या सर्व वस्तू स्वतःच्या झोळीत टाकल्या. पण यावेळी त्यानं कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली नाही. वास्तविक, तेही ब्राह्मणच होतं. पण तरीही त्याने त्यांच्या परिस्थितीकडे पाहिलं नाही. आता या दशक्रिया विधीनंतर आणखी काही विधी असतात, ज्यातून हे भटजी सर्वसामान्यांना लूटतात. ते म्हणजे नारायणबली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध. हे तिन्ही विधी संबंधित व्यक्तीच्या पितरांना गती मिळावी, या उद्देशाने केले जातात, असं सांगितलं जातं. तसेच त्यासाठी ‘प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या एक दशांश खर्च करावा’, असे शास्त्र सांगते, अशीही बतावणी केली जाते. यातही पुन्हा त्या संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ठीक आहे का नाही? हे पाहिलं जात नाही. शिवाय, विधी करण्याकरिता पुरुषांसाठी नवं धोतर, उपरणं, बनियन, तर महिलांसाठी साडी व इतर कपडे खरेदी करण्यास सांगितले जातात. विशेष म्हणजे, हे सर्व विधी संपल्यानंतर नंतर ती वस्त्रे दान करायला लावतात, हे वेगळं. त्याशिवाय या विधीसाठी सुवर्ण नाग तोही कमीतकमी सव्वा ग्रॅमचा, पूजेसाठी आणावा लागतो. तोही पूजेनंतर यांच्याच झोळीत जातो. अन् वरुन दक्षिणा मिळते ती वेगळीच. हे सर्व करायचं का? तर मृतात्म्यास मोक्ष मिळावा म्हणून. त्यासाठी या भटजींचं फावतंय, कारण दशक्रियेचे विधी करण्यासाठी सर्वसामान्य भटजी तयार होत नाहीत. कारण हे करणाऱ्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं म्हणे. पण हे दशक्रिया करणारे किती भटजी प्रायश्चित्त घेतात देवच जाणे. मात्र, जन्माला येताना जितके विधी होत नाहीत, त्यापेक्षा जास्त विधी मृत्यूनंतरच्या 13 दिवसात करुन घेतले जातात. त्यावर ब्राह्मण महासंघाकडून 'ब्र' ही काढलं जात नाही. विधीच्या नावावर हे इतकी लूट करतात की, त्या गरीब ब्राह्मणाचं कुटुंबच कर्जबाजारी होतं. त्याला सोडवण्यासाठी कोणी येत नाही. केवळ सर्व येऊन सांत्वन करुन, चांगलं दहा दिवस खाऊन जातात. अन् या दुकानदारीवर सिनेमातून भाष्य केलं तर त्याला विरोध का व्हावा? हे विचित्रच म्हणावं लागेल.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Tariff Countries : डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
Crime news: दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Right to Die with dignity : कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय?
कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय?
Rupee at 87 : अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, शेअर बाजारात घसरण
रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, आशियातील चलनांमध्ये घसरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 03 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणालीABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सRamdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Tariff Countries : डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची एकाचवेळी भारत आणि चीनला जाहीर धमकी, पण पहिल्या मुसक्या चीनच्याच आवळल्या; भारताचे नाव नाही, किती खोलवर परिणाम होणार?
Crime news: दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Right to Die with dignity : कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय?
कर्नाटकात सन्मानाने मरणाचा कायदा लागू, देशातील पहिलेच राज्य, पण 'तेव्हाच' सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळणार; नेमका कायदा आहे तरी काय?
Rupee at 87 : अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा परिणाम रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, शेअर बाजारात घसरण
रुपया निचांकी पातळीवर, डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच 87 पार, आशियातील चलनांमध्ये घसरण
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, शिवराजचे निलंबन केलं तसं पंचांनाही शिक्षा करा; राक्षेच्या कुटुंबीयांचा आरोप
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
ShivRaj Rakshe Family| पंचांनी ठरवून केलं, शिवी द्यायची काय गरज होती? शिवराज राक्षेची आई म्हणाली
Wife Forces Husband To Sell Kidney : फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
फेसबुकवर 'आशिक' मिळताच, नवऱ्याला म्हणाली लेकीला शिकवायला 10 लाख हवेत अन् किडनी काढून घेतली; तोच पैसा घेत सनकी बायकोने...
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात पाच आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
पाच दिवसांमध्ये पाच आयपीओ खुले होणार, पैसे तयार ठेवा, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Embed widget