हेरंब कुलकर्णी हे एक मराठी लेखक आहेत. तसेच, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. ते बऱ्याच सामाजिक विषयांवर आणि मुख्यतः शिक्षणविषयक लेखन करतात. लेखक हेरंब कुलकर्णी यांचा दारूबंदीसाठी चाललेल्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग आहे. या लढ्याला अभ्यासातून धोरणात्मक पाया देण्याचं काम केलंय. हेरंब कुलकर्णी यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. त्यामध्ये आमच्या शिक्षणाचं काय?, जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स, परीक्षेला पर्याय काय?, बखर शिक्षणाची, शाळा आहे - शिक्षण नाही!, सहावा वेतन आयोग काय खरे? काय खोटे?, माझी शिक्षण परिक्रमा यांसारख्या पुरस्तकांचा समावेश आहे.