World Meditation Day 2025 : “ध्यान ही काहीही न करण्याची एक नाजूक कला" - गुरुदेव श्री श्री रवि शंकर
World Meditation Day 2025 : ध्यान आपल्याला या तीनही अवस्थांच्या पलीकडील चौथ्या अवस्थेशी ओळख करून देते, जिथे आपण पूर्णपणे सतर्क असूनही, गहिरी विश्रांती घेत असतो.

World Meditation Day 2025 : आपण या जगात नेहमीच स्वातंत्र्य आणि आनंदाचा शोध घेत असतो. पण, ते दोन्ही आपल्या आतच आहेत आणि आपल्या स्वभावाचाच एक भाग आहेत. युगानुयुगे, परिपूर्ण शांतता आणि स्थिरतेचा हा मायावी शोध रहस्यमय किंवा दुर्लक्षित राहिला.
आणि मग जागतिक आध्यात्मिक नेते गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांचे पदार्पण झाले. ज्यांनी हे प्राचीन रहस्य अत्यंत सोपे केले, ते व्यावहारिक बनवले आणि जगभरातील लाखो लोकांसाठी उपलब्ध करून दिले. प्रश्न हाच राहतो: त्यांनी काय दिले? त्यामुळे जगात कसा बदल झाला आहे?
गुरुदेव म्हणतात, “ध्यान ही काहीही न करण्याची एक नाजूक कला आहे. म्हणजेच पूर्णपणे सोडून देणे.” या आधुनिक काळात, जेव्हा आपल्याला काही ना काहीतरी 'करण्याची' सवय लागलेली असते, तेव्हा माणूस विचार करतो की 'काहीही न करणे' म्हणजे नेमके काय!
सोप्या भाषेत सांगायचे तर, वर्तमान क्षणात असलेले मन म्हणजे ध्यान. आपण सामान्यतः चेतनेच्या तीन अवस्था ओळखतो: जागृत अवस्था (विश्रांती नसलेली सतर्कता), झोप (सतर्कता नसलेली विश्रांती), आणि स्वप्नावस्था (विश्रांतीही नाही आणि सतर्कताही नाही). ध्यान आपल्याला या तीनही अवस्थांच्या पलीकडील चौथ्या अवस्थेशी ओळख करून देते, जिथे आपण पूर्णपणे सतर्क असूनही, गहिरी विश्रांती घेत असतो. जेव्हा मन इच्छा, अस्वस्थता, चिंता आणि योजना करण्यापासून मुक्त होऊन शांत होते तेव्हाच खरी विश्रांती मिळते आणि ते वर्तमान क्षणात स्थिर होते. याचा थेट फायदा आहे: तुम्ही ध्यानाद्वारे जितकी गहिरी विश्रांती घेऊ शकाल, तितकेच तुम्ही आपल्या कामात अधिक गतिशील होऊ शकता.
प्राचीन काळात ध्यानधारणेचा उपयोग प्रामुख्याने आत्मज्ञानासाठी आणि दुःखावर मात करण्यासाठी केला जात असला तरी, आज वाढत्या ताणतणावामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. तुम्ही जितके जास्त व्यस्त असाल, तुमच्यावर जितकी जास्त जबाबदारी असेल, तितकीच तुम्हाला ध्यानधारणेची अधिक गरज आहे.
ध्यानधारणा केवळ ताणतणाव कमी करणारी आहे असे नाही, तर ती आपल्या आत्म्यासाठी अन्न आहे, मन आणि शरीरासाठी ऊर्जा देणारी आहे, आणि आपल्यासाठी एक जीवनरेखा आहे. वैज्ञानिक पुराव्यांनी हे सिद्ध केले आहे की ध्यानधारणा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि गहिरी विश्रांती मिळवण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे.
काहींसाठी, ही जीवनरेखा म्हणजे संकटात आशेचा किरण दिसणे. व्हिडिओ निर्मात्या हिमाली सांगतात, "माझ्यासाठी सर्व दरवाजे बंद झाले आहेत असे मला वाटत होते," एका अपघातानंतर बराच काळ हात वापरता न येणे आणि त्यासोबतच वैयक्तिक समस्यांमुळे आलेल्या कोंडलेल्या अवस्थेची भावना त्या वर्णन करत होत्या. त्या अशक्त आणि खूप अस्वस्थ झाल्या होत्या, आत्महत्येचे विचार वारंवार मनात येत होते आणि मानसशास्त्रज्ञांशी बोलूनही फारसा फायदा झाला नव्हता. सुदर्शन क्रिया आणि सहज समाधी ध्यान शिकल्यानंतर, त्यांनी सांगितले, "हे मनासाठी, डोक्यासाठी डिटॉक्ससारखे होते." नियमित सरावाने, त्यांच्यात अशी दृढ श्रद्धा निर्माण झाली, की जरी कोणी सोबत नसले तरी, त्यांची काळजी घेण्यासाठी गुरुदेव आणि ध्यानाची ही देन त्यांच्यासोबत आहे.
आयआयएससी (IISC) मधील आण्विक जीवशास्त्रज्ञ बनानी सांगतात, "ध्यान करताना, शरीरात रचनात्मक बदल होतात. मज्जासंस्थेच्या पातळीवर, बीटा लहरी (माहिती प्रक्रियेचे संकेत देणाऱ्या) कमी होतात आणि त्यांच्या जागी अल्फा लहरी येतात, ज्या संपूर्ण मेंदूच्या सुसंगततेशी आणि शरीरातील शिथिलतेच्या प्रतिसादाशी संबंधित आहेत.
याव्यतिरिक्त, गुणसूत्रांच्या टोकांवर असलेल्या छोट्या टोपीसारख्या भागांना टेलोमेअर्स म्हणतात, जे तुम्ही किती काळ जगाल आणि तुमचे वय किती वेगाने वाढेल हे ठरवतात. जसजसे तुमचे वय वाढते, तसतसे ते लहान होतात, ज्यामुळे तुमचे वय वाढते आणि तुम्हाला न्यूरोडीजनरेटिव्ह रोग होतात. एका अभ्यासात असे आढळून आले की, केवळ तीन दिवसांच्या सुदर्शन क्रिया आणि ध्यानधारणेमुळे टेलोमेअरची लांबी 22% वाढली. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात दोन संपूर्ण निरोगी वर्षे वाढू शकतात."
आपल्या संशोधनासोबतच, त्या अनेक लोकांना सक्रियपणे सहज समाधी ध्यान शिकवत आहेत. ध्यान तुमची आकलनशक्ती सुधारण्यास, तुमचा दृष्टिकोन बदलण्यास आणि मनामध्ये स्पष्टता आणण्यास मदत करते. गुंतागुंतीच्या परिस्थिती हाताळण्यासाठी, तुमच्या सभोवतालच्या लोकांशी संबंध सुधारण्यासाठी आणि निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी हे गुण आवश्यक आहेत.
गुरुदेव म्हणतात की, ही साधना तुम्हाला “रोगमुक्त शरीर, संभ्रममुक्त मन, निर्बंधमुक्त बुद्धी आणि आघातांपासून मुक्त स्मृती देते, जो प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे.”
हे फायदे गंभीर वैद्यकीय निदानांमध्येही दिसून येतात. अभिनव काप्री यांना 19 व्या वर्षी उच्च रक्तदाबाचे (हाय बीपी) निदान झाले होते. त्यांनी 21 व्या वर्षी सुदर्शन क्रिया आणि सहज समाधी ध्यान करायला सुरुवात केली. सहा वर्षांनंतर, ते सांगतात की ते जितके सामान्य किंवा तंदुरुस्त असायला पाहिजे तितके आहेत," जे शारीरिक आरोग्य स्थिर ठेवण्यासोबतच जीवनाप्रति सकारात्मक दृष्टिकोन राखण्याच्या वर्तणुकीतील महत्त्वपूर्ण बदलाचे संकेत देते.
जेव्हा एक सहज, मंत्रावर आधारित ध्यान असलेल्या सहज समाधी ध्यानासारख्या साधनांद्वारे मनाला शांत होऊ दिले जाते, तेव्हा ते मनाला आनंदी आणि तरल राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट प्रदान करते.
हे ध्यान मेंदूला शांत अवस्थेत नेते, ज्यामुळे मनःशांती वाढते आणि मानसिक स्पष्टता येते. ही गहिरी विश्रांती मज्जासंस्थेला पुनरुज्जीवित करते, शारीरिक आरोग्य सुधारते आणि मनातील अनावश्यक विचारांना कमी करून अंतर्ज्ञानाची कौशल्ये विकसित करते.
हे परिवर्तन भावनिक उपचारांमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ, लेखिका प्रतिभा शर्मा यांना त्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडील कठीण परिस्थिती हाताळताना त्रास होत असे, आणि त्यांची गोंधळाची स्थिती अनेकदा रागात बदलत असे. ध्यानाच्या सरावामुळे, त्यांनी शांत मन विकसित केले आहे, ज्यामुळे आता त्यांना अवघड परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या कल्पना सुचतात आणि त्या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात.
ध्यान शिकवण्याबद्दल सर्वात समाधानाची गोष्ट म्हणजे, विद्यार्थी गहन ध्यानधारणेनंतर हळू हळू डोळे उघडतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, कोमलता, ताजेपणा आणि कृतज्ञता पाहणे. आणि जगाच्या प्रत्येक भागात हेच चित्र दिसते.
गुरुदेव हे जगातील सर्वात मोठ्या ध्यान चळवळीमागील जागतिक आध्यात्मिक नेते आहेत. गुरुदेवांचा ध्यानाशी असलेला गहिरा संबंध त्यांच्या बालपणापासूनच होता. त्यांचा आवडता छंद म्हणजे आम्हाला डोळे मिटून स्मित करायला सांगणे! माझे वडील आम्हाला सांगायचे की, मी हळूच डोळे उघडून बघायचे, आणि गुरुदेव फक्त ४ वर्षांच्या वयातही गहन ध्यानात लीन असायचे!
जागतिक आर्ट ऑफ लिव्हिंग चळवळ तुंगभद्रा नदीच्या काठी, शिमोगा येथे गुरुदेवांनी केलेल्या 10 दिवसांच्या पवित्र मौनातून सुरू झाली. आणि अशा प्रकारे गुरुदेवांनी अनुभवलेल्या सर्वात शक्तिशाली श्वास-आधारित साधनांपैकी एक, सुदर्शन क्रिया जन्माला आली, ज्याला 180 हून अधिक देशांतील लाखो लोकांनी स्वीकारले आहे.
चार दशकांपूर्वी, गुरुदेवांनी हा कार्यक्रम परदेशात नेला, 1983 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये सुरुवात केली आणि 1986 पर्यंत उत्तर अमेरिकेपर्यंत पोहोचले. 1988 पर्यंत, त्याचे जागतिक आकर्षण सर्वविदित झाले होते: बंगळूरमधील पहिल्या अँडव्हान्स मेडिटेशन पोग्राममध्ये सदतीस देशांतील सहभागींनी भाग घेतला, ज्यांनी गुरूंच्या उपस्थितीत आपल्या आनंदमय अस्तित्वाच्या गहनतेचा अनुभव घेतला.
तेव्हापासून त्यांनी जगभर प्रवास केला आहे, ध्यानाची ही मौल्यवान कला 180 देशांमध्ये पोहोचवली आहे, आणि 80 करोडहून अधिक लोकांनी त्याचा आनंद अनुभवला आहे.
2024 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला.
पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यासाठी, न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे गुरुदेवांनी मुख्य भाषण दिले आणि एका लाईव्ह जागतिक ध्यान सत्राचे नेतृत्व केले.
हे एक स्वागतार्ह पाऊल आहे, कारण ध्यानाला या बहुप्रतिक्षित मान्यतेची खूप दिवसांपासून गरज होती.
ध्यान ही चैनीची गोष्ट नाही, तर ते एक मूलभूत कौशल्य आहे जे आपल्याला आधुनिक जीवनातील गुंतागुंत स्पष्टपणे, आरोग्य राखत आणि प्रसन्नतेने हाताळण्यास सक्षम करते.
या जागतिक ध्यान दिनानिमित्त, 21 डिसेंबर रोजी, जागतिक मानवतावादी आणि आध्यात्मिक गुरू, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्यासोबत जगातील सर्वात मोठ्या ध्यान कार्यक्रमात सामील व्हा, गुरुदेवांच्या अधिकृत YouTube चॅनलवर.
- भानुमती नरसिंहन




















