एक्स्प्लोर

Tulsi Vivah 2022 : 'या' खास दगडाच्या पूजेने घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या महत्त्व आणि विधी...

Shaligram Puja Vidhi : तुळशी विवाहाच्या ( Tulsi Vivah ) दिवशी शालिग्रामची विशेष पूजा केली जाते. जाणून घ्या शालिग्राम ( Shaligram ) पूजेचं महत्त्व आणि नियम.

Shaligram Pooja Vidhi : हिंदू धर्मामध्ये कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला ( Tulsi Vivah 2022 ) सुरुवात होते. यानंतर तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. तुळशी विवाहाच्या दिवशी देवी स्वरूप तुळशीचे भगवान विष्णूंसोबत लग्न लावले जाते. काही ठिकाणी शाळीग्राम आणि तुळशीचे लग्न लावले जाते. काळ्या रंगाचा गोल, गुळगुळीत दगड शाळीग्राम म्हणून ओळखला जातो. शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी शाळीग्राम पूजा केली जाते. 

शालिग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत, त्यापैकी 24 प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित असल्याचं मानलं जातं. ज्या घरामध्ये शालिग्रामची विधीवत पूजा केली जाते, सुख आणि समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. पण शालिग्रामशी संबंधित काही नियमांचे पालन केले नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या घरात शाळीग्राम ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

शाळीग्राम दगड कुठे सापडतो?

शाळीग्राम जगड नेपाळच्या गंडकी नदीत आढळतो. या दगडावर किड्याच्या आकारासारख्या खुणा असतात. विशेष म्हणजे या खुणा सुदर्शन चक्रासारख्या दिसतात.

शाळीग्रामची पूजा करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • घरात कधीही एकापेक्षा जास्त शाळीग्राम ठेवू नका. 
  • तुमच्या घरात एकापेक्षा जास्त शाळीग्राम असतील तर एकच शाळीग्राम पूजेला ठेवून इतर शाळीग्रामचं पाण्यात विसर्जन करावं.
  • शालिग्राम कधीही कोणाकडून भेट म्हणून घेऊ नये. शाळीग्राम स्वतःच्या पैशाने विकत घ्यावा. कारण भेटवस्तूंच्या शाळीग्रामच्या पूजेचे फळ भेट दिलेल्या व्यक्तीला जाते.
  • घरामध्ये शालिग्रामची स्थापना केली असेल तर सात्विक जीवन जगावे. मांस, दारू, जुगार इत्यादी गोष्टींपासून दूर राहावे.
  • शाळीग्रामची पूजा करताना पांढऱ्या अक्षता ( तांदूळ ) कधीही वापरू नये. अक्षता अर्पण करताना पिवळ्या रंगाच्या अक्षता अर्पण कराव्यात.
  • शाळीग्रामची नित्यनियमाने पूजा करावी. तसं शक्य नसेल तर त्याचं पाण्यात विसर्जन करावे.
  • शाळीग्राम नेहमी तुळशीच्या रोपाजवळ ठेवावे. यामुळे भगवान विष्णूसह तुळशीदेवी प्रसन्न होते.
  • शाळीग्रामला रोज पंचामृताने स्नान घालावे. यामुळे सुख समृद्धी मिळते.

शाळीग्रामची पूजा कशी करावी?

शुभ मुहूर्तावर घरामध्ये शाळीग्रामची स्थापना करा. शाळीग्रामची पूजा नियमितपणे करणे आवश्यक आहे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करत शाळीग्रामवर पंचामृताने (पंचामृत म्हणजे साखर, दुध, दही, तूप आणि मध) अभिषेक करून त्यानंतर देवाची पंचोपचार (गंध, फुल, धूप-दीप, अक्षता आणि नैवेद्य) पूजा करा. नैवेद्यामध्ये तुळस अवश्य असावी. शाळीग्रामची नेहमी तुळशीसोबतच स्थापना करावी. तुळशीशिवाय शाळीग्रामची पूजा केल्यास दोष लागतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Puran: शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
Numerology: आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
Shani Sade Sati: दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
Garud Puran: फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget