एक्स्प्लोर

Mahabharat: काय सांगता! महाभारतातील 'अश्वत्थामा' अजूनही जिवंत? आजही भटकतोय जंगलात? रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल

Mahabharat: असे मानले जाते की, अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि जंगलात भटकत आहे. अनेकांनी त्याला डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केलाय. नेमकं सत्य काय आहे?

Mahabharat: 'महाभारत' हिंदू धर्मातील एक महान प्राचीन संस्कृत काव्य ग्रंथ आहे. या ग्रंथातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गोष्टी भगवद्गीतेच्या स्वरुपात आपण जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो. कौरव-पांडव युद्ध, द्रौपदी चिरहरण..  यासोबत अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याबद्दल अद्यापही रहस्य आहे. महाभारतात अशी काही पात्रे आहेत ज्यांची नावे आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांच्या ओठावर येतात. यापैकी एक नाव अश्वत्थामाचे (Ashwatthama) आहे जो कलियुगातही जिवंत आहे आणि लोकांचा असा विश्वास आहे की अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत आहे. अश्वत्थामाशी संबंधित असे अनेक प्रश्न आणि गोंधळ आहेत ज्यांची उत्तरे आजपर्यंत सापडलेली नाहीत. शेवटी, महाभारत युद्धात असे काय घडले ज्यामुळे अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे? जाणून घ्या... काय आहे सत्य...

महाभारतातील अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे?

द्वापार युगात झालेले महाभारत युद्ध हे केवळ कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध नाही, तर ते एक धार्मिक युद्ध होते, ज्याने कलियुगालाही खूप काही शिकवले. या युद्धात अनेक महान योद्धे आणि शूर पुरुष सहभागी झाले होते. अश्वत्थामा हे महाभारतातील एक पात्र आहे, जे आजही जिवंत असल्याचे म्हटले जाते. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाकडून मिळालेल्या शापामुळे अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत असून त्याच्या शरीरावर मोठ्या जखमा आहेत, असे म्हटले जाते. अश्वत्थामाशी संबंधित ही रहस्यमय कथा तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कारण महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने एक चूक केली ज्याची शिक्षा तो आजपर्यंत भोगत आहे.


Mahabharat: काय सांगता! महाभारतातील 'अश्वत्थामा' अजूनही जिवंत? आजही भटकतोय जंगलात? रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल

पांडवांकडून अश्वत्थामा मृत झाल्याची खोटी अफवा?

पौराणिक कथेनुसार अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र असून गुरु द्रोणाचार्य महाभारत युद्धात कौरवांच्या वतीने लढत होते. युद्धादरम्यान पांडवांनी अश्वत्थामा मृत झाल्याची खोटी अफवा पसरवली. हे ऐकून गुरु द्रोणाचार्य शोकग्रस्त झाले आणि पांडवांनी संधी साधून त्यांचा वध केला. जेव्हा अश्वत्थामाला हे कळले तेव्हा त्याने कपटामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पांडवपुत्रांचा वध केला.

भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला, म्हणाले...

त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला की तो 3000 वर्षे निर्जन ठिकाणी भटकेल आणि त्याच्या शरीरावर अशा जखमा असतील ज्या कधीही बऱ्या होणार नाहीत. या शापामुळे कलियुगातही अश्वत्थामा भटकत असतो आणि त्याच्या शरीरातून रक्ताचा दुर्गंध येत राहतो, असे म्हणतात. त्याला कोणी पाहिले नसले तरी अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.


Mahabharat: काय सांगता! महाभारतातील 'अश्वत्थामा' अजूनही जिवंत? आजही भटकतोय जंगलात? रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल

विंध्याचलच्या पर्वतात आजही अश्वत्थामाचे तपश्चर्या स्थळ?

खोडरा महादेव हे मध्य प्रदेशातील महूपासून 12 किलोमीटर अंतरावर विंध्याचलच्या डोंगरावर वसलेले आहे. असे मानले जाते की हे अश्वत्थामाचे तपस्थान आहे. आजही अश्वत्थामा येथे येतो, असे मानले जाते.

'या' राज्यांच्या जंगलात अश्वत्थामा दिसल्याची चर्चा

महाभारत युद्ध संपल्यानंतर कौरवांच्या बाजूने कृपा, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे तीनच योद्धे उरले. कृपा हस्तिनापूरला आली आणि कृतवर्मा द्वारकेला गेले. शापाने दुःखी झालेल्या अश्वत्थामाला व्यास मुनींनी आश्रय दिला. आजही मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तराखंडच्या जंगलात अश्वत्थामाच्या दर्शनाची चर्चा आहे.

हेही वाचा>>>

Goddess Lakshmi: धन-वैभव तुमच्याकडे चालून येतंय..! फक्त त्यापूर्वी ओळखा 'हे' संकेत! घरात लक्ष्मीचा वास कसा ओळखाल?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget