एक्स्प्लोर

Hindu Religion: अंत्ययात्रेच्या वेळी 'राम नाम सत्य है' का म्हणतात? फक्त आत्म्यालाच नाही तर मानवालाही 'हा' इशारा, रहस्य जाणून व्हाल थक्क

Hindu Religion: धार्मिक मान्येतनुसार, राम नाम सत्य है, हे वाक्य केवळ धार्मिक घोषणा नाही, तर तो आत्मा आणि मानव अशा दोघांनाही इशारा असतो. काय आहे यामागील नेमकं कारण?

Hindu Religion: आपण बऱ्याचदा पाहतो, एखाद्या मृत व्यक्तीच्या जेव्हा अंत्ययात्रा निघते, तेव्हा राम नामाचा जप केला जातो. अनेकदा "राम नाम सत्य है" असं कानी पडतं.पण तुम्हाला माहितीय का? की हे वाक्य केवळ धार्मिक घोषणा नाही तर तो एकप्रकारे आत्मा आणि मानव अशा दोघांनाही इशारा असतो. काय आहे यामागील नेमकं कारण? काय आहे याचं रहस्य, सत्य जाणून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्यावाचून राहणार नाही. 

फक्त आत्म्यालाच नाही तर मानवालाही 'हा' इशारा

हिंदू धर्मानुसार एखाद्या मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेत "राम नाम सत्य है" चा केला जाणारा जप ही काही साधी परंपरा नाही, तर ही एक खोल आध्यात्मिक आणि तात्विक अर्थांशी जोडलेली परंपरा आहे. असे म्हटले जाते की, हे वाक्य केवळ मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी नाही तर त्याच्यासोबत चालणाऱ्या जिवंत लोकांसाठी एक इशारा आणि धडा आहे, जाणून घेऊया यामागील सत्य..

जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत सत्याची आठवण

अंत्ययात्रेत "राम नाम सत्य है" ची घोषणा प्रत्येकाने ऐकली असेल. हे वाक्य केवळ धार्मिक घोषणा नाही तर जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत सत्याची आठवण करून देते. अंत्ययात्रेत ते पुन्हा पुन्हा सांगितले जाते, जेणेकरून लोकांना समजेल की हे जग क्षणभंगुर आहे आणि केवळ रामाचे (देवाचे नाव) नाव शाश्वत आहे. हे केवळ मृत्यूच्या सत्याच्या स्वीकाराचेच प्रतीक नाही, तर भगवान रामाच्या नावावर श्रद्धेचा आणि मोक्षाच्या इच्छेचा संदेश देखील देते.

'राम' नामाचे महत्त्व जाणून व्हाल थक्क..

हिंदू धर्मात, 'राम' हे मर्यादा पुरुषोत्तम, धर्म आणि सत्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, रामाचे नाव घेतल्याने मनुष्याला मोक्ष मिळतो. एखाद्या व्यक्तीला या जगातून निघून जाताच, त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी ही घोषणा सूचित करते की आता त्याचे शरीर नश्वर जगापासून मुक्त होऊन देवाकडे जात आहे.

'सत्य है' चा अर्थ

धार्मिक मान्यतेनुसार, राम नाम सत्य है याची आठवण करून देते की जीवन क्षणिक आहे आणि शेवटी प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जायचेच आहे. या जगात फक्त "सत्य" - म्हणजेच देवाचे नाव आणि सत्कर्म शिल्लक राहतात.

अंत्ययात्रेत हा जप का केला जातो?

धार्मिक मान्यतेनुसार,  राम नाम सत्य है हे वाक्य केवळ मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी नाही, तर त्याच्यासोबत चालणाऱ्या जिवंत लोकांसाठी एक इशारा आणि धडा आहे - की हे जीवन अनिश्चित आहे आणि आपण प्रत्येक क्षण धर्म, करुणा आणि सत्याने जगले पाहिजे.

मानसशास्त्र काय म्हणते?

मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास 'राम नाम सत्य है' ऐकल्याने लोकांना मृत्यूची भीती वाटत नाही, तर ते स्वीकारले जाते. सामाजिकदृष्ट्या देखील, ते लोकांना मृत्यूच्या सत्याशी जोडण्याचे एक माध्यम बनले आहे.

हेही वाचा :           

Numerology: मागच्या जन्माचं कर्ज या जन्मी फेडतातच, 'या' जन्मतारखेच्या लोकांना कर्मांचं फळ भोगावंच लागतं, यातून सुटका नसते, अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget