एक्स्प्लोर

Hindu Faith : या 'दहा' व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका, नाहीतर संपूर्ण आयुष्य होईल बरबाद

काही व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही.  काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया कोणाच्या पाया पडू नये

Hindu Faith :  प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधार्‍या मंडळींच्या पाया पडण्याची प्रथा सुरु आहे. या प्रथेकडे मान-सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हे तर सर्वांनाच माहिती आहे की वडीलधार्‍या मंडळींच्या पाया पडावे हे आपल्याला सांगितले जात आहे. मात्र    हे फार कमी लोकांना महिती असेल की या पाच व्यक्तींच्य पाया पडणे हे अशुभ मानले जाते. या व्यक्तींच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही.  काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला याविषयी जाणून घेऊया.  

पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये

एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये. अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे  योग्य मानले जात नाही. कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास  मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते

कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये

हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी  पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार, मामा आणि  मामीने  त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये.

स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये

हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये,  मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही. असे करणे अशुभ मानले जाते. 

झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये 

झोपलेल्या व्यक्तीच्या पायांनाही  स्पर्श करू नये.झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये, कारण झोपलेली व्यक्ती मृतवत दिसते आणि आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो.

शत्रूला कधीच करु नका नमस्कार

आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कारण  त्यांच्या मनात कायम द्वेष असतो.  आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. 

साधू- संन्यासींकडून पाया पडून घेऊ नये

साधू-संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. 

 जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये 

 जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिव शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती.

 भाच्याने मामाच्या पाया पडू नये

 भाच्याने मामाच्या पाया पडू नये, हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता.

जेवताना पाया पडू नये

एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये.

प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये

तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली, तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget