एक्स्प्लोर

Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये चक्क महिला ओढतात हनुमानाचा रथ; ब्रिटिश काळापासूनची परंपरा अजूनही कायम, वाचा रंजक कहाणी

Hanuman Jayanti 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.

Hanuman Jayanti 2024 : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला (Hanuman Jayanti) महिलांना दिला जातो. अगदी ब्रिटीशांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथावरील बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथ यात्रा काढली होती, तेव्हापासून ही परंपरा अजूनही सुरू आहे. या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

ब्रिटीशांनी घातली होती रथावर बंदी

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं  वेगळं महत्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी याठिकाणी गर्दी करतात. महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या मानाला ब्रिटीश कालीन इतिहास असून ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं.

सरकारी ताकदीसमोर नेते मंडळीही झुकली

23 एप्रिल, 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस विरोध करत होते. आता पाहून नेते मंडळींनी माघार घेतली आणि ते आपापल्या घरी गेले. एवढ्यात अचानक 200-250 स्त्रियांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला. हळूहळू स्त्रियांची संख्या 500 वर गेली. पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले, त्यांना भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली, पण महिला काही ऐकेना.

आदिशक्तीरुपी महिलांनी दाखवलं साहस

पोलिसांनी सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला, पण या आदिशक्तीस्वरुप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला. याच गडबड-गोंधळाचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, स्त्रीयांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवली आणि  "बलभीम हनुमान की जय"चा नारा दिला. यानंतर कुणालाही काही कळण्याच्या आत त्यांनी रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली.

पोलिसांकडून झाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न

1929 ला महिलांनी चौकातून रथ ओढत संत वाड्याच्या पुढे नेला, यानंतर पोलिसांनी बैलगाड्या आडव्या लावून रथ अडवला, तेव्हा दोन महिने हा रथ रंगार गल्लीतच उभा ठेवण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली आणि झुंबराबाईंचा प्रातिनिधिक सत्कार करुन दरवर्षी ही परंपरा कायम ठेवण्याचं अभिवचन दिलं. महिला सन्मानाची प्रथा नंतरच्या काळात थांबली, पण ध्वज नेण्याची परंपरा आजही अखंडीत आहे.

असं चित्र राज्यात कधी?

महाराष्ट्रात अनेक मारूती मंदिरांत आजही महिलांना जाण्यास मनाई असताना संगमनेरमध्ये मात्र हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघणारा रथ महिला ओढत असतानाचं हे चित्र बघितल्यावर इतरांनीही अंधश्रद्धा बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी महिलांना समान अधिकार द्यायलाच हवा, असं म्हणावं लागेल. 

हेही वाचा:

Hanuman Temples In Pune : जिलब्या, डुल्या, भांग्या...; पुण्यातील हनुमान मंदिरांना इतकी विचित्र नावं का पडली? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत, जुलैच्या सुरूवातीच्या टप्प्यात 5 राशींना जॅकपॉट! भाग्योदयाची हीच वेळ, 'हा' दिवस टर्निंग पॉईंट...
Shravan 2026: श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
श्रावणातला पहिलाच सोमवार पॉवरफुल! अत्यंत दुर्मिळ संयोग जुळतायत, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व...
Lord Shiv: सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 
सोमवार.. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय दिवस का आहे? श्रावण आणि भोलेनाथांचा संबंध काय आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल... 

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget