एक्स्प्लोर

Funeral Rituals: अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरही 'हा' अवयव जळत नाही; यामागील कारण काय?

Funeral Rituals: हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं...

Funeral Rituals: या पृथ्वीवर जो जन्माला येतो, तो कधीना कधी जातोच... असं आपण थोरामोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकतो. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण, जन्म-मृत्यू माणसाच्या हातात नाही, हेच अंतिम सत्य आहे. असं म्हटलं जातं की, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याच्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार (Funeral) होणं आवश्यक असतं. जगभरात विविध धर्माचे लोक राहतात. या सर्वांच्या जन्मापासून (Birth) ते मृत्यूपर्यंतच्या (Death) सर्व विधी, सोपस्कार वेगवेगळे असतात. हिंदू धर्मात (Hindu Funeral Rituals) मृत व्यक्तीच्या पार्थीव शरीराला मुखाग्नी (Mukhagni) दिला जातो. पण, तुम्हाला माहितीय का? मुखाग्नी दिल्यानंतर (Funeral Rituals) पार्थिव पूर्णतः जळून खाक होतं, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही. 

हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराचे विधी आणि सोपस्कार... 

हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं आणि फक्त अस्थी शिल्लक राहतात. मुखाग्नी दिल्यानंतर पार्थिव शरीराच्या हाडांचीही राख होते.  मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पार्थिव अनंतात विलिन झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थी एका मातीच्या भांड्यात जमा करून नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. 

पण, त्यावेळी पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही. तो तसाच असतो. शरीराच्या या अवयवाला कधी आग लागत नाही, हे आम्ही सांगत नाहीतर हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनानुसार, पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर 670 ते 810 अंश सेल्सिअस तापमानात अवघ्या 10 मिनिटांत शरीर नष्ट होऊ लागतं. पुढे 20 मिनिटांनी मतदेहावरची त्वचा जाळीदार दिसू लागते. त्यानंतर 30 मिनिटांनी संपूर्ण त्वचा जळते आणि शरीराचे काही भाग दिसू लागतात. मुखाग्नी दिल्यानंतर 40 मिनिटांनी आतले अवयव आगीत संकुचित होऊन जळू लागतात. त्यानंतर 50 मिनिटांनी हाद-पाय संपूर्ण नष्ट होतात. पुढे एक ते दीड तासानं केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. मानवी शरीर संपूर्ण जळून जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. पण, दोन-तीन तासांनंतरही शरीराचा एक भाग अजिबात जळत नाही. 

मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव जळत नाही? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जातो. त्यावेळी संपूर्ण शरीर जळून राख होतं, पण माणसाचे दात मात्र जळत नाहीत. पार्थिव जळाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थिंमध्ये तुम्ही दात अगदी सहज ओळखू शकतात. यामागील कारण म्हणजे, माणसाचे दात कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होतात. त्यामुळे दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही. म्हणूनच पार्थिव संपूर्ण जळून खाक झाल्यानंतरही दाद मात्र तसेच राहतात. 

(टीप : वरील सर्व गोष्टी संशोधनाच्या आधारावर आणि वैज्ञानिक तथ्यांवर केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget