एक्स्प्लोर

Funeral Rituals: अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतरही 'हा' अवयव जळत नाही; यामागील कारण काय?

Funeral Rituals: हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं...

Funeral Rituals: या पृथ्वीवर जो जन्माला येतो, तो कधीना कधी जातोच... असं आपण थोरामोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकतो. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण, जन्म-मृत्यू माणसाच्या हातात नाही, हेच अंतिम सत्य आहे. असं म्हटलं जातं की, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याच्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार (Funeral) होणं आवश्यक असतं. जगभरात विविध धर्माचे लोक राहतात. या सर्वांच्या जन्मापासून (Birth) ते मृत्यूपर्यंतच्या (Death) सर्व विधी, सोपस्कार वेगवेगळे असतात. हिंदू धर्मात (Hindu Funeral Rituals) मृत व्यक्तीच्या पार्थीव शरीराला मुखाग्नी (Mukhagni) दिला जातो. पण, तुम्हाला माहितीय का? मुखाग्नी दिल्यानंतर (Funeral Rituals) पार्थिव पूर्णतः जळून खाक होतं, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही. 

हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराचे विधी आणि सोपस्कार... 

हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं आणि फक्त अस्थी शिल्लक राहतात. मुखाग्नी दिल्यानंतर पार्थिव शरीराच्या हाडांचीही राख होते.  मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पार्थिव अनंतात विलिन झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थी एका मातीच्या भांड्यात जमा करून नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. 

पण, त्यावेळी पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही. तो तसाच असतो. शरीराच्या या अवयवाला कधी आग लागत नाही, हे आम्ही सांगत नाहीतर हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनानुसार, पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर 670 ते 810 अंश सेल्सिअस तापमानात अवघ्या 10 मिनिटांत शरीर नष्ट होऊ लागतं. पुढे 20 मिनिटांनी मतदेहावरची त्वचा जाळीदार दिसू लागते. त्यानंतर 30 मिनिटांनी संपूर्ण त्वचा जळते आणि शरीराचे काही भाग दिसू लागतात. मुखाग्नी दिल्यानंतर 40 मिनिटांनी आतले अवयव आगीत संकुचित होऊन जळू लागतात. त्यानंतर 50 मिनिटांनी हाद-पाय संपूर्ण नष्ट होतात. पुढे एक ते दीड तासानं केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. मानवी शरीर संपूर्ण जळून जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. पण, दोन-तीन तासांनंतरही शरीराचा एक भाग अजिबात जळत नाही. 

मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव जळत नाही? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जातो. त्यावेळी संपूर्ण शरीर जळून राख होतं, पण माणसाचे दात मात्र जळत नाहीत. पार्थिव जळाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थिंमध्ये तुम्ही दात अगदी सहज ओळखू शकतात. यामागील कारण म्हणजे, माणसाचे दात कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होतात. त्यामुळे दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही. म्हणूनच पार्थिव संपूर्ण जळून खाक झाल्यानंतरही दाद मात्र तसेच राहतात. 

(टीप : वरील सर्व गोष्टी संशोधनाच्या आधारावर आणि वैज्ञानिक तथ्यांवर केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.) 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Shravan Somvar 2026: यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget