एक्स्प्लोर

Rain in Maharashtra : विदर्भासह कोकणातील काही भागात अवकाळी पाऊस, वाशिममध्ये आंबा उत्पादकांना फटका

राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली. वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं आंबा शेतीचे मोठं नुकसान झाले आहे.

Rain in Maharashtra :  एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. या पावसामुळं कांदा , गहू उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातही रात्री वादळी वाऱ्यासह  झालेल्या पावसामुळं आंबा शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. तसेच कोकणातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
 
दरम्यान, हवामान विभागाने (India Meteorological Department) पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह  पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आणकी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव , संग्रामपूर , जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे कांदा आणि गहू उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. बुलढाणा जिल्ह्यात कालपासूनच ढगाळ वातावरण होते. तापमानात देखील घट झाली होती. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं आंबा शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. वाशिमचे प्रगतशील शेतकरी सुनील लोनसुने यांच्या शेतातील आंबा बागेला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सुनिल लोनसुने यांचं मोठं नुकसान झालं आहे.


Rain in Maharashtra : विदर्भासह कोकणातील काही भागात अवकाळी पाऊस, वाशिममध्ये आंबा उत्पादकांना फटका

कोकणात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाच्या तूरळक सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील भांबेड भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या भागात गारा देखील पडल्या. सध्या कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आंबा आणि काजूचे मोठे नुकसान होत आहे. तर जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी तापमानात वाढ झाल्याने उकाडाही जाणवत आहे.


Rain in Maharashtra : विदर्भासह कोकणातील काही भागात अवकाळी पाऊस, वाशिममध्ये आंबा उत्पादकांना फटका

राज्यातील काही भागात कालपासूनच ढगाळ आकाश आहे. तर काही भागात हलका पाऊसही सुरु आहे. वाढत्या उष्णतेमुळं अंगाची लाही लाही होत असताना राज्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मराठवाड्यासह तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget