एक्स्प्लोर

Sugarcan Workers : उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध 

उसतोड कामगारांनी वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे.

Sugarcan Workers : सध्या राज्यातील उसाचं (Sugarcan) क्षेत्र वाढत आहे. चांगला पाऊस आणि  पाण्याच्या सुविधा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकरी उसाचं उत्पादन घेत आहेत. मात्र हे होत असताना शेतकऱ्यांसमोरील समस्या देखील वाढत आहेत. ऊस तोडणीसाठी करावा लागणारा संघर्ष, उसतोड कामागारांकडून (Sugarcan Workers) होणारी पैशांची मागणी यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. अशातच आता उसतोड कामगारांनी वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. साखर आयुक्तालयाकडून (Sugar Commissionerate) ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वर्षभर राबराब राबून ऊस पिकवला जातो. मात्र, हाच ऊस साखर कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची खरी कसोटी लागते. ऊस तोडण्यास टोळी मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला येतो. उसतोड कामगार हे शेतकऱ्यांकडून देखील उसाची तोडणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतात. एकरी पाच, दहा, पंधरा हजार रुपयांची देखील मागणी केली जाते. तसेच वाहनाच्या ड्रायव्हरकडून देखील एन्ट्री फी मागितली जाते. याचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतो. अशातच आता उसतोड कामगारांनी बुडवलेली आकडेवारी देखील समोर आली आहे. ऊस तोडणाऱ्या टोळीने वाहतूकदार किंवा कारखानदारांना फसवणे हे आता नवीन राहिलं नाही. मात्र, याबाबतची जी आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक म्हणावी लागेल. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना ऊसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळं शेती क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाहनमालक उसतोड कामगारांना दरवर्षी अॅडव्हान्स देत असतात. मात्र, अनेकवेळा ऊस तोडणीच्या वेळी कामगार येतच नाहीत. याचा मोठा फटका वाहन मालकांना बसतो.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय?

2004 पासून 2020 पर्यंत राज्यातील 81 साखर कारखांन्याची उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवणूक केली आहे. ही फसवणूक तब्बल 39 कोटी 46 लाख रुपयांची असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी दिली आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले

दरम्यान, या सर्व प्रकारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावर राजू शेट्टी यांनी काही पर्याय सुचवले आहेत. केवळ साखर कारखानदार यांचेच पैसे बुडाले नाहीत तर खासगी पद्धतीनं कारखान्यांना ऊस पोहोचवणाऱ्या वाहनधारकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फसवले आहे. शेकडो ट्रक चालकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्याचे देखील राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रातील सगळ्याच उसतोड कामगारांची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यांची आधार कार्डच्या आधारे ऊस तोड महामंडळाकडे मजूर पुरवावेत त्यामुळं फसवणूक थांबेल. मजूरांचे मुकादमाकडून शोषण होत असल्याचेही शेट्टी म्हणाले. त्यामुळं महामंडळाच्या माध्यमातून तर उसतोड कामगारांना बिनव्याजी कर्ज दिलं तर हा प्रश्न थांबेल. वाहतुकदारांचे, तोडणी मजुरांचे शोषण थांबेल असेही शेट्टी म्हणाले.
 
वाहतूकदाराच्या जीविताला देखील धोका

एकाच वेळी राज्यातील सुमारे 200 साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळं उसतोड कामगारांची मागणी वाढत असते. वाहनधारक आधीच टोळीच्या मुकादमाला पैसे देऊन करार करुन घेतो. मात्र, अनुभव असा आहे की ऊस तोडीसाठी ना टोळी येते ना त्या वाहन चालकाचे पैसे परत मिळतात. अनेक वेळा पैसे मागण्यासाठी गेलेल्या वाहतूकदाराच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला असल्याची माहिती टोळीने फसवणूक केलेले ट्रकमालक विक्रम पाटील यांनी दिली. 

दरम्यान, उसतोड कामगार हा वर्ग देखील खूप गरीब असतो. मात्र, त्यांच्या नावावर मुकादम पैसे उचलत असतात.. या सगळ्या पैशाचा गोंधळ मुकादम स्तरावर होत असतो. मात्र, याचे खापर उसतोड कामगारावर फोडले जाते. त्यामुळं या संदर्भात अधिकृत नोंदणी करुन ऊसतोड कामगार पुरवले तर ही फसवणूक टाळणे शक्य होईल असा शेतीमधील तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
Dattatray Bharne : आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, शेती क्षेत्रावर मोठा परिणाम; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
युरियाच्या साठ्याबाबत काळजी घ्या, आखाती देशातील युद्धाचा निर्यातीला फटका, कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम; मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली चिंता
Onion Farmer News : आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
आखाती देशात युद्धाचे ढग, राज्यात कांद्याला उत्पादन खर्चाच्या निम्म्याहूनही कमी दर; बाजार हस्तक्षेप योजना लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
कांद्याच्या दरात घसरण, सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमक्या काय आहेत मागण्या?
कांद्याच्या दरात घसरण, सरकारनं तातडीनं बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमक्या काय आहेत मागण्या?

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Iran War Live Update: 'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
'नरकात तुमचं स्वागत आहे, थडग्यातून पाठवून देऊ' अतिरिक्त अमेरिकन तुकड्या आखाती देशात पोहोचताच इराणी मीडियाचा गर्भित इशारा
Aniket Varma: अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
अवघा तीन वर्षांचा असताना आई गेली, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानं कुटुंब उद्ध्वस्त, काकाच्या त्यागानं स्वप्न साकारलं; अनिकेत वर्मा आहे तरी कोण?
Embed widget