एक्स्प्लोर

Sugarcan Workers : उसतोड कामगारांकडून 39 कोटी रुपयांची फसवणूक, साखर आयुक्तालयाकडून आकडेवारी प्रसिद्ध 

उसतोड कामगारांनी वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे.

Sugarcan Workers : सध्या राज्यातील उसाचं (Sugarcan) क्षेत्र वाढत आहे. चांगला पाऊस आणि  पाण्याच्या सुविधा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकरी उसाचं उत्पादन घेत आहेत. मात्र हे होत असताना शेतकऱ्यांसमोरील समस्या देखील वाढत आहेत. ऊस तोडणीसाठी करावा लागणारा संघर्ष, उसतोड कामागारांकडून (Sugarcan Workers) होणारी पैशांची मागणी यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. अशातच आता उसतोड कामगारांनी वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. साखर आयुक्तालयाकडून (Sugar Commissionerate) ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वर्षभर राबराब राबून ऊस पिकवला जातो. मात्र, हाच ऊस साखर कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची खरी कसोटी लागते. ऊस तोडण्यास टोळी मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला येतो. उसतोड कामगार हे शेतकऱ्यांकडून देखील उसाची तोडणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतात. एकरी पाच, दहा, पंधरा हजार रुपयांची देखील मागणी केली जाते. तसेच वाहनाच्या ड्रायव्हरकडून देखील एन्ट्री फी मागितली जाते. याचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतो. अशातच आता उसतोड कामगारांनी बुडवलेली आकडेवारी देखील समोर आली आहे. ऊस तोडणाऱ्या टोळीने वाहतूकदार किंवा कारखानदारांना फसवणे हे आता नवीन राहिलं नाही. मात्र, याबाबतची जी आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक म्हणावी लागेल. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना ऊसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळं शेती क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाहनमालक उसतोड कामगारांना दरवर्षी अॅडव्हान्स देत असतात. मात्र, अनेकवेळा ऊस तोडणीच्या वेळी कामगार येतच नाहीत. याचा मोठा फटका वाहन मालकांना बसतो.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय?

2004 पासून 2020 पर्यंत राज्यातील 81 साखर कारखांन्याची उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवणूक केली आहे. ही फसवणूक तब्बल 39 कोटी 46 लाख रुपयांची असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी दिली आहे.

राजू शेट्टी काय म्हणाले

दरम्यान, या सर्व प्रकारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावर राजू शेट्टी यांनी काही पर्याय सुचवले आहेत. केवळ साखर कारखानदार यांचेच पैसे बुडाले नाहीत तर खासगी पद्धतीनं कारखान्यांना ऊस पोहोचवणाऱ्या वाहनधारकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फसवले आहे. शेकडो ट्रक चालकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्याचे देखील राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रातील सगळ्याच उसतोड कामगारांची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यांची आधार कार्डच्या आधारे ऊस तोड महामंडळाकडे मजूर पुरवावेत त्यामुळं फसवणूक थांबेल. मजूरांचे मुकादमाकडून शोषण होत असल्याचेही शेट्टी म्हणाले. त्यामुळं महामंडळाच्या माध्यमातून तर उसतोड कामगारांना बिनव्याजी कर्ज दिलं तर हा प्रश्न थांबेल. वाहतुकदारांचे, तोडणी मजुरांचे शोषण थांबेल असेही शेट्टी म्हणाले.
 
वाहतूकदाराच्या जीविताला देखील धोका

एकाच वेळी राज्यातील सुमारे 200 साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळं उसतोड कामगारांची मागणी वाढत असते. वाहनधारक आधीच टोळीच्या मुकादमाला पैसे देऊन करार करुन घेतो. मात्र, अनुभव असा आहे की ऊस तोडीसाठी ना टोळी येते ना त्या वाहन चालकाचे पैसे परत मिळतात. अनेक वेळा पैसे मागण्यासाठी गेलेल्या वाहतूकदाराच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला असल्याची माहिती टोळीने फसवणूक केलेले ट्रकमालक विक्रम पाटील यांनी दिली. 

दरम्यान, उसतोड कामगार हा वर्ग देखील खूप गरीब असतो. मात्र, त्यांच्या नावावर मुकादम पैसे उचलत असतात.. या सगळ्या पैशाचा गोंधळ मुकादम स्तरावर होत असतो. मात्र, याचे खापर उसतोड कामगारावर फोडले जाते. त्यामुळं या संदर्भात अधिकृत नोंदणी करुन ऊसतोड कामगार पुरवले तर ही फसवणूक टाळणे शक्य होईल असा शेतीमधील तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Agriculture News: स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
स्वयंपाकघरापासून औषधांपर्यंत... वर्षभर कायम मागणी; बडीशेप लागवड ठरू शकते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
बोगस सोयबीन प्रकरण! अकोल्यात आणखी 9 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल, निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याचं समोर
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Bogus Seeds News : राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?
राज्यभरात बोगस खत ,अन् निकृष्ठ बियाणांचा सुळसुळाट; आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, नेमकं काय होणार?

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Embed widget