एक्स्प्लोर

Swabhimani Shetkari Sanghatana : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, अन्यथा दुरंगी सरकारचा बेरंग करु, स्वाभिमानीचा सरकारला इशारा 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, अन्यथा दुरंगी सरकारचा बेरंग करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल (Ranjit Bagal) यांनी दिला आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता फोडाफोडीच्या बाहेर येऊन शेतकर्‍यांकडे पाहावं. राज्यातील शेतकर्‍यांची अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, अन्यथा दुरंगी सरकारचा बेरंग करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल (Ranjit Bagal) यांनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री दररोज आमदार आणि खासदार फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत असताना देखील मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना फोडाफोडी सुचते, ही दुर्दैवी आणि चीड आणणारी बाब असल्याच त्यांनी म्हटलं आहे. 
 
सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
 
मुख्यमंत्री पाचवेळा दिल्लीला जावुन आले, परंतू त्यांना शेतकर्‍यांच्या बांधावर जायला वेळ मिळाला नाही. ही एक प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे बागल यांनी म्हटलं आहे. हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. राज्यात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील आठ ते नऊ लाख हेक्टरवरील शेती पिकांचे या अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे. तसेच जवळपास चार हजार हेक्टरवरील शेती ही तीव्र अतिवृष्टीग्रस्त होवून वाहून आणि खरडून गेली आहे. राज्यातील शेतकरी या अतिवृष्टीनं पुर्णपणे हवालदिल झाला आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या नुकसानीचे कसलेही देणेघेणे उरलं नसल्याचा आरोप बागल यांनी केला.

शेतकऱ्यांपुढे संकटाचा डोंगर उभा असताना दोन मंत्र्यांचे सरकार

शेतकऱ्यांपुढे संकटाचा डोंगर उभा असताना अवघ्या दोन मंत्र्यांचे मंत्रीमंडळ आहे. फक्त सरकार म्हणून नावालाच दिसत आहे. राज्य संकटात असताना या दोघांकडून इथल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या नुकसानीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. ही खरोखरच चीड आणणारी बाब आहे. राज्याच्या दोन्ही नेत्यांना जर शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नसतील तर त्यांची ही सत्तेची नशा स्वाभिमानी शेतकरी संघटना नक्कीच उतरवेल असा इशारा बागल यांनी दिला. 

अटीशर्थी न लावता शेतकऱ्यांना मदत करा

राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे आहे. सरकारने यावर तातडीने मदत करावी. पाहणी, पंचनामे, नियमावली यांसारख्या अटीशर्थी न लावता शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. दोनच मंत्री असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या या संकटाचा गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास या सरकारला राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचा हिसका नक्कीच दाखवेल असेही बागल म्हणाले. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यास सरकारला भाग पाडू. सरकारने तातडीने मदत न केल्यास येत्या काळात संपूर्ण राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन या दुरंगी सरकारचा बेरंग नक्कीच करेल असा इशाराही बागल यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget