एक्स्प्लोर

Tomato Price : शेतकऱ्यांची माती होण्यामागं केंद्र सरकारची नीती, टोमॅटो दरावरुन स्वाभिमानीचा सरकारवर प्रहार

राज्यातील टोमॅटो उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.

Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. काही ठिकाणी शेतकरी रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध करत आहेत. दरम्यान, टोमॅटो दराच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच (Swabhimani Shetkari Saghtana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांची माती होण्यामागे केंद्र सरकारची नीती कारणीभूत असल्याची टीका जगताप यांनी केंद्र सरकारवर केलीय.

मागील आठ ते दहा दिवसापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जेव्हा टोमॅटोचे मार्केट चांगले होते, तेव्हा केंद्र सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली, परिणामी राज्यातील टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचे संदीप जगताप म्हणाले. आज शेतकऱ्यांना एक, दोन रुपये किलोनं देखील पैसे हातात पडत नाहीत, अशा वेळेस केंद्र सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल जगताप यांनी केला आहे. 

सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी 

आता राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे. यातून शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा द्यावा असे जगताप म्हणाले. टोमॅटो आणि कांद्याचे दर का पडले याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, याला सरकारचे आयात निर्यातीचे धोरण अवलंबून आहे. कारण आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशाचे व्यापारी आपल्या देशाकडून शेतमाल खरेदी करत नाहीत. कारण सरकार कधीही आयात सुरु करते, कधीही निर्यात सुरु करते, ही धोरण शेतमालाचे दर पडण्यास कारणीभूत असल्याचे जगताप म्हणाले. 

... अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या दारामध्ये टोमॅटो आणि कांदे ओतू

दरम्यान, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचे संदीप जगताप म्हणाले. या आंदोलनातून काही तरी सकारात्मक परिणाम व्हावा. केंद्र सरकारला जाग यावी. आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. जर केंद्र सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाहीतर केंद्रीय मंत्र्यांच्या दारामध्ये टोमॅटो आणि कांदे ओतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार नाही असा इशारा जगताप यांनी दिला आहे. 

टोमॅटो पिकासाठी लाखो रुपये खर्च

लाखो रुपये खर्चून टोमॅटोचं पीकं (Tomato Crop) घेतले असून, सध्याच्या मिळालेल्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. आधीच पावसानं दडी मारल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच शेतमालाला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Tomato Price : 200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला 'लाल चिखल' 

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
तुमच्या भ्रष्टाचाराने राज्याची बदनामी केलीय, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी 
तुमच्या भ्रष्टाचाराने राज्याची बदनामी केलीय, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी 

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget