एक्स्प्लोर

Tomato Price : शेतकऱ्यांची माती होण्यामागं केंद्र सरकारची नीती, टोमॅटो दरावरुन स्वाभिमानीचा सरकारवर प्रहार

राज्यातील टोमॅटो उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय.

Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. कवडीमोल दरानं टोमॅटोची विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. काही ठिकाणी शेतकरी रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध करत आहेत. दरम्यान, टोमॅटो दराच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच (Swabhimani Shetkari Saghtana) प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap) यांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांची माती होण्यामागे केंद्र सरकारची नीती कारणीभूत असल्याची टीका जगताप यांनी केंद्र सरकारवर केलीय.

मागील आठ ते दहा दिवसापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जेव्हा टोमॅटोचे मार्केट चांगले होते, तेव्हा केंद्र सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली, परिणामी राज्यातील टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याचे संदीप जगताप म्हणाले. आज शेतकऱ्यांना एक, दोन रुपये किलोनं देखील पैसे हातात पडत नाहीत, अशा वेळेस केंद्र सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल जगताप यांनी केला आहे. 

सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी 

आता राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे. यातून शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा द्यावा असे जगताप म्हणाले. टोमॅटो आणि कांद्याचे दर का पडले याबाबत बोलताना जगताप म्हणाले की, याला सरकारचे आयात निर्यातीचे धोरण अवलंबून आहे. कारण आपल्या देशाच्या आजूबाजूच्या देशाचे व्यापारी आपल्या देशाकडून शेतमाल खरेदी करत नाहीत. कारण सरकार कधीही आयात सुरु करते, कधीही निर्यात सुरु करते, ही धोरण शेतमालाचे दर पडण्यास कारणीभूत असल्याचे जगताप म्हणाले. 

... अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या दारामध्ये टोमॅटो आणि कांदे ओतू

दरम्यान, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याचे संदीप जगताप म्हणाले. या आंदोलनातून काही तरी सकारात्मक परिणाम व्हावा. केंद्र सरकारला जाग यावी. आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. जर केंद्र सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाहीतर केंद्रीय मंत्र्यांच्या दारामध्ये टोमॅटो आणि कांदे ओतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार नाही असा इशारा जगताप यांनी दिला आहे. 

टोमॅटो पिकासाठी लाखो रुपये खर्च

लाखो रुपये खर्चून टोमॅटोचं पीकं (Tomato Crop) घेतले असून, सध्याच्या मिळालेल्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे. आधीच पावसानं दडी मारल्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच शेतमालाला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Tomato Price : 200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला 'लाल चिखल' 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Embed widget