एक्स्प्लोर

Natural Farming : उद्या पुण्यात नैसर्गिक शेतीविषयक कार्यक्रम, गुजरातच्या राज्यपालांसह मुख्यमंत्री राहणार उपस्थित, दोन हजार शेतकरी होणार सहभागी 

'नैसर्गिक शेती' संदर्भात उद्या (6 ऑक्टोबर) पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Natural Farming: सध्या नैसर्गिक शेतीचं (Natural Farming) महत्व वाढत आहे. अनेक शेतकरी नैसर्गिक शेती करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, 'नैसर्गिक शेती' संदर्भात उद्या (6 ऑक्टोबर) पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Governor of Gujarat Acharya Devvrat), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे.

नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळणार

उद्या नैसर्गिक शेतीसंदर्भात पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं राज्यपाल आचार्य देवव्रत हे त्यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातून सुमारे दोन हजाराहून अधिक शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील होणार आहे. तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव देखील यावेळी ऐकायला मिळणार आहेत. 

नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन

दरम्यान, उद्या होणाऱ्या नैसर्गिक शेती या कार्यशाळेसह आणखी एक कार्यक्रम होणार आहे. नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवर होणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन संस्था आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केलं आहे.

 खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्चात वाढ

सध्या खते आणि रसायनांच्या वापरामुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नैसर्गिक शेती केली जात आहे. नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल याती शाश्‍वती देणारा शास्त्रीय मार्ग शोधणे देखील गरजेचं आहे. रसायने आणि खतांच्या अतिरिक्त वापरामुळे सध्या अन्नधान्य आणि भाजीपाल्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेतीचे महत्त्व लक्षात येते. कारण नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त पद्धत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

PM Narendra Modi : नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 1 हजार 580 रुपयानं कांद्याची  खरेदी होणार, मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी
मोठी बातमी! कांदा उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 1 हजार 580 रुपयानं कांद्याची  खरेदी होणार, मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
कांदा विकला पण हाती पैसा नाही आला, पदरचेच 301 रुपये खर्च करण्याची वेळ, बीडमधील शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pinarayi Vijayan ED Raid: केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Embed widget