एक्स्प्लोर

Agriculture News : परतीचा पाऊस लांबल्यानं रब्बीच्या पेरण्यांना उशीर, नंदूरबार जिल्ह्यात फक्त 15 टक्के पेरण्या पूर्ण

परतीचा पाऊस लांबल्यानं रब्बी हंगामातील पेरण्या  (Rabi Season sowing) लांबल्या आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात आत्तापर्यंत रब्बीच्या फक्त 15 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

Nandurbar Agriculture News : यावर्षी परतीच्या पावसानं (Rain) राज्यात धुमाकूळ घातल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच परतीचा पाऊस लांबल्यानं रब्बी हंगामातील पेरण्या  (Rabi Season sowing) देखील लांबल्या आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात आत्तापर्यंत रब्बीच्या फक्त 15 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. तर काही भागात मशागतीची कामं सुरू आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात 62 हजार 974.90 हेक्टर पिकांचे क्षेत्र आहे. त्यात गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पिकांची पावसाळा संपल्यावर लागवड केली जाते. यंदा परतीचा पाऊस चांगलाच लांबला. पाऊस लांबल्यामुळं आणि परतीच्या पावसामुळं मका, ज्वारी, सोयाबीन पिकाच्या काढणीला उशीर झाला आहे. तसेच परतीच्या पावसामुळं जमिनीचा ओलावा टिकून राहिल्याने मशागतीच्या कामांना उशीर झाला आहे, त्यामुळं यंदा राज्यात रब्बीचा हंगाम लांबला आहे. नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारी तीन हजार हेक्टर, गहू दोन हजार हेक्टर, मका तीन हजार हेक्टर, हरभरा 900 हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता उर्वरित रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात अनेक भागात मजुरांची टंचाई

राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडं तयार झालेली पिकं काढणीला आली आहेत. या पिकांची काढणी करणं हे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. कारण सध्या  मजुरांची मोठी टंचाई भासत आहे. नंदूरबार  जिल्ह्यात शेतकरी शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध करत आहेत. मजुरांचे मोठ्या प्रमाणावर जिह्यातून स्थलांतर झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस त्या खालोखाल मिरचीची लागवड केली जाते. परतीच्या पावसामुळं कापूस आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची आणि कापूस पावसात सापडल्यानं कापसाची काढणी आणि मिरचीची तोडणी करणं शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे. त्यात मजूर मिळत नसल्यानं पावसात सापडलेली मिरची आणि कापूस खराब होत आहे. त्यातच योग्य भाव मिळत नसल्यानं आणि वाढीव मजुरी देणं ही परवडत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : नंदूरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात, बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव 

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget