एक्स्प्लोर

Nandurbar : वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा, तर दुसरीकडे मजुरांअभावी कापूस वेचणीला खोडा 

नंदूरबार जिल्ह्यात कापूस (Cotton) काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कापसाची काढणी सुरु आहे. मात्र, या वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा आहे.

Nandurbar Agriculture News : राज्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्याला देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. या पावसातूनही काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. सध्या काही ठिकाणी कापूस (Cotton) काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कापसाची काढणी सुरु आहे. मात्र, या वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा आहे. तर दुसरीकडं मजुरांअभावी कापूस वेचणीत खोडा येत आहे.

शेतकऱ्यांसमोर कापूस चोरीची मोठी समस्या

नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. त्यासोबतच कापसाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडं कल दाखवला होता. कापसाची मोठ्या प्रमाणात लागवडही केली होती. आता कापूस वेचणीला आला आहे. मात्र, शेतकऱ्यांसमोर कापूस चोरीची मोठी समस्या उभी राहिली आहे.  कापसाला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळं चोरट्यांनी आता आपला मोर्चा कापूस चोरीकडे वळवला आहे. चोरट्यांच्या टोळ्या रात्री शेतात घुसून कापूस वेचून घेऊन जात आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडं मजूर मिळत नसल्यानं वेळेत कापसाची वेचणी होत नाही. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. 


Nandurbar : वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा, तर दुसरीकडे मजुरांअभावी कापूस वेचणीला खोडा 

रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतर 

रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात मजुरांनी गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये स्थलांतर केले आहे. त्यामुळं स्थानिक मजूर नसल्यानं शेतकऱ्यांना 40 ते 45 किलोमीटरवरुन मजूर आणावे लागत आहेत. त्यातच मंजुरांच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. यामुळं जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, कापूस चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मजूर टंचाईमुळं कापूस वेचणी वेळेवर होत नसल्यानं हे चोरट्यांच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. किरकोळ कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केवळ शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करावा अशी अट प्रशासनाने घालून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाच्या खालोखाल मिरचीची लागवड केली जाते. परतीच्या पावसामुळं कापूस आणि मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिरची आणि कापूस पावसात सापडल्यानं कापसाची काढणी आणि मिरचीची तोडणी करणं शेतकऱ्यांना क्रम प्राप्त आहे. त्यात मजूर मिळत नसल्यानं पावसात सापडलेली मिरची आणि कापूस खराब होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nandurbar : स्थलांतर झाल्यानं नंदूरबार जिल्ह्यात मजुरांची टंचाई, शेतकरी हैराण, शेती कामासाठी मजुरांची शोधाशोध 

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
नाशिकच्या NCCF खरेदी केंद्रावर पर राज्यातील हलक्या प्रतीचा कांदा, शेतकऱ्यांनी अडवले 20 ते 35 ट्रक, सखोल चौकशी करण्याची मागणी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Embed widget