एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल, प्रशासनाकडून ना पंचनामे ना मदत, शेतकरी चिंतेत

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल झाली आहेत. खरिपातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर तसेच केळी, ऊस, हळद या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Nanded Rain : गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता कुठे दैनंदिन जीवनाची घडी बसत होती. उन्हाळा संपल्यावर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागले होते. त्यानंतर यंदाचा पाऊस उशीरा सुरु झाल्यामुळं पेरणीला देखील उशीर झाला. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलैमध्ये मात्र, पावसानं चांगली हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल झाली आहेत. खरिपातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर तसेच केळी, ऊस, हळद या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पण प्रशासनाकडून ना पंचनामे ना तत्काळ मदत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तेथील शेतकरी संकटात सापडला आहे.

पिकांसह जमिनीही गेल्या खरवडून

नेमकीच अंकुरित झालेल्या पिकांच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलाच कहर केला. यामध्ये जिल्हाभरात अतिवृष्टीनं नद्या नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालं. अतिवृष्टीनं जमिनी खरवडून गेल्या. तर हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अतिवृष्टीनं आलेल्या महापुरात पिकांसह नांगर, मोगडा, पेरणी यंत्र, ठिबक, पाईप, जनावरे तसेच शेती उपयोगी अवजारेही वाहून गेली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
निसर्गाच्या अतिवृष्टीत प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांकडे वक्रदृष्टी होत आहे. कारण अतिवृष्टी झाल्यानंतर पाहणी दौरे करणाऱ्या राजकीय नेत्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत व नुकसानीच्या पंचनाम्याची ग्वाही दिली, पण ती हवेतच विरली. त्यामुळं पिके तर वाया गेली आहेत, पण मदतही नाही. पिकाचे पंचनामे देखील झाले नाहीत. त्यामुळं शेतकरी देखील हवालदिल झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील या भागात मोठं नुकसान

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या सतंतधार पावसामुळं छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ओढे, नदी, नाले तुडुंब भरुन वाहत असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आता पाऊस थांबला पूर ओसरला तरी, या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या खुणा अद्याप प्रत्येक शेताच्या बांधावर, शेतात कायम आहेत. शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापुर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, लोहा, कंधार, मुखेड, किनवट, माहूर, हदगाव या सर्वच तालुक्यातील  खरिपातील कापूस , सोयाबीन, ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच केळी, ऊस, हळद ही पिके आता हातची गेली आहेत. अती पावसामुळं पिके  पाण्याखाली जाऊन सडली असून, ती पुन्हा कसा तग धरतील या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालं आहे. शेत शिवारांचे पंचनामे करुन शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आधार देईल अशी आशा होती. परंतू, आजपर्यंत तरी तसे काही दिसून येत नसल्यानं शेतकरी चिंतेत अडकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
Embed widget