एक्स्प्लोर

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल, प्रशासनाकडून ना पंचनामे ना मदत, शेतकरी चिंतेत

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल झाली आहेत. खरिपातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर तसेच केळी, ऊस, हळद या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Nanded Rain : गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता कुठे दैनंदिन जीवनाची घडी बसत होती. उन्हाळा संपल्यावर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना लागले होते. त्यानंतर यंदाचा पाऊस उशीरा सुरु झाल्यामुळं पेरणीला देखील उशीर झाला. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलैमध्ये मात्र, पावसानं चांगली हजेरी लावली. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनं खरिपातील पिकं मातीमोल झाली आहेत. खरिपातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर तसेच केळी, ऊस, हळद या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पण प्रशासनाकडून ना पंचनामे ना तत्काळ मदत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं तेथील शेतकरी संकटात सापडला आहे.

पिकांसह जमिनीही गेल्या खरवडून

नेमकीच अंकुरित झालेल्या पिकांच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगलाच कहर केला. यामध्ये जिल्हाभरात अतिवृष्टीनं नद्या नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालं. अतिवृष्टीनं जमिनी खरवडून गेल्या. तर हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अतिवृष्टीनं आलेल्या महापुरात पिकांसह नांगर, मोगडा, पेरणी यंत्र, ठिबक, पाईप, जनावरे तसेच शेती उपयोगी अवजारेही वाहून गेली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.
निसर्गाच्या अतिवृष्टीत प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांकडे वक्रदृष्टी होत आहे. कारण अतिवृष्टी झाल्यानंतर पाहणी दौरे करणाऱ्या राजकीय नेत्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत व नुकसानीच्या पंचनाम्याची ग्वाही दिली, पण ती हवेतच विरली. त्यामुळं पिके तर वाया गेली आहेत, पण मदतही नाही. पिकाचे पंचनामे देखील झाले नाहीत. त्यामुळं शेतकरी देखील हवालदिल झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील या भागात मोठं नुकसान

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या सतंतधार पावसामुळं छोट्या मोठ्या तलावांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ओढे, नदी, नाले तुडुंब भरुन वाहत असल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आता पाऊस थांबला पूर ओसरला तरी, या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या खुणा अद्याप प्रत्येक शेताच्या बांधावर, शेतात कायम आहेत. शेती पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर, अर्धापुर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, लोहा, कंधार, मुखेड, किनवट, माहूर, हदगाव या सर्वच तालुक्यातील  खरिपातील कापूस , सोयाबीन, ज्वारी , मूग , उडीद , तूर , तसेच केळी, ऊस, हळद ही पिके आता हातची गेली आहेत. अती पावसामुळं पिके  पाण्याखाली जाऊन सडली असून, ती पुन्हा कसा तग धरतील या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालं आहे. शेत शिवारांचे पंचनामे करुन शासन व प्रशासन शेतकऱ्यांना आधार देईल अशी आशा होती. परंतू, आजपर्यंत तरी तसे काही दिसून येत नसल्यानं शेतकरी चिंतेत अडकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
Chandrapur Farmer: अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकायला लावली; आता न्यायासाठी बळीराजाची सरकारकडे इच्छा मरणाच्या परवानगीची मागणी
अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याला किडनी विकायला लावली; आता न्यायासाठी बळीराजाची सरकारकडे इच्छा मरणाच्या परवानगीची मागणी
Maharashtra Unseasonal Rain : एकीकडे आखातातील युद्धाचा भडका, दुसरीकडे अस्मानी संकटांचा फटका; गारपीट, अवकाळी पावसानं बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला
एकीकडे आखातातील युद्धाचा भडका, दुसरीकडे अस्मानी संकटांचा फटका; गारपीट, अवकाळी पावसानं बळीराज्याचा तोंडाचा घास हिरावला
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget