एक्स्प्लोर

Success Story: पदवीधर शेतकऱ्यानं खडकाळ माळरानावर फुलवलं नंदनवन, थेरगावच्या डाळिंबाला थेट बांगलादेशातून मागणी

डाळिंबाचा रंग, आकार, आणि दर्जा पाहून डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे रायकर यांच्या डाळिंबाला आळेफाटा येथील बाजारात 194 रुपये किलोचा उच्चांकी भाव मिळाला.

अहमदनगर: शेतीत क्षेत्रात शेतकरी (Farmers) सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे. शेतकऱ्यांसमोर विविध संकट असताना देखील काही शेतकरी उत्तम प्रकारची शेती करत आहेत. कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पदवीधर शेतकरी यांनी डाळिबांची (Pomogrannet ) यशस्वी शेती केली आहे. विवेक रायकर यांचे डाळिंब थेट बांगलादेशात निर्यात होत आहेत. डाळिंबाचा रंग, आकार, आणि दर्जा पाहून डाळिंब खरेदी करणारे अनेक व्यापारी याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे रायकर यांच्या डाळिंबाला आळेफाटा येथील बाजारात 194 रुपये किलोचा उच्चांकी भाव मिळाला.

दहा गुंठ्यांवर त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला

 नगर-सोलापूर महामार्गालगत कर्जत तालुक्यात मांदळीजवळ थेरगाव हे गाव आहे. थेरगाव येथील रहिवासी आजीनाथ रायकर यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी शेतीसाठी खडकाळ माळरान असलेली 20 एकर जमीन निवडली. या जमिनीतून हमखास उत्पन्न काढण्याचा मानस त्यांनी आणि त्यांचे चिरंजीव विवेक रायकर यांनी केला. 20 एकर क्षेत्रावर त्यांनी डाळिंब लागवड केली. लागवड करताना भगवा डाळिंब या वाणाची निवड केली. लागवडीसाठी दोन टप्पे करण्यात आले. सुरुवातीला 10 एकर आणि नंतर 10 एकरवर त्यांनी डाळींब लागवड केली. पाणी उपलब्ध नाही म्हणून सीना नदीवरून सहा किलोमीटरवरून पाईपलाईन केली. शेतात आठ लाख लिटर क्षमतेचा हौद त्यांनी उभारला. ठिबक सिंचनाद्वारे संपूर्ण बागेला पाणी पुरवठा केला. सोबतच जी जनावरे शेतकरी सोडून देतात किंवा कसायाला पाठवतात अशा 100 गायींचा त्यांनी सांभाळ करत त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणाचा वापर त्यांनी आपल्या बागेत केला. सोबतच जवळपास दहा गुंठ्यांवर त्यांनी गांडूळ खत प्रकल्प उभारला त्याचाही त्यांना फायदा झाला. अतिशय दर्जेदार फळ त्यांना यामुळे मिळत आहेत दर्जा चांगला असल्याने त्यांच्या फळाला थेट बांगलादेशातून मागणी होत आहे.

दहा एकर क्षेत्रापासून सुमारे 200 टन

रायकर यांच्या बागेत कधीही तणनाशकाची फवारणी केली जात नाही.  लहान मुलांप्रमाणे ते बागेची काळजी घेतात. यामुळे डाळिंबावर रासायनिक औषधांचे फवारणी कमी प्रमाणात करावी लागते. या बागेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन सुरू आहे. पूर्वी हे प्रमाण कमी होते, परंतु दरवर्षी दहा एकर क्षेत्रापासून सुमारे 200 टन उत्पादन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या येथील डाळिंब बागेत फळांची तोडणी सुरू असून यावर्षी आळेफाटा येथे हा माल दिला आहे. डाळिंबाचा आकार रंग आणि गोडी पाहून हा माल आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यासाठी पात्र ठरला आहे.  तो सध्या बांगलादेशाला पाठवला जात असून सध्या त्यांना 170 ते 200 रुपये दर मिळत असल्याचे विवेक रायकर यांनी सांगितले आहेत.

रायकर यांच्या बागेत जवळपास 40 मजूर काम करत आहेत. ज्या गायी लोक सोडून देतात त्यांचा सांभाळ करून त्यांच्या शेणापासून स्लरी तयार केल्या जातात. या गायींचा सांभाळ करण्यासाठी दोघे मजूर स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी आणि आणि उत्तम दर्जाचे फळ मिळवण्यासाठी रायकर यांचा प्रयत्न असतो.  यासाठी विवेक यांचे मामेभाऊ दत्तात्रय ननवरे यांचही त्यांना सहकार्य मिळतं. कर्जत तालुक्याला दुष्काळी भाग म्हणून संबोधले जाते. परंतु रायकर यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रगती साधली आहे.

हे ही वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaBJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडीABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Embed widget