एक्स्प्लोर

Maharashtra Agricultural Budget 2021 : गेल्या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय होत्या घोषणा? अजित नवले म्हणाले घोषणा झाल्या; मात्र शेतकऱ्यांना लाभ नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Agri Budget 2022 : आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. कारण आज महाविकास आघाडीकडून 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी 8 मार्च 2021 ला अर्थसंकल्प सादर झाला होता. याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत नाही असे नवले म्हणाले. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भात नेमक्या कोण कोणत्या घोषणा केल्या होत्या. पाहुयात यासंदर्भातील माहिती...   

मागील वर्षी 8 मार्च 2021 ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काही योजनांवर पैसे खर्च झाले मात्र, त्याच्यातून काही क्रांतीकारक बदल किंवा शेतकऱ्यांना फार काही काही फायदा झाल्याचे दिसत नाही.

मागील वर्षी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या होत्या?

  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकरअयांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत
  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज तोडणी देण्याकरताा महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल
  • थकीत विजबिलात शेतकऱ्यांना 3 टक्के सूट, उर्वरीत थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार  411 कोटी रुपये रक्कम माफ
  • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजीत किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
  • प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका स्थापन करणार
  • राज्यातल 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींन गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींग करता अनुदान

याबाबत एबीपी माझा डिजिटलने, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मागील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत केली होती. मात्र, त्याचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसून आले नाहीत. पैसे खर्च झाले असतील पण, पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना जाणवतील असे बदल यामध्ये झले नसल्याचे अजित नवले म्हणाले. शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा केली होती. त्यामध्ये देखील काही ठोस निर्णय झाले नाही. घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत असल्याचे नवले म्हणाले. या योजनांच्या माध्यमातून काही गुणात्क बदल झाल्याचे दिसत नसल्याचे नवले म्हणाले.

दरम्यान, थकीत वीज बिलाच्या बाबतीत देखील अनेक समस्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्य सव्वा बिले आली आहेत. त्या बिलांच्या दुरुस्ती देखील अद्याप झाली नाही. वीजतोडणीच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Onion Farmers: कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
EL Nino : जगावर 'महा-एल निनो'चं संकट! 150 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचीच यंदा पुनरावृत्ती होणार; ECMWF वेधशाळेनं वर्तवला भयावह अंदाज, भारतावरही परिणाम?
जगावर 'महा-एल निनो'चं संकट! 150 वर्षांपूर्वी जे घडलं त्याचीच यंदा पुनरावृत्ती होणार; ECMWF वेधशाळेनं वर्तवला भयावह अंदाज, भारतावरही परिणाम?

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
Embed widget