एक्स्प्लोर

Maharashtra Agricultural Budget 2021 : गेल्या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय होत्या घोषणा? अजित नवले म्हणाले घोषणा झाल्या; मात्र शेतकऱ्यांना लाभ नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Agri Budget 2022 : आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. कारण आज महाविकास आघाडीकडून 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी 8 मार्च 2021 ला अर्थसंकल्प सादर झाला होता. याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत नाही असे नवले म्हणाले. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भात नेमक्या कोण कोणत्या घोषणा केल्या होत्या. पाहुयात यासंदर्भातील माहिती...   

मागील वर्षी 8 मार्च 2021 ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काही योजनांवर पैसे खर्च झाले मात्र, त्याच्यातून काही क्रांतीकारक बदल किंवा शेतकऱ्यांना फार काही काही फायदा झाल्याचे दिसत नाही.

मागील वर्षी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या होत्या?

  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकरअयांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत
  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज तोडणी देण्याकरताा महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल
  • थकीत विजबिलात शेतकऱ्यांना 3 टक्के सूट, उर्वरीत थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार  411 कोटी रुपये रक्कम माफ
  • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजीत किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
  • प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका स्थापन करणार
  • राज्यातल 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींन गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींग करता अनुदान

याबाबत एबीपी माझा डिजिटलने, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मागील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत केली होती. मात्र, त्याचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसून आले नाहीत. पैसे खर्च झाले असतील पण, पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना जाणवतील असे बदल यामध्ये झले नसल्याचे अजित नवले म्हणाले. शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा केली होती. त्यामध्ये देखील काही ठोस निर्णय झाले नाही. घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत असल्याचे नवले म्हणाले. या योजनांच्या माध्यमातून काही गुणात्क बदल झाल्याचे दिसत नसल्याचे नवले म्हणाले.

दरम्यान, थकीत वीज बिलाच्या बाबतीत देखील अनेक समस्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्य सव्वा बिले आली आहेत. त्या बिलांच्या दुरुस्ती देखील अद्याप झाली नाही. वीजतोडणीच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
वीज आणि पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, सोलापुरातील ग्रामस्थ आक्रमक, पालकमंत्री गोरेंसमोर मांडली व्यथा 
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget