एक्स्प्लोर

Maharashtra Agricultural Budget 2021 : गेल्या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय होत्या घोषणा? अजित नवले म्हणाले घोषणा झाल्या; मात्र शेतकऱ्यांना लाभ नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Agri Budget 2022 : आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. कारण आज महाविकास आघाडीकडून 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी 8 मार्च 2021 ला अर्थसंकल्प सादर झाला होता. याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत नाही असे नवले म्हणाले. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भात नेमक्या कोण कोणत्या घोषणा केल्या होत्या. पाहुयात यासंदर्भातील माहिती...   

मागील वर्षी 8 मार्च 2021 ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काही योजनांवर पैसे खर्च झाले मात्र, त्याच्यातून काही क्रांतीकारक बदल किंवा शेतकऱ्यांना फार काही काही फायदा झाल्याचे दिसत नाही.

मागील वर्षी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या होत्या?

  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकरअयांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत
  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज तोडणी देण्याकरताा महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल
  • थकीत विजबिलात शेतकऱ्यांना 3 टक्के सूट, उर्वरीत थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार  411 कोटी रुपये रक्कम माफ
  • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजीत किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
  • प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका स्थापन करणार
  • राज्यातल 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींन गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींग करता अनुदान

याबाबत एबीपी माझा डिजिटलने, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मागील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत केली होती. मात्र, त्याचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसून आले नाहीत. पैसे खर्च झाले असतील पण, पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना जाणवतील असे बदल यामध्ये झले नसल्याचे अजित नवले म्हणाले. शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा केली होती. त्यामध्ये देखील काही ठोस निर्णय झाले नाही. घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत असल्याचे नवले म्हणाले. या योजनांच्या माध्यमातून काही गुणात्क बदल झाल्याचे दिसत नसल्याचे नवले म्हणाले.

दरम्यान, थकीत वीज बिलाच्या बाबतीत देखील अनेक समस्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्य सव्वा बिले आली आहेत. त्या बिलांच्या दुरुस्ती देखील अद्याप झाली नाही. वीजतोडणीच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget