एक्स्प्लोर

Maharashtra Agricultural Budget 2021 : गेल्या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय होत्या घोषणा? अजित नवले म्हणाले घोषणा झाल्या; मात्र शेतकऱ्यांना लाभ नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कृषीसाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Agri Budget 2022 : आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. कारण आज महाविकास आघाडीकडून 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना या अर्थसंकल्पातून विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी 8 मार्च 2021 ला अर्थसंकल्प सादर झाला होता. याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत नाही असे नवले म्हणाले. दरम्यान, गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासंदर्भात नेमक्या कोण कोणत्या घोषणा केल्या होत्या. पाहुयात यासंदर्भातील माहिती...   

मागील वर्षी 8 मार्च 2021 ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी कृषी क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही घोषणा अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. काही योजनांवर पैसे खर्च झाले मात्र, त्याच्यातून काही क्रांतीकारक बदल किंवा शेतकऱ्यांना फार काही काही फायदा झाल्याचे दिसत नाही.

मागील वर्षी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या होत्या?

  • 3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकरअयांना शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा
  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत
  • शेतकऱ्यांना कृषीपंप वीज तोडणी देण्याकरताा महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल
  • थकीत विजबिलात शेतकऱ्यांना 3 टक्के सूट, उर्वरीत थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार  411 कोटी रुपये रक्कम माफ
  • शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजीत किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
  • प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका स्थापन करणार
  • राज्यातल 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार
  • शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींन गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींग करता अनुदान

याबाबत एबीपी माझा डिजिटलने, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मागील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषीत केली होती. मात्र, त्याचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसून आले नाहीत. पैसे खर्च झाले असतील पण, पायाभूत सुविधा वाढल्या आहेत, शेतकऱ्यांना जाणवतील असे बदल यामध्ये झले नसल्याचे अजित नवले म्हणाले. शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणा केली होती. त्यामध्ये देखील काही ठोस निर्णय झाले नाही. घोषणा झाल्या, पैसाही खर्च झाला, मात्र, शेतकऱ्यांना काही लाभ झाला नसल्याचे दिसत असल्याचे नवले म्हणाले. या योजनांच्या माध्यमातून काही गुणात्क बदल झाल्याचे दिसत नसल्याचे नवले म्हणाले.

दरम्यान, थकीत वीज बिलाच्या बाबतीत देखील अनेक समस्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना अव्वाच्य सव्वा बिले आली आहेत. त्या बिलांच्या दुरुस्ती देखील अद्याप झाली नाही. वीजतोडणीच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran Israel America War Impact in India: युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
युद्ध आखातात, झळ भारतात; सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांची वाढ, बळीराजा आर्थिक संकटात
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 640 कोटी रुपये जमा, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ? 
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 640 कोटी रुपये जमा, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ? 
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  
45 हजार हेक्टरवर बोगस केळी विमा, जळगाव जिल्ह्यात खळबळ, पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड  

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget