एक्स्प्लोर

Farmer Success: जळगावच्या केळीचा इराणमध्ये डंका! एक केळीचा घड 35 किलोंचा, लाखोत कमवतोय हा शेतकरी..

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फळबागा जपणं तसं कठीण काम. बदलत्या हवामानात टिकाव धरत भरघोस उत्पन्न मिळवत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवल्याचं दिसतंय.

Farmer Success Story: जळगावची केळी ही महाराष्ट्रात सर्वात लोकप्रीय समजली जाते. दर्जेदार उत्पन्नासह देशातच नाही पण परदेशातही निर्यात करण्यावर शेतकरी भर देत असल्याचं दिसतं. आता जळगावच्या भडगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं केळीची निर्यात करत लाखोंमध्ये नफा कमावलाय. राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या शिवारातल्या केळीचा डंका  आता आखाती देशात वाजतोय. इराणमध्ये निर्यात करत एकरी अव्वल उत्पादन त्यांनी घेतलंय. त्यांच्या एका केळीच्या घडाचं वजन तब्बल ३५ किलो आहे. एरवी प्रतिक्विंटल १२०० ते १४०० रुपयांचा भाव केळीला मिळत असताना निर्यात करत क्विंटलमागे  तब्बल १७५० रुपयांचा भाव त्यांना मिळतोय.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत फळबागा जपणं तसं कठीण काम. बदलत्या हवामानात टिकाव धरत भरघोस उत्पन्न मिळवत या शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवल्याचं दिसतंय.

गिरणा नदीच्या समृद्ध तालुक्यांमध्ये केळीचं उत्पादन

जळगाव केळीचं आगार समजलं जातं. पाण्याचं योग्य नियोजन करत जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं. गिरणा नदीच्या पाण्यानं समृद्ध असणाऱ्या पाचोरा आणि भडगाव परिसरात केळीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. याच भडगाव तालुक्यातील राजेंद्र पाटील या केळी उत्पादक शेतकऱ्यानं आपली केळी थेट इराणला निर्यात करत चांगला नफा कमावलाय. साधारण ३५ ची रास त्यांच्याकडे असून प्रतिक्विंटल १७५० रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे. 

परदेशी निर्यात करत लाखात कमाई

राजेंद्र पाटील यांची सहा एकर शेती असून त्यांनी 9000 टिश्यूकल्चर केळीच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतात केळीची काढणी सुरु असून देशांतर्गत आणि परदेशीही ते केळी पाठवतात. इराणमध्ये राजेंद्र पाटील यांच्या केळीला वाव मिळाला असून त्यांना भरघोस उत्पन्न घेतलं आहे. केळीला साधारणपणे १२०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना १७०० रुपयांचा भाव त्यांना मिळाल्यानं विक्रमी कमाई त्यांनी केल्याचं बोललं जातंय. खत, मशागत आणि पाण्याचे व्यवस्थापन करत भडगाव तालुक्यातून इराणला निर्यात करत केळीतून त्यांनी विक्रमी कमाई केली आहे.

केळीचा घड 35 किलोंचा!

साधारणपणे केळीच्या सामान्य घडाचं वजन २० ते २५ किलो एवढे असते. पण आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाचा वापर करत नियोजन साधल्याने या शेतकऱ्याच्या केळीच्या एका घडाचे वजन तब्बल ३५ किलोंचे भरले आहे. त्यामुळेच या केळीला चांगला भाव मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Embed widget