एक्स्प्लोर

धाराशिवमध्ये सोयाबीन पेरलं पण साधा अंकूरही फुटेना, महाबीजचं बियाणं बोगस निघालं, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Dhrashiv: यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मते, महाबीजसारख्या सरकारी संस्थेच्या बियाण्यावर विश्वास ठेवला तरी असा फसवणुकीचा अनुभव येतोय.

Dharashiv: महाबीजचे बियाणे म्हणजे शेतकऱ्याला विश्वासाची हमी असते. मात्र धाराशिव जिल्ह्यात महाबीजच्या विश्वासाला तडा गेल्याच पाहायला मिळते. सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात त्यामध्ये जवळपास 90% तक्रारी महाबीजच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला त्यामध्ये बियाण्यात दोष असल्याचा आढळल्याच कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांचे बियाण  उगवलेलं नाही त्यामुळे दुबार पेरणीचा संकट ओढवलं आहे. 

पेरलं पण अंकुर फुटेना- दुबार पेरणीचं संकट

धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणी केली. पेरणीनंतर आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभागाने विविध गावांमध्ये पंचनामे सुरू केले. पंचनाम्याच्या अहवालातून महाबीजच्या बियाण्यांमध्ये दोष असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी कर्ज काढून बियाणं खरेदी केलं होतं. मात्र बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मते, महाबीजसारख्या सरकारी संस्थेच्या बियाण्यावर विश्वास ठेवला तरी असा फसवणुकीचा अनुभव येतोय.

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात साधारण 25 ते 30 तक्रारी या बियाणं उगवलं नसल्याच्या आल्या आहेत. त्यात 90% बियाणं हे महाबीजच आहे. या तक्रारींची पाहणी केल्यानंतर ही बियाणं सदोष असल्याचं समोर आलं असल्याचं कृृृषी विभागाचे धाराशिव उपाध्यक्ष यांनी सांगितले.

बियाणं सदोष निघालं...

जून महिन्यात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. धाराशिव मध्ये आत्तापर्यंत 51 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र महाबीजचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहेत. परिणामी संबंधित शेतकऱ्यांना सुमारे 50 एकरांवर दुबार पेरणीचा खर्च करावा लागणार आहे.  मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने धाराशिव जिल्ह्यातील 34 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. जूनच्या सुरुवातीला ही चांगला पाऊस झाला. जिल्ह्याचा खरीपपेरा हा प्रस्तावित क्षेत्राच्या 51% म्हणजेच तब्बल 2 लाख 86 हजार 641 हेक्टर वर झाला आहे. शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरणीवरच होता. 

महत्त्वाच्या बातम्या

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजानं दिलं दर्शन, बळीराजाला दिलासा, कोण कोणत्या भागात पावसाची हजेरी?
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
कापूस सोयाबीन पेरुनही उगवलं नाही, वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? बीडच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनी धरणातून सीना नदीला पाणी सुटणार, मंत्री विखे पाटलांचे अधिकाऱ्यांना आदेश

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget