एक्स्प्लोर

Agriculture news : अंजिराचं आगार असणाऱ्या सोनोरी गावातील शेतकरी संकटात, सततच्या पावसामुळं बागांवर रोगाचा प्रादुर्भाव

सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

Maharashtra Agriculture news : सध्या राज्यात विविध भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळं शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण, सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे कुरन सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सोनोरी गावातील 90 टक्के शेतकऱ्यांच्या अंजीर आणि सीताफळाचे नुकसान

पुरंदर तालुक्यातील सोनोरी हे गाव अंजिराचे आणि सिताफळाचे आगार म्हणून ओळखलं जातं. पंरतू, या गावातील शेतकरी चिंतेत आहेत. सततच्या पडत असलेल्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. त्यामुळे गावातील 90 टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शेतकरी शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळं अंजीर पिकांवर तांबेरा, लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं  यावेळचा अंजीर सिझन वाया गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. अशोक काळे आणि हिरामण काळे यांनी दीड एकरावर अंजिराची बाग लावली आहे. परंतू, त्यांची 90 टक्के बाग रोगाच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. मोठ नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.


Agriculture news : अंजिराचं आगार असणाऱ्या सोनोरी गावातील शेतकरी संकटात, सततच्या पावसामुळं बागांवर रोगाचा प्रादुर्भाव

औषध फवारणी करुनही बाग वाया गेली

सध्या अंजीर पिकाची जी अवस्था आहे तिच अवस्था सीताफळाची आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं सीताफळ काळे पडले आहेत. औषध फवारणी करुन देखील बाग हातातून निसटून गेली आहे. सीताफळ खाली पडून लागली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं आहे. अंजीरावर एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो.  तर सीताफळ पिकांवर 60 ते 70 हजार रुपयां एकरी खर्च होतो. तांबेरामुळे अंजिराची पानगळ होत आहे. तसेच फळ खराब होत आहे. बागेची मोठी पानगळ झाली आहे. त्यामुळे जी फळ शिल्लक आहेत, ती नीट येऊन बागेत झालेला खर्च निघावा, यासाठी सध्या औषध फवारणी करीत आहेत. सध्या जरी झाडाला फळ दिसत असले तरी तांबेरामुळं अंजीर काळे पडून खराब होत आहे. परंतू जर पाऊस पडला नाही तर खर्च निघू शकतो असं सारिका काळे यांनी सांगितले.


Agriculture news : अंजिराचं आगार असणाऱ्या सोनोरी गावातील शेतकरी संकटात, सततच्या पावसामुळं बागांवर रोगाचा प्रादुर्भाव

सोनोरी गावातील 1 हजार हेक्टरवरील अंजीराच्या बागेचं नुकसान, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी
 
अंजीर पिकातून शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. परंतू, रोगाला बळी पडल्यानं त्यांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं सरकारकनं पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोनोरी गावाची ओळख ही पुरंदर तालुक्यातील अंजीराचे आगार म्हणून आहे. पावसामुळं या गावातील 1 हजार हेक्टरवरील बागेचे नुकसान झाल्याचे विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य रामभाऊ काळे यांनी सांगितले. सोनोरी गावात 700 कुटुंब आहेत. गावात प्रत्येकाडे अंजीराची बाग आहे. सर्वांच्या बागेचं नुकसान झालं आहे. गावातील 90 टक्के बागांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील वसूल होणार नाही.  शासनानं पंचनामे करुन तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Agriculture news : अंजिराचं आगार असणाऱ्या सोनोरी गावातील शेतकरी संकटात, सततच्या पावसामुळं बागांवर रोगाचा प्रादुर्भाव

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं बागेचे नुकसान झालं आहे. अंजीर आणि सीताफळीची बाग रोगाच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. झालेला खर्च निघण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करत आहेत. शेतकऱ्यांची बाग वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. शेतकरी सरकार दरबारी मदत मागत आहेत. त्यामुळं आता सरकार या अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : सततच्या पावसामुळं अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत, फळांवर काळे डाग

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget