एक्स्प्लोर

PM किसानचा 15 वा हफ्ता आज मिळणार, पण 'हे' शेतकरी लाभापासून राहणार वंचित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हफ्त्याचे वितरण केलं जाणार आहे.जस कगेोल

PM Kisan yojana : देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM Kisan yojana) माध्यमातून प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हफ्ता जमा होता. आत्तापर्यंत 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. आज 15 हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधून या 15 व्या हफ्त्याचे वितरण केलं जाणार आहे. दरम्यान, देशातील अनेक शेतकऱ्यांना या 15 व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. 

या लोकांना मिळणार नाही PM किसान योजनेचा लाभ 

गेल्या काही दिवसात PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. त्या शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. कारण यामध्ये सरकारी कर्मचारी, विद्यमान मंत्री, आमदार, पंचायत प्रमुख आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेतलेल्या लोकांचा समावेश आहे. या सर्व लोकांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता मिळणार नाही.  शेतकऱ्यांनी चुकीचं बँक खातं दिलं असेल आणि त्यांचं बँक खातं आणि आधार कार्ड यावरील नावात फरक असल्यास असे शेतकरी या योजनेतून बाद होऊ शकतात. अशा शेतकऱ्यांना, शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हफ्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, लिंग, पत्ता आदी गोष्टी नोंदवण्यात चूक केली असेल तर असेही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. ज्या शेतकऱ्यांनी इकेवायसी केली नसेल, त्यांचीही नावं लाभार्थ्यांच्या लिस्टमधून बाहेर काढली जातील. सर्व शेतकऱ्यांना इकेवायसी करणं बंधनकारक आहे. 

आत्तापर्यंत मिळाले 14 हफ्ते

देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात भारत सरकार पैसे पाठवतं. हे पैसे किती आहेत ते आधीच ठरलेलं असतं. शेतकऱ्यांच्या कमाईत केंद्र शासन याद्वारे हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतं. आजवर याच्या 14 टप्प्यांमध्ये देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे.आता शेतकरी याच्या 15 व्या टप्प्याची वाट पाहात आहेत.

आठ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान आज 'आदिवासी गौरव दिना'च्या निमित्ताने झारखंडमधील बिरसा कॉलेज, खुंटी येथून योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हस्तांतरित केले जातील.

18,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित होणार

केंद्रातील मोदी सरकार देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत दरवर्षी 2000-2000 हजार रुपयांचे एकूण तीन हप्ते गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. आज सरकार या योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी करणार आहे. या योजनेद्वारे पंतप्रधान मोदी 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेद्वारे आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2.61 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कालच ट्विटरवरून दिली होती.

तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल का?

तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमची लाभार्थी यादी तपासू शकता.
यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
पुढे, डॅशबोर्डवर उजव्या बाजूला क्लिक करा.
पुढे तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जिल्हा, गावाचे नाव इत्यादी सर्व तपशील टाकावे लागतील.
तुमच्या पंचायतीचे नाव देखील इथे टाका.
त्यानंतर शो बटणावर क्लिक करा.
यानंतर तुम्ही तुमचे तपशील येथून तपासू शकता.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Kisan : खूशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता, लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
सोयाबीन पेरलं पण उगवलच नाही, तब्बल 844 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, बियाणांसंदर्भात महाबीजनं घेतला मोठा निर्णय
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget