एक्स्प्लोर

Agriculture News : जगाच्या बाजारात भारतीय शेतमालाला मोठी मागणी, पण मोदी सरकारच्या 'या' निर्णयांचा बसतोय फटका; शेतकरी मांडतायेत व्यथा

Agriculture News : सरकारची जी धोरणं आहेत, याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या भारतीय शेतमालाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, मोदी सरकारच्या धोरणाचा याला फटका बसतोय.

Agriculture News : सध्या देशातील शेतकरी (Farmers) विविध संकटांचा सामना करत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहेत. अस्मानी संकटाचं आपण समजू शकतो, पण सरकारची जी धोरणं आहेत, याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या भारतीय शेतमालाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, मोदी सरकारच्या धोरणाचा याला फटका बसतोय. यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत शेतकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करताना दिसतायेत. 

रशिया युक्रेन युद्धातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं भारतातील शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेत शेतीमाल निर्यात करिन चांगले पैसे कामावण्याच्या संधी उपलब्ध झाली आहे. या जागतिक संधीचा फायदा घेऊन भारतानं शेतीमाल निर्यात करायला हवा. तसं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पण केंद्र सरकार वारंवार बाजारपेठेत हस्तक्षेप करून देशातील शेतीमालाचे भाव पाडत आहे. दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी घालून जागतिक बाजारातील तेजीचा फायदाही शेतकऱ्यांनां घेऊ देत नाही. सरकारच्या या दुटप्पी भुमिकेमुळं शेतकरी पुरता कोंडीत सापडलाय.

मोदी सरकारच्या या निर्णायांचा शेतकऱ्यांना बसतोय फटका

गहू आणि तांदळाच्या निर्यातीला बंदी

सरकारनं गहू आणि तांदळाच्या निर्यातीला बंदी घातली आहे. ही बंदी घातली नसती तर  पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यातील गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना आजच्यापेक्षा कितीतरी अधिक पैसे कमवण्याची संधी मिळाली असती, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

टोमॅटोची आयात, दरांवर परिणाम

यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले होते. दीडशे ते दोनशे रुपये किलो दरानं शेतकऱ्यांच्या टोमॅटोची विक्री होत होती. मात्र, सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केल्यानं देशातील दरांवर मोठा परिणाम झाला. दरात मोठी घसरण झाल्यां शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. 

तेलाची आणि सोया पेंडीची आयात

सरकारनं तेलाची आणि सोया पेंडीची भरमसाठ आयात केली आहे. ही आयात केली नसती तर देशातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन किंवा अन्य तेलबिया उत्पादनांना चांगले दर मिळाले असते अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मोझ्यांबिक आणि म्यॅनमारमधून डाळवर्गीय उत्पादनांची आयात 

सरकारनं मोझ्यांबिक आणि म्यॅनमारमधून दहा वर्षाच्या डाळवर्गीय उत्पादनांच्या आयातीचा करार केला आहे. हा करार केला नसता तर तूर आणि इतर डाळ वर्गीय उत्पादनांना चांगला भाव मिळू शकला असता असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या निर्णयामुळं व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडत आहे. सरकारच्या या निर्णयामुळं देशातील कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. 

साखर निर्यातीवर बंधने

केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीव देखील बंधने घातली आहे. कारखानदारांना साखर निर्यात करण्याची मोकळीक असती तर साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक भाव देता आले असते. साखरेच्या बाबतीत कोटा पद्धत लागू करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय.

सध्या भरतात तयार होणाऱ्या सर्व शेतीमालाला जगभरात चांगली मागणी आहे. मात्र, सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळं भारताचा माल जगाच्या बाजारपेठेत जात नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Tomato Import : नेपाळमधून भारतात टोमॅटोची आयात, वाढत्या किमंतीवर नियंत्रणासाठी निर्णय; अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
Onion Farmers: कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget