एक्स्प्लोर

Agriculture News : जगाच्या बाजारात भारतीय शेतमालाला मोठी मागणी, पण मोदी सरकारच्या 'या' निर्णयांचा बसतोय फटका; शेतकरी मांडतायेत व्यथा

Agriculture News : सरकारची जी धोरणं आहेत, याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या भारतीय शेतमालाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, मोदी सरकारच्या धोरणाचा याला फटका बसतोय.

Agriculture News : सध्या देशातील शेतकरी (Farmers) विविध संकटांचा सामना करत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहेत. अस्मानी संकटाचं आपण समजू शकतो, पण सरकारची जी धोरणं आहेत, याचाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या भारतीय शेतमालाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, मोदी सरकारच्या धोरणाचा याला फटका बसतोय. यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत शेतकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करताना दिसतायेत. 

रशिया युक्रेन युद्धातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं भारतातील शेतकऱ्यांना जगाच्या बाजारपेठेत शेतीमाल निर्यात करिन चांगले पैसे कामावण्याच्या संधी उपलब्ध झाली आहे. या जागतिक संधीचा फायदा घेऊन भारतानं शेतीमाल निर्यात करायला हवा. तसं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पण केंद्र सरकार वारंवार बाजारपेठेत हस्तक्षेप करून देशातील शेतीमालाचे भाव पाडत आहे. दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी घालून जागतिक बाजारातील तेजीचा फायदाही शेतकऱ्यांनां घेऊ देत नाही. सरकारच्या या दुटप्पी भुमिकेमुळं शेतकरी पुरता कोंडीत सापडलाय.

मोदी सरकारच्या या निर्णायांचा शेतकऱ्यांना बसतोय फटका

गहू आणि तांदळाच्या निर्यातीला बंदी

सरकारनं गहू आणि तांदळाच्या निर्यातीला बंदी घातली आहे. ही बंदी घातली नसती तर  पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यातील गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना आजच्यापेक्षा कितीतरी अधिक पैसे कमवण्याची संधी मिळाली असती, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

टोमॅटोची आयात, दरांवर परिणाम

यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले होते. दीडशे ते दोनशे रुपये किलो दरानं शेतकऱ्यांच्या टोमॅटोची विक्री होत होती. मात्र, सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केल्यानं देशातील दरांवर मोठा परिणाम झाला. दरात मोठी घसरण झाल्यां शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. 

तेलाची आणि सोया पेंडीची आयात

सरकारनं तेलाची आणि सोया पेंडीची भरमसाठ आयात केली आहे. ही आयात केली नसती तर देशातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन किंवा अन्य तेलबिया उत्पादनांना चांगले दर मिळाले असते अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मोझ्यांबिक आणि म्यॅनमारमधून डाळवर्गीय उत्पादनांची आयात 

सरकारनं मोझ्यांबिक आणि म्यॅनमारमधून दहा वर्षाच्या डाळवर्गीय उत्पादनांच्या आयातीचा करार केला आहे. हा करार केला नसता तर तूर आणि इतर डाळ वर्गीय उत्पादनांना चांगला भाव मिळू शकला असता असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या निर्णयामुळं व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडत आहे. सरकारच्या या निर्णयामुळं देशातील कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. 

साखर निर्यातीवर बंधने

केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीव देखील बंधने घातली आहे. कारखानदारांना साखर निर्यात करण्याची मोकळीक असती तर साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक भाव देता आले असते. साखरेच्या बाबतीत कोटा पद्धत लागू करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय.

सध्या भरतात तयार होणाऱ्या सर्व शेतीमालाला जगभरात चांगली मागणी आहे. मात्र, सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळं भारताचा माल जगाच्या बाजारपेठेत जात नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Tomato Import : नेपाळमधून भारतात टोमॅटोची आयात, वाढत्या किमंतीवर नियंत्रणासाठी निर्णय; अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक
कांद्याला हमीभावासह अनुदान द्या, नाहीतर गांजा विकण्याची परवानगी द्या, दरात घसरण झाल्यानं शेतकरी आक्रमक

व्हिडीओ

Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat: पाथर्डीमधील फक्त जमीन 150 कोटींच्या घरात; XX पिसाट अशोक खरातने भक्तांना तीर्थ आणि प्रसादात मूत पाजत कितीशे कोटींची माया जमवली?
पाथर्डीमधील फक्त जमीन 150 कोटींच्या घरात; XX पिसाट अशोक खरातने भक्तांना तीर्थ आणि प्रसादात मूत पाजत कितीशे कोटींची माया जमवली?
Iran War Live Update: इराण कडवा प्रतिकार अन् अवघ्या जगाची कोंडी केलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ काही केल्या सुरु होईना; आता ट्रम्प यांनी दबावतंत्रासाठी नवीन चाल शोधली!
इराण कडवा प्रतिकार अन् अवघ्या जगाची कोंडी केलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ काही केल्या सुरु होईना; आता ट्रम्प यांनी दबावतंत्रासाठी नवीन चाल शोधली!
Iranian Oil: अमेरिकेचा यू टर्न! आता इराणी तेल विकत घेण्यास 30 दिवसांची परवानगी; भारतासाठी नेमका फायदा काय होणार?
अमेरिकेचा यू टर्न! आता इराणी तेल विकत घेण्यास 30 दिवसांची परवानगी; भारतासाठी नेमका फायदा काय होणार?
Anjali Damania on Rupali Chakankar : राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार अन्...; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार अन्...; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
Mumbai Indians IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
Ashok Kharat: नाशिक पोलिसांनी 'प्रसाद' देताच अशोक खरात म्हणाला, 'तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल'; नेमकं काय घडलं?
नाशिक पोलिसांनी 'प्रसाद' देताच अशोक खरात म्हणाला, 'तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल'; नेमकं काय घडलं?
Solapur Rain : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
Sushma Andhare and Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना वाटत होतं, आपल्या डोक्यावर तटकरेंचा हात असेपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही, पण फडणवीसांनी... सुषमा अंधारेंची घणाघाती टीका
चाकणकरांना वाटत होतं, आपल्या डोक्यावर तटकरेंचा हात असेपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही, पण फडणवीसांनी... सुषमा अंधारेंची घणाघाती टीका
Embed widget