एक्स्प्लोर

Narendra Singh Tomar : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित : कृषीमंत्री

Narendra Singh Tomar : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केलं.

Narendra Singh Tomar : शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केलं. भारताची सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि शेतकर्‍यांसाठी किंमत समर्थन प्रणाली जगात अनोखी आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या सर्वांगीण विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भर असल्याचेही तोमर म्हणाले. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले.  

भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांची आठवी बैठक कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. आज भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. हे आपल्या धोरणकर्त्यांची दूरदृष्टी, कृषी शास्त्रज्ञांची कार्यकुशलता आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले. भारत तृणधान्ये, फळे, भाज्या, दूध, अंडी, मासे यासारख्या अनेक वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर आहे. नवोन्मेष, डिजिटल शेती, हवामानाधारित स्मार्ट तंत्रज्ञान, उच्च उत्पन्न देणाऱ्या, बायोफोर्टिफाइड वाणांचा विकास, कृषी संशोधन यात एकत्रित प्रयत्न करून देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे तोमर म्हणाले. भारत बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षाविषयक, आर्थिक स्थिती आणि लोकांशी संवाद वाढवण्यासाठी एससीओ सोबतच्या ऋणानुबंधांना महत्त्व देत असल्याचे तोमर म्हणाले. दरम्यान, शांघाय सहकार्य संघटनेने भारताच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट कृषी कृती योजना स्वीकारली आहे.

PM किसान योजनेअंतर्गत 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

देशातील अत्यंत महत्त्वाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, याअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला देय असलेले 6,000 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. बैठकीच्या प्रारंभी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांनी स्वागतपर भाषण केले. कृषी संशोधनात सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा सरकारचा प्र.यत्न असल्याचे तोमर म्हणाले. शांघाय सहकार्य संघटना सचिवालयाचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उच्च अधिकारी आणि एससीओ सदस्य देशांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget