एक्स्प्लोर

Narendra Singh Tomar : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित : कृषीमंत्री

Narendra Singh Tomar : भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केलं.

Narendra Singh Tomar : शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी केलं. भारताची सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि शेतकर्‍यांसाठी किंमत समर्थन प्रणाली जगात अनोखी आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या सर्वांगीण विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भर असल्याचेही तोमर म्हणाले. भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण, हे कृषी शास्त्रज्ञांसह शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले.  

भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या कृषी मंत्र्यांची आठवी बैठक कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. आज भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. हे आपल्या धोरणकर्त्यांची दूरदृष्टी, कृषी शास्त्रज्ञांची कार्यकुशलता आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे तोमर म्हणाले. भारत तृणधान्ये, फळे, भाज्या, दूध, अंडी, मासे यासारख्या अनेक वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर आहे. नवोन्मेष, डिजिटल शेती, हवामानाधारित स्मार्ट तंत्रज्ञान, उच्च उत्पन्न देणाऱ्या, बायोफोर्टिफाइड वाणांचा विकास, कृषी संशोधन यात एकत्रित प्रयत्न करून देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे तोमर म्हणाले. भारत बहुपक्षीय, राजकीय, सुरक्षाविषयक, आर्थिक स्थिती आणि लोकांशी संवाद वाढवण्यासाठी एससीओ सोबतच्या ऋणानुबंधांना महत्त्व देत असल्याचे तोमर म्हणाले. दरम्यान, शांघाय सहकार्य संघटनेने भारताच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट कृषी कृती योजना स्वीकारली आहे.

PM किसान योजनेअंतर्गत 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

देशातील अत्यंत महत्त्वाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, याअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला देय असलेले 6,000 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 2.40 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. बैठकीच्या प्रारंभी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा यांनी स्वागतपर भाषण केले. कृषी संशोधनात सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांची शेती शाश्वत आणि अनुकूल बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा सरकारचा प्र.यत्न असल्याचे तोमर म्हणाले. शांघाय सहकार्य संघटना सचिवालयाचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे उच्च अधिकारी आणि एससीओ सदस्य देशांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget