एक्स्प्लोर

Farmers News : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी सांप्रदायानं प्रबोधन करावं, कृषीमंत्री सत्तारांचं आवाहन, वारकरी साहित्य परिषदेची मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers suicides) रोखण्यासाठी वारकरी सांप्रदायानं प्रबोधन करावं असं मत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केलं.

Farmers News : शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers suicides) रोखण्यासाठी वारकरी सांप्रदायानं प्रबोधन करावं असं मत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केलं. वारकरी हेच शेतकरी आहेत. शेतकरी आत्महत्यामुक्त महराष्ट्र करण्यासाठी वारकरी सांप्रदायानं मार्गदर्शन करावं असं सत्तार म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेच्या (Varkari Sahitya Parishad) माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (Vitthal Patil) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यानंतर कृषीमंत्री सत्तार यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये यासाठी सरकारनं संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. शेतकरी राज्यात आत्महत्या करतात ही दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी संताच्या विचारतून, मानसिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सत्तार यावेळी म्हणाले. 


Farmers News : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी सांप्रदायानं प्रबोधन करावं, कृषीमंत्री सत्तारांचं आवाहन, वारकरी साहित्य परिषदेची मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार 

कृषीमंत्र्यांच्या आवाहनाला वारकरी साहित्य परिषदेचा सकारात्मक प्रतिसाद

दरम्यान, वारकरी साहित्य परिषदेनं देखील कृषीमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासन चांगलं काम करणार असेल तर त्यांना मदत करु असे वारकरी साहित्य परिषदेकडून सांगण्यात आले. याबाबत एबीपी माझानं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी वारकरी सांप्रदाय जर सरकारच्या मदतीला आला तर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्यात मदत होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना वारकरी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सत्तार यांच्याशी बैठक झाल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली.  शासन जर शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं काम करणार असेल तर आम्ही त्यांना मदत करु असे पाटील म्हणाले. 

ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्रात प्रत्येकजण सन्मानानं जगला पाहिजे

ज्ञानोबा तुकोबांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात प्रत्येकजण सन्मानानं जगला पाहिजे असे पाटील म्हणाले. वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख मंडळींना भेटायला येण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्याप्रमाणे लवकरच आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाल्यानंतर वारकरी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी मिळून पुढचा निर्णय घेऊ असे पाटील यांनी सांगितले. पुढच्या काळात वारकरी साहित्य परिषद प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळावा घेऊ चर्चा करणार आहे. तसेच गावोगावी दिंडी, रथयात्रा काढमार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणार आहे. त्या सर्व समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Marathwada: मराठवाड्यात गेल्या सात महिन्यात 515 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं; सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकरी

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget