एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : शक्तिपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावरुन जाणारा महामार्ग, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway), पन्नास खोके (Pannas Khoke) आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘शेतकऱ्याच्या उरावरून रस्ता नेऊन शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री विकास म्हणतात’, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारासाठी जातात पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही हे विचारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ ६ रुपये मिळाल्याचा पुरावा देत त्यांनी सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. सत्तेसाठी दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी आम्हाला घर सोडण्यावरून बोलू नये, असे म्हणत त्यांनी 'पन्नास खोके' घेणाऱ्यांना 'बाजारबसवी' संबोधले.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















