एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : शक्तिपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावरुन जाणारा महामार्ग, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway), पन्नास खोके (Pannas Khoke) आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘शेतकऱ्याच्या उरावरून रस्ता नेऊन शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री विकास म्हणतात’, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारासाठी जातात पण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही हे विचारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ ६ रुपये मिळाल्याचा पुरावा देत त्यांनी सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. सत्तेसाठी दिल्लीत मुजरा करणाऱ्यांनी आम्हाला घर सोडण्यावरून बोलू नये, असे म्हणत त्यांनी 'पन्नास खोके' घेणाऱ्यांना 'बाजारबसवी' संबोधले.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
बातम्या
राजकारण
राजकारण




















