Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी
Special Report On Tejaswini Ghosalkar : जय महाराष्ट्र! तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी
तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोड चिट्ठी. ठाकरेंच्या जवळच मानल्या जाणाऱ्या घोसाळकर कुटुंबात उभी फूट पडते की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याला कारण आहे माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा. तेजस्वी घोसाळकरांनी विभागप्रमुखांकडे राजीनामा दिल्याचं समजतय. तेजस्वी घोसाळकर यांच्यावर पक्षान तहिसर विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडीची जबाबदारी सोपवली होती. साल 2017 मध्ये तेजस्वी घोसाळकर याच प्रभागातून शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2024 मध्ये पती अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतरही तेजस्वी घोसाळकर डगमगल्या नाहीत. तेजस्वी घोसाळकर राजकारणात सक्रिय असल्याच दिसलं. मात्र आता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला राजीनामा दिलाय. पण तेजस्वी घोसाळकरांनी हे टोकाच पाऊल का उचलल असावं तर त्याच कारणही पाहूयात. स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने तेजस्वी घोसाळकरांनी राजीनामा दिलाय अर्थात या चर्चा आहे कारण अद्याप तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आली नाहीये मात्र त्यांच्या राजीनाम्यातून नाराजीचा दर्शन होत आहे दीड वर्षांपूर्वी तेजस्वी घोसाळकरांचे पती अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या कठीण काळात संपूर्ण ठाकरे कुटुंब घोसाळकरांसोबत होतं विधानसभेतही घोसाळकर कुटुंबाला संधी देण्यात आली खरं तर त्यावेळी तेजस्वी घोसाळकरांच नाव चर्चेत होतं पण प्रत्यक्षात माजी आमदार विनोद घोसाळकरांच्या हाती आमदारकीच तिकीट पडलं. मात्र भाजपच्या उमेदवारापुढे विनोद घोसाळकरांना पराभव पतकरावा लागला. तेजस्वी घोसाळकरांना विधानसभेचा तिकीट जरी मिळालं नसलं तरी पक्षाने त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली होती. पण आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. ठाकरेंची साथ सोडलेल्या तेजस्वी घोसाळकर भविष्यात भाजपच. कमळ हाती घेण्याची शक्यता वर्तवली जाते. तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरही बोलावण्यात आले. आता तेजस्वी घोसाळकर मातोश्रीवर जाणार का? उद्धव ठाकरे सासर्यांच्या मदतीने सुनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार का? तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर होणार की मग दुरावा कायम राहणार हे पाहणं महत्त्वाच असेल.





















