Sanjay Raut Full PC : निवडणूक आयोगाला खोके दिले का? संजय राऊत तुफान कडाडले
Nagpur News नागपूर : नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी विदर्भातील 62 जागांवर दावा केला आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या जागा आम्ही लढवणार, असे सुतोवाच नितीन राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया देत मिश्किल टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि नितीन राऊत जर विदर्भातील 62 जागांवर दावा करत असतील तर, त्या जागा आम्ही त्यांना सोडू. तसेच या 62 जागा सोडून राज्यात उरलेल्या इतर जागा आहे त्यावर आम्ही लढू. त्यांनी विदर्भावर दावा केला तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रावर आम्ही दावा करू, असे देखील ते म्हणाले. नितीन राऊत हे आमचे मित्र आहेत. विदर्भाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळं प्रेम आहे. तर त्यांना 62 जागा हव्या असतील तर बरं होईल, ते मग 62 जागावरच लढणार, असा मिश्किल टोला देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना लगावला आहे.
राहुल गांधी हे पंतप्रधानाचा चेहरा 25 ते 30 जागांवर फरक पडला असता
महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकदिलाने लढणार आहोत. आमच्या मनात कुणा विषयी कटूता नाही. या राज्याचे नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं, ही आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे. त्याच उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या बैठकीत म्हणाले आहेत की, मुख्यमंत्रीपदासाठी उद्या कुठलाही चेहरा असेल त्याला आम्ही सहकार्य करू, या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा असला तर उत्तम राहील. कारण लोक चेहरा पाहून आपलं मत बदलतात. जर राहुल गांधी हे पंतप्रधानाचा चेहरा म्हणून ते वेळीच पुढे आले असते तर मला खात्री आहे की 25 ते 30 जागांवर नक्कीच फरक पडला असता.