एक्स्प्लोर
Mohan Bhagwat : संघाइतका विरोध इतर संघटनांना करावा लागला नाही, मोहन भागवतांचं वक्तव्य
सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संघाला इतर कोणत्याही स्वयंसेवी संघटनेइतका कडवा आणि तीव्र विरोध सहन करावा लागला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, शुद्ध आणि सात्त्विक प्रेम हाच संघाचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. अमेरिकेनं भारतावर 'ट्राय रिफ' लागल्यानंतर सरसंघचालकांनी स्वदेशीचा मंत्र जपण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर होऊन स्वदेशीला महत्त्व द्या, असे त्यांनी म्हटले. स्वयंसेवकांनी निष्ठा आणि स्वतःला दांववर लावून संघाला विरोध आणि उपेक्षेच्या वातावरणातून पार केले. कटु अनुभव आणि विरोध असूनही समाजप्रती शुद्ध सात्त्विक प्रेम कायम असल्याचे त्यांनी सांगितले. स्वदेशी म्हणजे घरात बनवलेले बाहेरून न आणणे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. लिंबू सरबत पिण्याचं उदाहरण देत कोका कोला किंवा स्प्राइटसारखी बाहेरची पेये टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येक गोष्टीत देश आत्मनिर्भर असावा आणि याची सुरुवात घरातून करावी, असे ते म्हणाले. स्वदेशी म्हणजे परदेशांशी संबंध तोडणे नाही, तर आत्मनिर्भर होणे आहे. जग परस्पर निर्भरतेवर चालते आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू राहील, मात्र त्यात दबाव नसावा, स्वेच्छा असावी, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















