एक्स्प्लोर
Farmers' Protest: 'कर्जमाफीवर सरकारची बनवा बनवी होऊ नये', Bachchu Kadu यांचा इशारा
महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी आंदोलन तीव्र झाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 'सरकार काय बनवा बनवी करतंय... माझ्या समाधानाची गोष्ट नाहीये, शेतकऱ्यांचं समाधान झालं पाहिजे', अशी थेट टीका या आंदोलनावर बोलताना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी, कर्जमाफी योग्य वेळी केली जाईल असे म्हटले आहे, ज्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करून आरोप पुसून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही मत व्यक्त होत आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, अजित पवार उपस्थित राहणार ?
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा अखेरचा रविवार
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















