Karnatak Buses: कोगनोळी टोलवरुन बसेस परत पाठवल्या, कर्नाटक प्रवेशासाठी निर्बंध कठोर ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2022 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध अधिक कठोर केले आहेत. आता महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना लशीचे दोन डोस घेतलेलं बंधनकारक आहेच मात्र त्याशिवाय आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणंही बंधनकारक करण्यात आलंय. याच कारणामुळे कोल्हापुरातील कोगनोळी टोल नाक्यावरून काल रात्रीपासून १३ बसेस परत महाराष्ट्रात पाठवण्यात आल्या आहेत. प्रवाशांकडे आरटीपीसीआर टेस्ट नसल्यानं त्यांना कर्नाटका प्रवेश दिलेला नाहीये. याबाबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेय.