एक्स्प्लोर
Kabutarkhana Shoksabha : मुंबईत मृत कबुतरांसाठी जैनधर्मियांची शांतीसभेचं आयोजन
मुंबईत कबुतरांच्या मृत्यूनंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून, महापालिका आयुक्तांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. आंदोलनादरम्यान, 'आगामी निवडणुकांमध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल' असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे. कबुतरांमुळे आजार होत असल्याचा कोणताही पुरावा नसताना, अनेक वर्षांपासून शांत असलेले कबुतरखान्याचे प्रकरण आताच का बाहेर काढले जात आहे, असा सवाल आंदोलकांनी केला. यामागे आजूबाजूला होणारे डेव्हलपमेंट किंवा एखादा SRA प्रोजेक्ट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मीयांनी धर्मसभेचे आयोजन केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















