एक्स्प्लोर
Heavy Rain | Parbhani मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती; पिकांचं मोठं नुकसान, Dhalegaon बंधाऱ्यातून विसर्ग सुरू
परभणी जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचं धुमचांद बघायला मिळत आहे. जिल्ह्यामधील चोपन्न पैकी नऊ मंडळांमधे अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. यामुळे काही ठिकाणी मार्ग बंद झाले आहेत तर काही ठिकाणी नदीनाल्यांना पूरही आला आहे, ज्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला असून, दोन दरवाजे उघडून सतरा हजार सहाशे एक्केचाळीस क्युसेकनं नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाच दिवसानंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचं धुमचांद पाहायला मिळालेलं आहे. "ज्या पावसाअभावी पिकं वाळू लागलेली होती त्याच पावसानं या पिकांना अबादानी केलेलं आहे कारण पाऊस जोरदार झालेला आहे." मध्यरात्री आणि पहाटे जोरदार पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसामुळे जी पिकं सुकू लागलेली होती त्या पिकांमध्ये आता पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील चोपन्न मंडळांपैकी नऊ मंडळांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे. याचा सर्वाधिक जोर पाथरी तालुक्यामध्ये होता. पाथरी तालुक्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ज्यात हदगावमध्ये १०६ मिलिमीटर, कासापुरी मंडळात २१५ मिलिमीटर आणि बोरीमध्ये १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठ मंडळात १३६ मिलिमीटर तर केकरजवळ मानव तालुक्यात ९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाथरी तालुक्यामधील हदगाव बुद्रुक येथील ग्राम जिल्हा परिषदेची शाळा पाण्यानं वेढलेली आहे. इंदिरानगर या वस्तीमध्ये पाणी साचलेलं आहे. सेलू तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















