एक्स्प्लोर
Three Language Formula: पहिलीपासून हिंदी सक्ती करण्यापेक्षा पाचवीपासून करावी - Dr. Narendra Jadhav
महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या चर्चेत, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मत मांडले आहे. 'शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भारावर चिंध्या अशी अवस्था होईल,' असे थेट मत व्यक्त करत त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याऐवजी, सध्याप्रमाणेच पाचवीपासून हा विषय सुरू करावा, अशी शिफारस त्यांनी केली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत; काही जणांच्या मते हिंदीमुळे मराठीवर अतिक्रमण होत आहे, तर काहींच्या मते हिंदी भाषा लोप पावत आहे. या सर्व मतांचा आदर राखून समिती आपला अहवाल तयार करेल, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

















