एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : महायुतीचं जहाज वादळात,कॅप्टनने बाजूला होऊन चालणार नाही

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, राज्यातील राजकारणाचं विश्लेषण करताना अनेकांनी महायुतीच्या पराभवाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. तर, विरोधकांकडून महायुतीच्या पराभवावरुन त्यांच्या गत काही वर्षातील राजकारणवर भाष्य केलं जात आहे. अनेकांकडून देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं जात आहे. मात्र, या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच, या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. नेतृत्व म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. मात्र, यापुढे पक्षाचं पूर्णवेळ काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदावरुन पदमुक्त करण्याची विनंती मी पक्ष नेतृत्वाकडे करत असल्याचेही फडणवीसांनी म्हटले होते. आता, फडणवीसांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

पराभवानंतर दु:ख होणं स्वाभाविक आहे, किंवा आपल्यामुळेच हे झालं अस त्यांना वाटत असावं. पण, मला स्वत: त्यांना सांगायचं आहे की, यश-अपयश ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कोणा एकावर ठपका ठेवणे बरोबर नाही. महायुतीचं हे झाड थोडसं वादळामध्ये सापडलं आहे, अशा वेळी जे कॅप्टन्स आहेत, त्यांनी बाजूला होणं हे बरोबर नाही. मजबुतीने सर्वांनी एकत्र राहून येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांची तयारी करायला पाहिजे, असे मत महायुतीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

आम्ही तुमच्यासोबत

एनडीएची जी उलथापालथ झालेली आहे, ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक भागांत झाली आहे. त्यामुळे, याची जबाबदारी केवळ फडणवीसांवर सोपवणे किंवा त्यांनीही ती जबाबदारी स्वत:वर घेणे योग्य नाही. माझं त्यांना एवढचं सांगणं आहे की, तुमच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत, सगळे आमदार आहेत. आता, मजबुतीनं लढलं पाहिजे, हे अपयश येणाऱ्या 4-5 महिन्यात होणाऱ्या निवडणुकांतून धुवून काढलं पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटलं. 

फडणवीसांचं सरकारमध्ये राहणं आवश्यक

मध्येच, जर तुम्ही सरकारमधून दूर झालात, तर सरकारमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे, सरकार सुरळीत चालण्यासाठी फडणवीसांचं सरकारमध्ये राहणं आवश्यक आहे, त्यांनी बाहेर होण्याचा अजिबात प्रयत्न करु नये, अशा शब्दात भुजबळ यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर आपलं मत मांडलं आहे. निवडणुकांमध्ये काही चुका झाल्या असतील, अँटीइन्कमबन्सीचा परिणाम आहे. तसेच, संविधान बदललं जाणार आहे हा नॅरेटीव्ह तयार करण्यात आला या घटनांचा परिणाम झाला. आता जी अडचण निर्माण झालीय, ती सोडवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे भुजबळ यांनी म्हटले. यशाचे बाप सगळे असतात, अपयशाची जबाबदारी कोणी घेत नाहीत. मात्र, ही चर्चा 2 ते 4 दिवस चालणार, त्यानंतर सगळे आपल्या कामाला लागतील. आता, पुढची लढाई लढायची आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

नाशिकच्या पराभवावर भाष्य

नाशिकमधील उमेदवारीवरुन महायुतीच्या मित्रपक्षात काही मतभेद होते, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी उत्तर दिले. हेमंत गोडसे स्वत: म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला. मी माघार घेतल्यानंतरही 12 ते 13 दिवसांनी येथील उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. निर्णय घेणे महत्त्वाचं असतं, पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला हेच एकमेव कारण नाही. नाशिकमधील कांद्याचा प्रश्न, संविधान बदलणार हे नॅरीटीव्ह अशा अनेक विषयांमुळे अडचण निर्माण झाली होती, अशी विविध कारणंही भुजबळ यांनी नाशिकच्या पराभवासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना सांगितली. 

निवडणूक व्हिडीओ

Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना
Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 24 June 2024Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget