एक्स्प्लोर
Shivaji Forts UNESCO | विधान भवन परिसरात सत्ताधाऱ्यांचा जल्लोष, १२ किल्ल्यांचा समावेश
छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाल्याने महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक क्षणाचा जल्लोष विधान भवन परिसरात सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक आमदार या सोहळ्यात उपस्थित होते. 'हा क्षण अभिमानाचा हा क्षण आनंदाचा' अशा घोषणांनी विधान भवन परिसर दुमदुमून गेला होता. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड यांसारख्या बारा किल्ल्यांचा या यादीत समावेश झाला आहे. २०१४ पासून या किल्ल्यांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू होती. महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असून, या निर्णयामुळे राज्यभरातून समाधान व्यक्त होत आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेले आणि पुष्प अर्पण केले. या जल्लोषात विरोधी पक्षातील कोणताही आमदार उपस्थित नव्हता. सत्ताधारी पक्षाच्या तिन्ही पक्षांचे सदस्य या सोहळ्यात सहभागी झाले होते.
All Shows
Majha Vishesh

Aaditya Thackeray Majha Vision | दिल्लीतील बहिण अजूनही लाडक्या, महाराष्ट्र अजून हफ्ता वाढ नाही

Aftab Poonawalla - Shraddha Walkar Special Show : प्रेम, लिव्ह इन आणि व्यवस्थेचे बळी - माझा विशेष

Majha Vishesh : माझा विशेष : 'हॅलो' चा इतिहास, 'Hello विरुद्ध Vande Mataram वरुन राजकारण : Abp Majha

12 MLA Suspension : Supreme Court Vs राज्य सरकार संघर्ष सुरु राहणार? आमदारांना एंट्री मिळणार का?

ABP Majha Vishesh : CET नाही मग अकरावीचे प्रवेश कसे? वाढलेल्या टक्केवारीमुळे कट ऑफ लिस्टचं काय?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement





























