एक्स्प्लोर

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियात 'विराट' विजय

ऑस्ट्रेलियातल्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर घडला नवा इतिहास. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली सिडनीची चौथी कसोटी पावसामुळं अनिर्णीत राहिली खरी, पण टीम इंडियानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजय साजरा केला. गेल्या ७१ वर्षांच्या इतिहासात भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जिंकलेली ही पहिलीच कसोटी मालिका ठरली. विराट कोहलीच्या टीम इंडियानं मिळवलेलं हे यश वन डे विश्वचषकाच्या दृष्टीनं आत्मविश्वास उंचावणारं ठरलं.

सिडनी : अखेर सिडनी कसोटी अनिर्णीत राहिली आणि विराट कोहलीच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात घडवला नवा इतिहास. टीम इंडियानं टिम पेनच्या ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करून, बोर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच कायम राखली. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात मिळवलेला हा कसोटी मालिका विजय ऐतिहासिक ठरला. कारण कसोटी सामन्यांच्या इतिहासात भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची ही पहिलीच वेळ होती. विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांनी गाजवलेल्या या पराक्रमाचं सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर उपस्थित भारतीय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांनी एकदिलानं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियातल्या या विराट विजयाची अजित वाडेकरांच्या भारतीय संघानं १९७१ साली इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजयांशी तुलना करण्यात येत आहे. भारतीय संघाचा आजवरचा हा बारावा ऑस्ट्रेलिया दौरा होता. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांची सुरुवात ही स्वातंत्र्योत्तर काळात झाली. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली १९४७-४८च्या मोसमात भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर गेल्या ७१ वर्षांत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातल्या अकरापैकी आठ कसोटी मालिकांमध्ये पराभवाची कटू चव चाखायला लागली. भारतीय संघानं या अकरापैकी तीन कसोटी मालिका बरोबरीत राखण्याची कामगिरी बजावली. सुनील गावस्करांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं १९८०-८१ साली दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. मग कपिलदेवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या १९८५-८६ सालच्या दौऱ्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. त्यानंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियानं २००३-०४ सालच्या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखली होती. अखेर विराट कोहलीच्या टीम इंडियानं भारतीय क्रिकेटरसिकांना ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाचं सुख मिळवून दिलं. केपटाऊन कसोटीतल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या महारथी फलंदाजांवर झालेली वर्षभराची बंदीची कारवाई भारतीय संघाच्या पथ्यावर पडली. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांचं बदललेलं भारतीय थाटाचं रुपही टीम इंडियाला हात देणारं ठरलं. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यांपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही प्रतिस्पर्धी फौजेला दोनदा गुंडाळण्याची दाखवलेली ताकद ही टीम इंडियाच्या यशाचं प्रमुख कारण ठरली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला या मालिकेत शतक झळकावता आलं नाही. चार कसोटी सामन्यांमध्ये मिळून मार्कस हॅरिसची ७९ धावांची खेळी हाच ऑस्ट्रेलियाचा वैयक्तिक उच्चांक ठरला. त्यावरूनच भारतीय गोलंदाजांनी कसोटी मालिकेवर गाजवलेल्या वर्चस्वाची कल्पना यावी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पर्थच्या तुलनेत कठीण खेळपट्टीवर झळकावलेलं शतक ही या मालिकेतली सर्वोत्तम खेळी ठरली. पण भारताला कसोटी मालिकेवर वर्चस्व मिळवून दिलं ते चेतेश्वर पुजारानं झळकावलेल्या तीन शतकांनी आणि त्याच्या ५२१ धावांनी. साहजिकच सिडनी कसोटी आणि मालिकेतल्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही चेतेश्वर पुजाराला बहाल करण्यात आला. रिषभ पंतला त्याच्या यष्टिरक्षण कौशल्यात अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. पण त्याच्या आक्रमक फलंदाजीनं खेळाला वारंवार कलाटणी मिळवून दिली. पंतनं या मालिकेत ३५० धावांचा रतीब घातला. तसंच परदेशातल्या कसोटी मालिकेत त्यानं यष्टिपाठी सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावावर जमा केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची कामगिरी टीम इंडियाच्या मालिका विजयात निर्णायक ठरली. बुमरानं चार कसोटी सामन्यांमध्ये मिळून ३५७ धावांत २१ फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमीनं ४१९ धावांत १६ विकेट्स काढून हम किसीसे कम नही, हे पुन्हा दाखवून दिलं. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाचा सर्वाधिक आनंद कर्णधार विराट कोहलीला होणं स्वाभाविक होतं. एका कॅलेंडर वर्षात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांमध्ये मिळून चार कसोटी जिंकणारा तो पहिला आशियाई कर्णधारही ठरला. इंग्लंडमधला आयसीसी विश्वचषक अवघ्या चार महिन्यांवर असताना, कसोटी क्रिकेटच्या दुनियेत मिळालेलं यश विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांचा आत्मविश्वास उंचावणारं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup Semi-final Scenario : दोन संघ OUT, दोन टीम फिक्स! आता सेमीफायनलच्या 2 जागांसाठी टीम इंडिया-पाकिस्तानसह 4 संघांमध्ये शर्यत
दोन संघ OUT, दोन टीम फिक्स! आता सेमीफायनलच्या 2 जागांसाठी टीम इंडिया-पाकिस्तानसह 4 संघांमध्ये शर्यत
Ind vs Zim Upadte : झिम्बाब्वेचा 72 धावांनी पराभव, अभिषेक अन् अर्शदीपचा चेपॉकवर धमाका; आता टीम इंडिया सेमीफायनल फक्त एक पाऊल दूर
झिम्बाब्वेचा 72 धावांनी पराभव, अभिषेक अन् अर्शदीपचा चेपॉकवर धमाका; आता टीम इंडिया सेमीफायनल फक्त एक पाऊल दूर
IND vs ZIM : टीम इंडियाने खातं उघडलं अन् गेम फिरवला! झिम्बाब्वे पराभूत, भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळणार?, 1 मार्चला ठरणार
टीम इंडियाने खातं उघडलं अन् गेम फिरवला! झिम्बाब्वे पराभूत, भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळणार?, 1 मार्चला ठरणार
Ind vs Zim : 17 षटकार, 17 चौकार अन् 256 धावा! अभिषेकच्या वादळानंतर हार्दिक-तिलकचा तडाखा; टीम इंडियाने रचला इतिहास, क्रिकेट विश्व हादरलं
17 षटकार, 17 चौकार अन् 256 धावा! अभिषेकच्या वादळानंतर हार्दिक-तिलकचा तडाखा; टीम इंडियाने रचला इतिहास, क्रिकेट विश्व हादरलं

व्हिडीओ

Rohit Pawar on Ajit Pawar Accident : दादांच्या अपघाताच्या चौकशीचा तिढा FIR साठी लढा` Special Report
Sunetra Pawar NCP President : आव्हानांचे डोंगर सुनेत्राताई कशा पेलणार? Special Report
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Sunetra Pawar UNCUT Speech : हुंदका दाटला, निर्धार केला, दादांची स्वप्न पूर्ण करणार
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष,प्रफुल पटेलांकडून नावाची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AFG vs PAK : अफगाणिस्ताननं घेतला एअरस्ट्राइकचा बदला, पाकच्या 15 ठिकाणांवर ताबा, सैनिकांना मारलं, तालिबानचा दावा
अफगाणिस्ताननं घेतला एअरस्ट्राइकचा बदला, पाकच्या 15 ठिकाणांवर ताबा, सैनिकांना मारलं, तालिबानचा दावा
Rohit Pawar : पार्थ पवार तुमच्यासोबत का नाहीत? त्यांच्यावर दबाव आहे का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, सगळेच लढत...
पार्थ पवार तुमच्यासोबत का नाहीत? त्यांच्यावर दबाव आहे का? रोहित पवार म्हणाले, सगळेच लढत...
Video : पळसदरी- कर्जत दरम्यान उतारावर मालगडीवरील नियंत्रण सुटलं? सुदैवानं अनर्थ टळला, भरधाव मालगाडीचा व्हिडिओ समोर
पळसदरी- कर्जत दरम्यान उतारावर मालगडीवरील नियंत्रण सुटलं? सुदैवानं अनर्थ टळला, भरधाव मालगाडीचा व्हिडिओ समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण 5 बँकांना आर्थिक दंड, जाणून घ्या
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण 5 बँकांना आर्थिक दंड, जाणून घ्या
नवरी नटली... भरजरी शालू अन् दागिन्यांमध्ये खुललं रश्मिकाचं सौंदर्य; अभिनेता विजयच्या मिठीत नॅशनल क्रश
नवरी नटली... भरजरी शालू अन् दागिन्यांमध्ये खुललं रश्मिकाचं सौंदर्य; अभिनेता विजयच्या मिठीत नॅशनल क्रश
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
ZP च्या शाळेप्रती आपुलकी, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त साधत सुरू केलं ‘कुसुमाग्रज ग्रंथालय’; माजी विद्यार्थ्याचा 'आदर्श'वत उपक्रम
Epstein Files :एपस्टीन फाईल्समध्ये नाव आलं, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अध्यक्षांकडून राजीनामा, कोणत्या आरोपांमुळं पायऊतार व्हावं लागलं? 
एपस्टीन फाईल्समध्ये नाव येताच आणखी एक राजीनामा पडला, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष पायऊतार
मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य; कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, संख्या किती?
मोठी बातमी! जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य; कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, संख्या किती?
Embed widget